संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...
एकच प्रश्न स्वतःला विचारू - ‘झाडे कोणी तोडली? भीमाशंकर शंकर येथील जंगल हे एकेकाळी जगातले दोन क्रमांकाचे आदर्श जंगल मानले जायचे जिथे त्या भागात उगवू शकतील अशा सर्व वनस्पती होत्या आणि हवा सुद्धा शुद्ध होती. बाजूचे जंगल तसेच ठेऊन मध्यभागी ज्या पवनचक्क्या उभारण्यासाठी झाडांची कत्तल कोणी केली ? याचा पावसावर परिणाम होणारच ना. फक्त ३० - ३५ वर्षांपूर्वी महाबळेश्वर कसे होते आणि आज त्याचे काय झाले आहे ? कोणी केली झाडांची कत्तल आणि सिमेंटचे जंगल ? लोणावळा - खंडाळा ही एकेकाळी थंड हवेची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध होती. आता लोणावळा उजाड होत चालले आहे. कोणी केली झाडांची कत्तल ?झाडांच्या बाबतीत मला महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक जास्त आवडते. अजूनही कर्नाटक खूप हिरवे आहे पण जसे ते २०-२५ वर्षांपूर्वी होते तसे आज दिसत नाही. कोण करते झाडांची कत्तल ? मेळघाट अभयारण्य 25वर्षापूर्वी आम्हीं पाहिलेला आणि आजचा मेळघाट यामध्ये खूप फरक आहे.. जंगल ओसाड पडत आहेत.... १९७१ सालच्या युद्धात जरी विजय मिळाला असला तरीही युद्धाची किंमत ही मोजावीच लागते. अशाच वेळी भारतात दुष्काळ होता त्यामुळे त्या दुष्काळाची झळ ...