हिंदी दिवस : एका भाषेचा उत्सव.... भाषा म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नाही. भाषा म्हणजे माणसाच्या मनातील भावना, विचार, अनुभव, संस्कृती आणि इतिहास व्यक्त करण्याचे माध्यम आहे. आईच्या अंगाईगीतापासून ते समाजाच्या सामूहिक स्मृतीपर्यंत आणि साहित्याच्या सर्जनशील विश्वापासून ते आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या संवादापर्यंत भाषा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच एखाद्या भाषेचा सन्मान करणे म्हणजे त्या भाषेत व्यक्त झालेल्या असंख्य पिढ्यांच्या अनुभवांचा सन्मान करणे होय. भारतासारख्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक देशात हिंदीचे हे स्थान समजून घेणे विशेष महत्त्वाचे ठरते. दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी भारतात हिंदी दिवस साजरा केला जातो. या दिवसामागे एक ऐतिहासिक घटना आहे. १४ सप्टेंबर १९४९ रोजी भारताच्या संविधान सभेने देवनागरी लिपीतील हिंदीला संघाची राजभाषा म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेतला. स्वतंत्र भारताची प्रशासनव्यवस्था कोणत्या भाषेत चालवायची, भारतीय जनतेशी शासनाचा संवाद कसा असावा आणि देशाच्या विविध भागांना परस्परांशी जोडणाऱ्या भाषेची भूमिका काय असावी, या व्यापक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर हा...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।