मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ctet

https://ctet.nic.in/ https://ctet.nic.in/ https://ctet.nic.in/ शिक्षक अभियोग्यता परीक्षा 8. तयारी कशी करावी? CTET साठी तयारी करताना NCERT आधारित अभ्यास अत्यंत उपयुक्त ठरतो. रोजची तयारी 2 ते 3 तास अभ्यास करणाऱ्या उमेदवारासाठी: पहिला तास: Child Development & Pedagogy दुसरा तास: Mathematics / EVS / Science / Social Science 30 मिनिटे: Language I आणि Language II 30 मिनिटे: मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका व MCQ

भारताची प्रमाणवेळ (IST) : इतिहास आणि महत्त्वभारताची प्रमाणवेळ म्हणजेच Indian Standard Time (IST)..

भारताची प्रमाणवेळ (IST) : इतिहास आणि महत्त्व. भारताची प्रमाणवेळ म्हणजेच Indian Standard Time (IST) ही संपूर्ण भारतासाठी वापरली जाणारी अधिकृत प्रमाणवेळ आहे. आज भारतातील जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत सर्व ठिकाणी घड्याळाची अधिकृत वेळ समान आहे. भारताची प्रमाणवेळ ही समन्वित सार्वत्रिक वेळेपेक्षा म्हणजेच UTC पेक्षा 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. त्यामुळे भारताची प्रमाणवेळ UTC+5:30 अशी दर्शविली जाते. मात्र भारताची प्रमाणवेळ 1947 मध्येच प्रथम निर्माण झाली, असे म्हणणे पूर्णपणे अचूक नाही. तिचा इतिहास त्यापूर्वीचा असून 82 अंश 30 मिनिटे पूर्व रेखांशावर आधारित प्रमाणवेळ 1 जानेवारी 1906 रोजी लागू झाली होती. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यावर 1947 मध्ये ही वेळ स्वतंत्र भारताची अधिकृत राष्ट्रीय प्रमाणवेळ म्हणून स्वीकारण्यात आली.भारतासारख्या विशाल देशात प्रमाणवेळ निश्चित करण्याची गरज भौगोलिक परिस्थितीमुळे निर्माण झाली. पृथ्वी स्वतःभोवती 24 तासांत 360 अंश फिरते. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील प्रत्येक 1 अंश रेखांशामध्ये सुमारे 4 मिनिटांचा वेळेचा फरक पड...

राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये माता-पालक शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन करणेबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत डॉ. अॅनी बेंझट मार्ग, पुणे – ४११ ००१ दूरध्वनी क्रमांक ०२० २६१२०१४१                     ई-मेल- educommoffice@gmail.com जा.क्र. - प्राशिसं २०२६/मापाश/मेळावा/३०१                     दिनांकीत स्वाक्षरी प्रति, १. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व). २. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व ) ३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/ योजना), जिल्हा परिषद (सर्व). ४. शिक्षणनिरीक्षक (उत्तर /पश्चिम/दक्षिण) मुंबई ५. प्रशासन अधिकारी / शिक्षण प्रमुख / शिक्षणाधिकारी, मनपा/नप/नपा ६. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व). विषय : राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये माता-पालक शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन करणेबाबत. संदर्भ - १. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP २०२०) मार्गदर्शक तत्त्वे. २. केंद्र शासनाचे 'निपुण भारत' (NIPUN Bharat) अभियान परिपत्रक ३. शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण- २०२१/प्र.क्र.१...

राष्ट्रीय क्रीडा दिन. भारताचे महान हॉकीपटू, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो..

राष्ट्रीय क्रीडा दिन..२९ ऑगस्ट भारताचे महान हॉकीपटू आणि ‘हॉकीचे जादूगार’ म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी झाला. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त भारतात दरवर्षी २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीच्या इतिहासातील एक महान आणि अविस्मरणीय नाव आहे. आपल्या असामान्य खेळकौशल्याने त्यांनी जगभरात भारतीय हॉकीचा गौरव वाढवला. त्यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ या तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. या तिन्ही ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदक मिळवले. त्यांच्या अप्रतिम खेळामुळे त्यांना ‘हॉकीचे जादूगार’ ही उपाधी मिळाली. त्यांचे जीवन कठोर परिश्रम, शिस्त, सातत्य आणि देशप्रेमाचे उत्तम उदाहरण आहे. २०१२ पासून २९ ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. देशात खेळांविषयी आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणे, खेळाडूंच्या योगदानाचा सन्मान करणे आणि तरुणांना खेळाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणे हा या दिवसामागचा प्रमुख उद्देश आहे. खेळ म्...

