मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

#शाहूजी महाराज

शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. सन १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून...

मराठी व्याकरण @समास प्रकार

समास प्रकार :   दोन किंवा अधिक शब्दांचा परस्पर संबंध दर्शविणाऱ्या प्रत्ययांचा किंवा अव्ययांचा लोप होऊन जोडशब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द म्हणतात.जोडशब्द बनविण्याची अथवा एकत्रीकरणाची ही जी प्रक्रिया आहे तिला समास म्हणतात. ,  (१) अव्ययीभाव – यात अव्यय हे प्रधान असून सामान्यतः पूर्वनिपाताने ते समासात पहिल्या स्थानी येते. म्हणून हा समास पूर्वपदप्रधान असतो. संपूर्ण सामासिकशब्द हा व्याकरणदृष्ट्या अव्यय म्हणूनच राहत असल्याने त्याला अव्ययीभाव अशी संज्ञा आहे. हा समास एकवचनी व नपुंसकलिंगी असतो.  उदा.,दररोज,यथाक्रम. (२) तत्पुरुष– हा समास उत्तरपदप्रधान असतो.या समासात दुसरे पद महत्वाचे असते. या समासाचे कर्मधारय, द्विगु, उपपदतत्पुरुष एवढेच उपप्रकार पाणिनीने सांगितले आहेत. परंतु विग्रहाच्या प्रकारानुसार अलिकडच्या काळात विभक्ति तत्पुरुष, प्रादितत्पुरुष, नञ्-तत्पुरुष हे सुद्धा उपप्रकार मानण्यात येतात. समासातील शेवटच्या शब्दानुसार संपूर्ण सामासिक शब्दाचे व्याकरणदृष्ट्या स्थान म्हणजे नाम किंवा विशेषण व लिंग ठरते. कर्मधारय– सामान्याधिकरण्यात म्हणजे दोन समान विभक्तींत (प्र...

केंद्र प्रमूख विभागीय परीक्षा 2023

बाल हक्क आयोग.. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची जुलै २००७ मध्ये स्वायत्त मंडळ म्हणून बाल हक्क संरक्षण कायदा २००५ (२००६ मधील ४) अन्वये राज्यातील बालकांच्या हक्कांचे संरक्षण, प्रचलन आणि रक्षण करण्यासाठी स्थापना करण्यात आली आहे. सी आर सी म्हणजेच बालहक्क परिषदेत निर्देषित मानांकना बरहुकूम वर्तणूकीकरिता आयोग विविध उपक्रम राबवितो. यामध्ये खाली दिलेल्या काही प्रमाण मानांकनांचा समावेश होतो: बालकांना सर्व प्रकारच्या जातीपाती, रंग, लिंग, भाषा, धर्म, राजकीय किंवा इतर मते, राष्ट्रीय पंरपरा किंवा सामजिक मुळ, संपत्ती, व्यंग किंवा इतर दर्जा याच्या भेदभावा पासून संरक्षण आहे. बालकांसंदर्भातील कृती मध्ये, बालकाच्या सर्वोत्तम हिताला सर्वाधिक प्राथमिकता दिली जाईल. बालकाला ओळख, नाव आणि राष्ट्रीयत्वाचा हक्क आहे. प्रत्येक बालकाला जन्मजात जीवन जगण्याचा, जिवनमानाचा आणि विकासाचा, कोणत्याही प्रकारच्या आजारावर सर्वोत्तम दर्जाचा उपचार मिळण्याचाही, बालकाच्या संपूर्ण क्षमतेने व्यक्तिमत्व विकासाचा, बुध्दिमत्ता आणि  शारीरिक क्षमता यांच्याकडे निर्देशित शिक्षणाचा अधिकार तसेच सामाजिक सुरक्षेचा अ...

