संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...
*‘रुग्णसेवेच्या यज्ञात लोकप्रतिनिधींची ‘अर्थसंमिधा’* *कोविड रुग्णांसाठी अमरावती जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची स्वयंसेवा* श्रीनाथ वानखडे/दि.22 मे 21 भारतीय शासनव्यवस्थेत वरिष्ठांनी आदेश द्यायचे व कनिष्ठांनी ते पाळायचे.याच व्यवस्थेतील जिल्हा परिषद एक महत्वाचा घटक.कोविडच्या आपत्तीकाळात समाजाला आपलंही देणं लागतं हा विचार मांडल्या गेला.या विचारातूनच जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांसह सर्व कर्मचारी एकवटले व वर्गणी गोळा केली.नेहमी आपल्या आदेशाचे पालन करणारे कर्मचारी जेव्हा संघटना मतभेद बाजूला सारून रुग्णसेवाचा यज्ञ तेवत ठेवत आहे हे अनुभवले तेंव्हा या यज्ञात पक्षभेद बाजूला ठेवत जिल्हा परिषद अध्यक्ष सह ईतर सदस्यांनी सुद्धा अर्थसंमिधा अर्पण केली. मे महिन्याच्या सुरुवातीला कोविडची रुग्णसंख्या अचानक वाढीला लागते.अमरावती जिल्हातून कोविड आजाराचे नवीन रूप धारण केल्याच्या वावड्या सर्वत्र उठल्या.याच कालावधीत जिल्हा परिषद स्थापनेपासून पहिल्यांदा टाळेबंदी केल्या गेली.जे होत आहे ते भीषण होत आहे.शिक्षक हा समाजाचा दिशादर्शक आहे हे अनेकांनी ऐकले होते.यामधून प्राथमिक शिक्षकांच्या एका...