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

पवित्र पोर्टल, अभिनंदन...

👉*अभिनंदन* List लागली 🔔*पवित्र पोर्टल भरती २०२५ - निवड यादी जाहीर* मुलाखतीशिवाय गटाची गुणवत्ता यादी लागणार आहे. एकूण जागा: १९,७५४ शिफारस झाली: १३,१९९ जागांवर व्यवस्थापननिहाय शिफारस: जिल्हा परिषद - ८,४८९ महानगरपालिका - १,३०६ आदिवासी विभाग शाळा - १,६०९ खाजगी संस्था - १,४५१ नगरपालिका - २२६ शासकीय विद्यानिकेतन - ५४ इयत्तानिहाय शिफारस: १ ली ते ५ वी - ७,५४१ ६ वी ते ८ वी - ४,२०७ ९ वी ते १० वी - १,१९९ ११ वी ते १२ वी - २५२ पुढे काय? १) निवड झालेल्यांना SMS येईल. २) वेबसाईटवर Login करून पहा:   http://tait2024.mahateacherrecruitment.org.in ३) आक्षेप असेल तर ०६/०९/२०२६ पर्यंत मेल करा: edupavitra2025grcc@gmail.com 📌टीप: माजी सैनिक व अंशकालीन आरक्षणाची पदे आणि ST/PESA ची पदे उमेदवार न मिळाल्याने रिक्त - ती पुढच्या Converted Round मध्ये भरतील. *सर्व निवड झालेल्या अभियोग्यताधारकांचे अभिनंदन!*✨💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती आपले नाव पहा..

TAIT-2025 नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठी निवड याद्या जाहीर! पाहण्यासाठी लिंक https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Dashboard/DashboardCandidate.aspx . २७/०८/२०२६ प्रेस नोट पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती सन २०२५ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार प्राप्त जाहिरातीतील मुलाखतीशिवाय या प्रकारातील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारशीबाबत. . महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीसाठी "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५" चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. . सदर ऑनलाईन चाचणी दिनांक २७/०५/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण २,२८,८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,११,३०८ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले त्यातील उमेदवारांनी स्व प्रमाणपत्र पूर्ण केलेले १,७०,१०८ आहेत. मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील पवित्र पोर्टलवर दिनांक ०१/०५/२०२६ ते २०/०८/२०२६ या दरम्यान ...

अश्रूंची झाली फुले : मराठी रंगभूमीचा अजरामर ठेवा...

अश्रूंची झाली फुले : मराठी रंगभूमीचा अजरामर ठेवा.. मराठी रंगभूमीच्या इतिहासात काही नाटके अशी आहेत की त्यांचा उल्लेख झाला की त्या नाटकातील व्यक्तिरेखा, संवाद, प्रसंग आणि कलाकार आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात. वसंत कानेटकर लिखित ‘अश्रूंची झाली फुले’ हे असेच एक अजरामर नाटक आहे. २७ ऑगस्ट १९६६ रोजी मुंबई येथे या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि त्यानंतर या नाटकाने मराठी रंगभूमीवर अक्षरशः इतिहास निर्माण केला. आज अनेक दशके उलटून गेल्यानंतरही या नाटकाचे नाव घेतले की प्रा. विद्यानंद, लाल्या, शंभू महादेव आणि या व्यक्तिरेखांना अजरामर करणारे प्रभाकर पणशीकर, डॉ. काशीनाथ घाणेकर आणि चित्तरंजन कोल्हटकर यांची आठवण होते. ‘अश्रूंची झाली फुले’ हे केवळ एक नाटक नाही, तर माणसाच्या भावविश्वाचा, शिक्षकाच्या आदर्शांचा, विद्यार्थ्यांवरील प्रेमाचा आणि बदलत्या समाजव्यवस्थेतील संघर्षाचा अत्यंत प्रभावी आविष्कार आहे. या नाटकात मानवी जीवनातील अश्रू, संघर्ष, अपमान, त्याग, प्रेम, आदर्श आणि माणुसकी यांचा असा संगम पाहायला मिळतो की नाटक संपल्यानंतरही त्यातील भावना प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतात. वसंत क...