#Mid day meal.केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा 2023

माध्यान्ह भोजन योजना ही भारतातील शालेय भोजन योजना आहे जी देशभरातील शालेय वयाच्या मुलांची पोषण स्थिती अधिक चांगली करण्यासाठी राबिण्यात  येत आहे.  योजनेचे नामकरण पोशन योजना असे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सरकारी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा, सरकारी अनुदानित अंगणवाड्या , मदरसा आणि मकतबमधील मुलांना कामाच्या दिवशी मोफत जेवण पुरवतो . प्राथमिक शाळांमध्ये दुपारचे जेवण पुरविण्याचा समावेश होता. 28 नोव्हेंबर 2001 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ही योजना लागू झाली.  1.27 दशलक्ष शाळा आणि शिक्षण हमी योजना केंद्रांमध्ये 120 दशलक्ष मुलांना सेवा देणारी, मध्यान्ह भोजन योजना ही जगातील सर्वात मोठी योजना आहे.भारत सरकारने 15 ऑगस्ट 1995 रोजी प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय पोषण सहाय्य कार्यक्रम (NP-NSPE) सुरू केला. प्राथमिक शाळेतील मुलांची पोषण स्थिती सुधारून प्राथमिक शिक्षणाची परिणामकारकता सुधारण्यास मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. . सुरुवातीला, सरकारी, सरकारी अनुदानित आणि स्थानिक संस्था चालवल्या जाणार्‍या शाळांमधील इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आहार दे...

केंद्र प्रमूख विभागीय परीक्षा 2023@RTE 2009

शिक्षणातील RTE चे पूर्ण रूप ‘Right To Education’ आहे ज्याला मराठीमध्ये शिक्षणाचा अधिकार म्हणतात. ही आपल्या संविधानाची कृती आहे. शिक्षण हक्क कायदा 2009, ज्याला RTE कायदा 2009 म्हणूनही ओळखले जाते, भारताच्या संसदेने 4 ऑगस्ट 2009 रोजी पारित केले आणि 1 एप्रिल 2010 रोजी लागू झाले.हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(A) अंतर्गत 6-14 वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण प्रदान करेल. या कायद्यामुळे देशात शिक्षण हा मूलभूत अधिकार बनला आहे. मुलांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार. – ‘सक्तीचे शिक्षण’ म्हणजे सहा ते चौदा वर्षे वयोगटातील मुलांचे प्रवेश, उपस्थिती आणि प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. मुलाकडून कोणतीही फी भरावी लागणार नाही ज्यामुळे त्याला असे शिक्षण पूर्ण करण्यापासून रोखता येईल. – प्रवेश न घेतलेल्या मुलास त्याच्या योग्य वयाच्या वयोगटातील प्रवेश देण्याची तरतूद आहे. – मुलाचे शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी संबंधित सरकारे, स्थानिक अधिकारी आणि पालकांची कर्तव्ये नमूद केली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारमधील आर्थिक भाराच्या वा...

केंद्र प्रमूख विभागीय परीक्षा 2023. #POCSO ACT 2012

  पॉक्सो कायदा... लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा. भारतीय संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकास  मूलभूत हक्क बहाल केले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने अंगिकारलेल्या बाल हक्कांबाबतच्या अधिसंधीस ११ डिसेंबर १९९२ रोजी भारत सरकारने मान्यता दिली आहे. यामध्ये बालकांच्या हिताचे संरक्षण करताना सर्व राज्यपक्षकारांनी पालन करावयाची मानके विहित केली आहेत. भारतीय संविधानातील अनुच्छेद १५(३) मध्ये इतर गोष्टींबरोबर बालकांसाठी विशेष तरतुदी करण्याकरिता राज्य सरकारला अधिकार दिलेले आहेत. ‘बालक’ ह्या संज्ञेमध्ये अठरा वर्षांखालील सर्व व्यक्तींचा समावेश होतो. बालक ही देशाची संपत्ती, उद्याची पिढी मानली जाते. तिचे योग्य प्रकारे पालनपोषण, संवर्धन व्हावे, निकोप शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास व्हावा, बालकांस अत्याचारांपासून संरक्षण मिळावे, बालपण सुदृढ राहावे, बालकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, बालकांचे बालपण, यौवन याचे लैंगिक शोषणापासून संरक्षण व्हावे ह्या मुख्य हेतूने ‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सस्युअल ऑफेन्सस ऍक्ट, २०१२’ (पॉक्सो कायदा) या नावाने केंद्र सरकार...

