मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

मराठी राजभाषा दिवस: "अभिमान, अस्मिता आणि गौरवाचा उत्सव"

मराठी राजभाषा दिवस: "अभिमान, अस्मिता आणि गौरवाचा उत्सव" मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, तर ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहे. तिच्या शब्दांत इतिहासाचा ठेवा आहे, तिच्या गप्पांत मातीचा सुगंध आहे, आणि तिच्या अभिव्यक्तीत अस्मितेचा अभिमान आहे. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषेच्या गौरवासाठी साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे आपल्या मातृभाषेच्या श्रीमंतीचा उत्सव, तिच्या अमृतमधुर स्वरांचा साज, आणि तिच्या साहित्यसंपदेचे वंदन करण्याचा सोहळा!. वि.वा. शिरवाडकर, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र "कुसुमाग्रज" या टोपणनावाने ओळखतो, हे मराठी साहित्यातील एक अढळ नक्षत्र होते. त्यांच्या लेखणीने मराठी साहित्याच्या विश्वात अमूल्य योगदान दिले. कवी, नाटककार, कादंबरीकार आणि विचारवंत म्हणून त्यांनी मराठी भाषा आणि साहित्य समृद्ध केले. वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज हे केवळ एक लेखक नव्हते, तर ते मराठी मनाला चेतवणारे विचारवंत होते. त्यांच्या लेखणीने महाराष्ट्रातील साहित्य, नाटक आणि सामाजिक जाणीव समृद्ध ...

शितलदेवी : "जिद्दीच्या बळावर इतिहास घडवणारी तिरंदाज"..

शितलदेवी : "जिद्दीच्या बळावर इतिहास घडवणारी तिरंदाज".. खेळ ही केवळ शारीरिक ताकदाची चाचणी नाही, तर मनगटातील जिद्द, डोक्यातील धारदार रणनीती आणि मनगटाला मिळणाऱ्या आत्मविश्वासाचीही परीक्षा असते.     विशेषतः पॅरा खेळाडूंसाठी हा प्रवास अधिक खडतर असतो. शितलदेवी ही त्या जिद्दीचे मूर्तिमंत रूप आहे.जन्मजात फोकोमेलिया या दुर्मिळ विकारामुळे तिच्या हात-पायांची वाढ अपूर्ण राहिली. मात्र, शारीरिक मर्यादा तिच्या यशाच्या आड कधीच आल्या नाहीत. तिने संकल्प केला, बाण उचलला आणि तिरंदाजीच्या मैदानावर इतिहास घडवला.पॅरा ऑलिंपिक, नॅशनल आर्चरी चॅम्पियनशिप, जागतिक आर्चरी चॅम्पियनशिप आणि आशियाई स्पर्धांमध्ये पदकांची मालिका उभी करत तिने आपल्या बाणाने फक्त लक्ष्यच नाही, तर लोकांच्या मनालाही वेधले! फोकोमेलिया ही जन्मजात विकृती हात किंवा पाय पूर्ण विकसित न होण्यास कारणीभूत ठरते. यामुळे अवयव लहान, अशक्त किंवा अपूर्ण राहतात. समाज अशा मर्यादांकडे दुर्बलतेच्या नजरेने पाहतो, पण शितलदेवीच्या कुटुंबाने तिला कधीही दिव्यांग समजले नाही.१० जानेवारी २००७ रोजी जन्मलेल्या शितलदेवीने लहानपणापासूनच जगाच्या दृ...

#हीमा दास Hima Daas

हिमा दास : "संघर्षातून सुवर्ण कळसाकडे"भारतीय अॅथलेटिक्समध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारी हिमा दास ही केवळ एक धावपटू नाही, तर संघर्ष, जिद्द आणि स्वप्नांचा पाठलाग कसा करावा याचा जिवंत आदर्श आहे. एका  सामान्य कुटुंबात जन्मलेली हिमा आज भारताची ‘गोल्डन गर्ल’ म्हणून ओळखली जाते. तिच्या जीवनप्रवासात अडथळे होते, अंधार होता, पण तिच्या आत्मविश्वासाने आणि मेहनतीने तिला प्रकाशाकडे नेले. ९ जानेवारी २००० रोजी आसामच्या नागाव जिल्ह्यातील एका छोट्या खेडेगावात हिमा दासचा जन्म झाला. तिचे वडील शेतकरी होते, घरची आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची होती. पण परिस्थितीपेक्षा मोठी तिची जिद्द होती. लहानपणापासूनच तिला फुटबॉलची आवड होती, पण तिच्या प्रशिक्षकांनी तिच्या वेगावर लक्ष ठेवून तिला धावण्याचा सल्ला दिला. तिच्याकडे धावण्याचे  बूट घेण्यासाठी पैसे नव्हते. पण इच्छाशक्तीसमोर आर्थिक अडचणी टिकू शकत नाहीत. एका स्पर्धेसाठी तिने साध्या बूटांवर हाताने ‘आदिदास’ असे लिहिले आणि मैदानात उतरली. तिच्या वेगाने आणि जिद्दीने सर्वांनाच अचंबित केले.  जेव्हा तिने सुवर्णपदक जिंकले, तेव्हा  ‘Adidas...

गाणंकोकिळा लतादीदी

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. भारतीय संगीताचा झगमगता तारा, स्वरांचा अमूल्य ठेवा आणि अनंत काळापर्यंत मनोमनी घुमणारा सुरेल स्वर अशी लता मंगेशकर यांची ओळख शब्दांत मावणारी नाही. त्यांच्या मधुर स्वरांनी संपूर्ण जगाला मोहित केले आणि आजही त्यांच्या गाण्यांमधून ते सूर आपल्या हृदयात जिवंत राहतील. लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर येथे झाला. संगीत हा त्यांच्या रक्तातच होता. वडील पं. दीनानाथ मंगेशकर हे सुप्रसिद्ध गायक व नटसम्राट होते, तर आई शेवंतीबाई यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. तीन बहिणी आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि एक भाऊ  ह्रदयनाथ मंगेशकर या सर्वांमध्ये संगीताचा वारसा चालवण्याचे बळ होते. लता मंगेशकर यांना लहानपणापासूनच संगीताची गोडी लागली. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर गाण्याची सुरुवात केली. मात्र, नियतीने घाला घातला, आणि वडिलांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या नाजूक खांद्यावर येऊन पडली. पण हा परीक्षेचा क्षण त्यांनी धैर्याने स्वीकारला आणि संगीतातील आपला प्रवास अविरत ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...