मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

पाणी व्यवस्थापन आणि लोकसहभाग

एकच प्रश्न स्वतःला विचारू -  ‘झाडे कोणी तोडली? भीमाशंकर शंकर येथील जंगल हे एकेकाळी जगातले दोन क्रमांकाचे आदर्श जंगल मानले जायचे जिथे त्या भागात उगवू शकतील अशा सर्व वनस्पती होत्या आणि हवा सुद्धा शुद्ध होती. बाजूचे जंगल तसेच ठेऊन मध्यभागी ज्या पवनचक्क्या उभारण्यासाठी झाडांची कत्तल कोणी केली ? याचा पावसावर परिणाम होणारच ना. फक्त ३० - ३५ वर्षांपूर्वी महाबळेश्वर कसे होते आणि आज त्याचे काय झाले आहे ? कोणी केली झाडांची कत्तल आणि सिमेंटचे जंगल ? लोणावळा - खंडाळा ही एकेकाळी थंड हवेची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध होती. आता लोणावळा उजाड होत चालले आहे. कोणी केली झाडांची कत्तल ?झाडांच्या बाबतीत मला महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक जास्त आवडते. अजूनही कर्नाटक खूप हिरवे आहे पण जसे ते २०-२५ वर्षांपूर्वी होते तसे आज दिसत नाही. कोण करते झाडांची कत्तल ? मेळघाट अभयारण्य 25वर्षापूर्वी  आम्हीं पाहिलेला आणि आजचा मेळघाट यामध्ये खूप फरक आहे.. जंगल ओसाड पडत आहेत.... १९७१ सालच्या युद्धात जरी विजय मिळाला असला तरीही युद्धाची किंमत ही मोजावीच लागते. अशाच वेळी भारतात दुष्काळ होता त्यामुळे त्या दुष्काळाची झळ ...

"भारत छोडो आंदोलन". #९ऑगस्ट क्रांती दिवस

भारत छोडो आंदोलन.. भारत छोडो आंदोलन , ज्याला भारत छोडो आंदोलन म्हणूनही ओळखले जाते , ही चळवळ महात्मा गांधींनी 9 ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात दुसऱ्या महायुद्धात भारतातील ब्रिटीश राजवट संपवण्याच्या मागणीसाठी सुरू केली होती . क्रिप्स मिशन ब्रिटीश युद्धाच्या प्रयत्नांना भारतीय पाठिंबा मिळवण्यात ब्रिटीश अयशस्वी ठरल्यानंतर , 9 ऑगस्ट 1942 रोजी गोवालिया टँक मैदानावर बॉम्बेमध्ये दिलेल्या भारत छोडो आंदोलनात गांधींनी करा किंवा मरोची हाक दिली . व्हाईसरॉय लिनलिथगो यांनी ही चळवळ "1857 नंतरचे सर्वात गंभीर बंड" असल्याचे नमूद केले.  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने गांधीजींनी भारतातून "ऑर्डरली ब्रिटीश विथड्रॉवल" या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात निषेध सुरू केला. युद्ध सुरू असतानाही इंग्रज कारवाई करण्यास तयार होते. गांधींच्या भाषणाच्या काही तासांत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जवळजवळ संपूर्ण नेतृत्वाला कोणत्याही खटल्याशिवाय तुरुंगात टाकण्यात आले. बहुतेकांनी युद्धाचा उर्वरित काळ तुरुंगात आणि जनतेच्या संपर्कात नसताना घालवला. ब्रिटीशांना व्हाईसरॉय कौन...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...