#UNICEF केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा 2023

Unicef युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. जगभरातील लहान मुलांना अन्न व आरोग्याची सेवा पुरविणे हे युनिसेफचे ध्येय आहे. 11 डिसेंबर 1 9 46 रोजी युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमरजन्सी फंड तयार करण्यात आला आणि दुसऱ्या महायुद्धाच्या धर्तीवर झालेल्या मुलांमध्ये आपत्कालीन अन्न आणि आरोग्य सेवा प्रदान करण्यात आली. बाल कुपोषणाच्या समस्येवर कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत युनिसेफ अविकसित देशांत कार्यशाळा आयोजित करते.भारतातही अशा कार्यशाळा होतात.त्यांना युनिसेफ मदत करते.पोलिश डॉक्टर लुडविक राजचमॅन यांना युनिसेफचे संस्थापक म्हणून ओळखले जाते आणि 1 9 46 पासून त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून कार्य केले. राजमॅनच्या मते अमेरिकेत मॉरीस पाटला 1 9 47 पासून 1 9 65 पर्यंत सेवा देणारी त्यांची पहिली कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1 9 50 मध्ये युनिसेफच्या सर्वत्र विकसनशील देशांतील मुलांच्या आणि महिलांच्या दीर्घकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी आदेश देण्यात आला. 1 9 53 मध्ये ते युनायटेड नेशन्स सिस्टमचे कायमस्वरुपी भाग बनले आणि "आंतरराष्ट्रीय" आणि "आणीबाणी" शब्द स...

केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा २३@SCERT

महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रम निश्चिती प्रक्रीयेत सहभागी शासकीय संस्थांपैकी एक बालभारती संस्थे सोबतची कार्यरत संस्था. MSCERT 1964 साली पुणे येथे स्थापन झाली. स्थापना जानेवारी 1964 ब्रीदवाक्य :-ज्ञानसेवा तु साफल्यम् उद्दिष्ट:- प्राथमिक शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता सुधारणे मुख्यालय:- पुणे मुख्य कार्य:- प्राथमिक शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी अभ्यासक्रम विकसन मूल्यमापन व शिक्षक प्रशिक्षण देणे शासन निर्णय शिक्षण व समाज कल्याण विभाग 10 63 19 10 63 अन्वे जानेवारी 64 मध्ये राज्य शिक्षण शास्त्र संस्था या नावाने प्राथमिक शिक्षणाचा दर्जा गुणवत्ता सुधारण्यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली. शिक्षण शास्त्र संस्था या नावाने सन १९६४ मध्ये स्थापन झालेल्या संस्थेचे नामांतरण सण 1984 मध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद असे करण्यात आले कोठारी आयोगाच्या शिफारिनुसार शिफारशीनुसार एनसीईआरटीच्या धर्तीवर या एस सी ई आर टी ही संस्था स्थापन करण्यात आली.. दिनांक 17 ऑक्टोबर 2016 च्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला विद्या प्राधिकरण असे ...

केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा 2023 @NCERT

NCERT केंद्र प्रमुख विभागीय परीक्षा 2023 National Council of Education Resaerch and Training ही भारत सरकारची सर्वोच्च शैक्षणिक संस्था आहे. याचे मुख्यालय श्री अरविंद मार्ग, नवी दिल्ली येथे आहे,  शालेय शैक्षणिक मुद्यांवर केंद्र सरकारच्या मदतीसाठी इ. स. १९६१ मध्ये या परिषदेची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद  एनसीआरटीची काही प्रमुख उद्दीष्टे पुढीलप्रमाणे: राष्ट्रीय शिक्षणाची रूपरेषा कार्यान्वित करणे प्राथमिक शिक्षणाचे साधारणीकरण (युईई) व्यावसायिक शिक्षण विशेष गरज असलेल्या समुहांचे शिक्षण शिशु शिक्षण माहिती तंत्रज्ञान सुधारासाठी परीक्षा व गुणदान स्पर्धात्मक गुणवेत्तेचे शिक्षण बालिका शिक्षण अध्ययन-अध्यापन अनुभव तयार करणे अध्यापन शिक्षणामध्ये सुधार योजना. अध्यक्ष  (केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री),  सदस्य - विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष,  सर्व राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण मंत्री,  चार विभागांतील विद्यापीठां पैकी चार विद्यापीठांचे कुलगुरू,  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष,  केंद्रीय मान...

#केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा 2023 # शाळा व्यवस्थापन समिती@school management committee

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील भाग-चार, कलम २१ अनुसार प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये, शाळा व्यवस्थापन समिती (School Management Committee)  दिनांक ३० सप्टेंबर, २०१० पूर्वी स्थापन करणे अनिवार्य राहील. या शासन निर्णयानुसार शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. शाळा व्यवस्थापन समितीची रचना कार्ये अधिकर शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ शाळा व्यवस्थापन समिती महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक: पीआरई २०१०/प्र.क्र.२१७/प्राशि १ दिनांक: १७ जून २०१० वाचा - १) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९. २) मुंबई प्राथमिक शिक्षण नियम १९४९. प्रस्तावना :  केंद्र सरकारने सन २००२ च्या ८६ व्या संविधान विशोधन अधिनियमान्वये अनुच्छेद २१ (अ) मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचा समावेश केला आहे. त्यानुसार सहा ते चौदा वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा अधिनियम, Right of Children to Free and Compulsory Education Act, २००९ (No. ३५. २००९), केंद्र शासनाने पारित करून तो भारत सरकारच...

"NIPUN" भारत अभियान. #NIPUN Bharat

विभागीय केंद्रप्रमुख परीक्षा २०२३ "NIPUN"  भारत अभियान.. "NIPUN BHARAT चा Full Form  ...NationaI Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy" *म्हणजेच बालकांमध्ये मुलभूत वाचन , समज आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित करणे.  *मुलांना साक्षर बनवणे. *मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान हेच निपुण भारत मिशन कार्यक्रमाचे लक्ष आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (RTE Act 2009) लागू झाल्यापासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर अधिक लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाची हमी RTE Act 2009 प्रमाणे समाजातील सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांना मिळत आहे. यामध्ये सर्व बालकांचा समावेश करण्यात आला आहे. भविष्यातील देशाची प्रगती ही आज ज्या पध्दतीचे शिक्षण आपण मुलांना देतो त्यावर उद्याचे भविष्य अवलंबून असते. नुकतेच केंद्र शासनाने NEP 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जाहीर केले. आणि शिक्षण क्षेत्रातील एक महत्वाचा बदल आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत दिसून येणार आहे. याच धर्तीवर केंद्र शासनाच्या शिक्षा...

केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा 2023@ NEP 2020 ..#शालेय संकुलाच्या माध्यमातून शालेय शिक्षणामध्ये अनुशासन: -

  - शालेय संकुलाच्या माध्यमातून शालेय शिक्षणामध्ये अनुशासन : - ------------------------------ NEP2020---    शालेय संकुलात  उपलब्ध साधने एकमेकासोबत वाटून घेता यादीत व शालेय अनुशासन अधिक स्थानिक ,प्रभावी व कार्यक्षम व्हावे या उद्देशाने शाळांना “ शालेय संकुल ” गटबद्द करण्यात आलेआहे . सध्या अनेक शासकीय शाळांना विशेष त्या छोट्या शाळांना साधनाची टंचाई जाणवत असल्याची समस्या समोर आली आहे , शालेय संकुलाची उभारणी केल्या मुळे हा प्रश्न निकालात निघेल. त्यांचे भौगोलिक स्थलांतर न करताही त्या एकाच  संस्थात्मक प्रशासकीय छताखाली आणल्या जातील. त्यामुळे मुलांसाठी कोणतीही तडजोड किंवा गैरसोय  निर्माण न होता अतिशय प्रभावी व कार्यक्षम प्रशासकीय यंत्रणा अस्तित्वात येईल. २०२३पर्यंत राज्य शासन लोकसंख्येचे प्रमाण संधानाता व इतर  स्थानिक मुद्द्यांचा विचार करून शाळांना विविध शालेय संकुलामध्ये गटबद्ध करेल ,गटबद्ध कण्याच्या या उपक्रमामध्ये  विद्यमान शाळांच्या अवस्थांचे पुनर्विलोकन करून ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या अतिशय कमी आहे ( उदा . 20 पेक्षा कमी विद्यार्थ...