मानवसेवेला वाहिलेले एक प्रेरणादायी जीवन,मदर टेरेसा...

मदर तेरेसा : मानवसेवेला वाहिलेले एक प्रेरणादायी जीवन मदर तेरेसा हे नाव घेतले की,आपल्या डोळ्यांसमोर गरिबांच्या, अनाथांच्या, आजारी आणि निराधार माणसांच्या सेवेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे एक व्यक्तिमत्त्व उभे राहते. विसाव्या शतकातील मानवतावादी व्यक्तिमत्त्वांमध्ये मदर तेरेसा यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. साधे जीवन, निःस्वार्थ सेवा, गरिबांविषयी करुणा आणि संकटात सापडलेल्या माणसाला आधार देण्याची वृत्ती या गुणांमुळे त्या जगभर प्रसिद्ध झाल्या. त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक दशके भारतात घालवली आणि विशेषतः कोलकाता शहरातील गरीब, निराधार, आजारी आणि मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या लोकांची सेवा केली. त्यांच्या कार्यामुळे त्यांना जगभरातून सन्मान मिळाला आणि १९७९ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले. पुढे २०१६ मध्ये कॅथोलिक चर्चने त्यांना संतपद बहाल केले आणि त्या ‘सेंट तेरेसा ऑफ कलकत्ता’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मदर तेरेसा यांचे मूळ नाव आग्नेश गोंझा बोयाज्यू असे होते. त्यांचा जन्म २६ ऑगस्ट १९१० रोजी स्कोप्जे येथे झाला. त्या काळात स्कोप्जे हे ऑटोमन साम्राज्य...

डॉ. गणेश बारैया — उंची शरीराची, पण कर्तृत्व आभाळाएवढे!

डॉ. गणेश बारैया — उंची शरीराची, पण कर्तृत्व आभाळाएवढे! “व्यंग हे शरीरात असतं, मनात नाही!” या वाक्याचा अर्थ केवळ शब्दांत नाही, तर आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. गणेश बारैया .अवघ्या तीन फूट उंचीचे गणेश लहानपणापासूनच अनेक अडचणींना सामोरे गेले. त्यांच्या शारीरिक उंचीवरून त्यांना टोमणे ऐकावे लागत. प्राथमिक शाळा घरापासून सुमारे पाच किलोमीटर दूर होती. वाहतुकीची सोय नसल्यामुळे त्यांना शाळेत जाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. अनेकदा त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना खांद्यावर बसवून शाळेत नेले. गरिबी होती, अडचणी होत्या; पण मुलाच्या शिक्षणाबद्दल आई-वडिलांची जिद्द मात्र मोठी होती.गणेश यांच्या तीन फूट उंचीवर एका सर्कसवाल्याची नजर पडली. त्याने गणेश यांना सर्कसमध्ये घेण्यासाठी त्यांच्या वडिलांसमोर पाच लाख रुपयांची बोली लावली. परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांच्या वडिलांनी हा प्रस्ताव ठामपणे नाकारला. “मी माझ्या मुलाला विकणार नाही; त्याला शिकवणार आणि त्याचे भविष्य घडवणार,” हा त्यांच्या वडिलांचा निर्धार गणेश यांच्या मनात कायमचा कोरला गेला.याच निर...

आदिवासी संस्कृती, हक्क आणि अस्मितेला सलाम!

आदिवासी संस्कृती, हक्क आणि अस्मितेला सलाम! दरवर्षी ९ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून जगभर साजरा केला जातो. आदिवासी आणि मूळनिवासी समाजाच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या संस्कृतीचे, परंपरांचे आणि भाषांचे संवर्धन करणे तसेच त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अधिकारांना मान्यता देणे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने २३ डिसेंबर १९९४ रोजी ठराव  मंजूर करून दरवर्षी ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. ही तारीख निवडण्यामागे विशेष ऐतिहासिक कारण आहे. ९ ऑगस्ट १९८२ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या आदिवासी लोकसंख्येवरील कार्यकारी गटाची पहिली बैठक झाली होती. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ ९ ऑगस्ट हा दिवस निश्चित करण्यात आला. यापूर्वी डिसेंबर १९९२ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने १९९३ हे ‘जागतिक आदिवासी लोकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष’ म्हणून घोषित करण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यानंतर आदिवासी लोकांच्या प्रश्नांकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक गांभ...