संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...
मुलांचे बालपण चांगले जावे , त्यांना बालपणात वेगवेगळे अनुभव घेता यावेत, जेणेकरून त्यांचा विकास चांगला होईल यासाठी प्रत्येक पालकाने त्यांना बाहेर खेळण्याची सवय लावली पाहिजे. कारण त्याचे अनेक प्रकारे फायदा मुलांना होतात.सगळ्यात महत्वाचे म्हणजे बाहेर खेळल्याने मुलांचा व्यायाम होतो. यामुळे त्यांचा शारीरिक विकास योग्य पद्धतीने होते. त्यांचे टीव्ही बघणे, गेम खेळणे कमी होते.याव्यतिरिक्त सुद्धा बाहेर खेळण्याचे मुलांच्या मानसिक विकासासाठी अनेक फायदे आहेत. @Childhood मुलांना सामाजिक भान येते समजा जर तुम्ही मुलांना घरीच ठेवले तर त्यांना बाहेर, चार लोकात कसे वागायचे याची समज येणार नाही. @yoga बाहेर गेल्यावर काय करायचे, काय नाही हे त्यांना शिकवण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे त्यांना बाहेर घेऊन जाणे किंवा त्यांना बाहेर सोडणे.लोकांशी कसे बोलायचे, आपल्याला काही आडले तर लोकांना मदत कशी मागायची याचे प्रात्यक्षिक त्यांना मिळते.तुमची जर लहानशी फॅमिली असेल तर याचा विशेष उपयोग होईल. परिवारात जर जास्त सदस्य नसतील तर इतरांशी मिळून-मिसळून कसे वागायचे हे मुलांना माहीत नसते. त्यांना जर बाह...