#केंद्र प्रमुख विभागीय परिक्षा 2023 @ भारतीय शिक्षण आयोग

# भारतीय शिक्षण आयोग भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात तसेच स्वातंत्र्यानंतरही शैक्षणिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी व शिक्षणव्यवस्थेसंबंधी शिफारशी करण्यासाठी अनेक समित्या व आयोग  नेमले गेले. त्या आयोगांपैकी  भारतीय शिक्षण आयोग (१८८२),  भारतीय विदयापीठ आयोग (१९०२),  कलकत्ता विदयापीठ आयोग (१९१७), विदयापीठ शिक्षण आयोग (१९४८),  मुदलियार आयोग (१९५२),  भारतीय शिक्षण आयोग (१९६४-१९६६) आणि राष्ट्रीय शिक्षक आयोग (१९८५)  राष्ट्रीय शिक्षण नीती (२०२०) यांचा या नोंदीत विचार केला आहे. भारतीय शिक्षण आयोग (हंटर आयोग) : इंडियन एज्युकेशन कमिशन. ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष सर   चार्ल्स वुड यांच्या सांगण्यावरून कंपनीने जे शैक्षणिक आदेश दिले,  त्यांना वुडचा खलिता किंवा  वुडचा अहवाल  असे संबोधले जाते.  हा अहवाल १९ जुलै १८५४ रोजी प्रसृत करण्यात आला. हा खलिता  इतका सर्वसमावेशक होता की, भारतातील शैक्षणिक धोरणावर त्याचा पुढील पन्नास वर्षे प्रभाव टिकला. प्राथमिक शिक्षणाची प्रगती इ. स. १८५४ ते १८८२ या कालखंडात अप...

#क्रांतीसुर्य बिरसा मुंडा

बिरसा मुंडा     झारखंड येथे नबेंदु सेन यांची बिरसा मुंडा पुतळा बिरसा मुंडाचा नारा ब्रिटिश राज-अबू राज सेटर जन, महाराणी राज तुंडू जन "राणीचा राज्य संपुष्टात येऊ द्या आणि आमचे राज्य स्थापन होऊ द्या"यांना धमकी देत ​​आहे - आज उडीसा, बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशातील प्रदेशांमध्ये याद आहे. ब्रिटिश औपनिवेशिक व्यवस्थेने आदिवासी कृषी व्यवस्थेस सामंतिक स्थितीत रूपांतरित केले. आदिवासींनी त्यांच्या मूळ तंत्रज्ञानामुळे अधिशेष निर्माण करू शकले नाही, म्हणून छोटानागपुरमधील प्रमुखांनी आदिवासींना शेतकरी स्थापन करण्यास व शेतकरी म्हणून नियुक्त करण्यासाठी आमंत्रित केले. यामुळे आदिवासींनी घेतलेल्या जमिनींचा विपर्यास झाला. थाकाडर्सची नवीन वर्ग अधिक दडपशाही प्रकाराची होती आणि त्यांची बहुतेक मालमत्ता बनविण्यास उत्सुक होती.१८५६ मध्ये जगिर ६०० वाजले आणि ते एका गावातून १५० गावांमध्ये गेले. परंतु १८७४ पर्यंत जुने मुंडा किंवा ओराणचे नेते यांचे अधिकार जवळपास जमीनदारांनी सादर केलेल्या शेतकऱ्यांकडून संपूर्णपणे रद्द करण्यात आले होते. काही गावांमध्ये त्यांनी त्यांचे मालकी हक्क गमावले आणि शेत...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...