मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

चक्रधर स्वामी अवतार दिवस

चक्रधर स्वामी अवतार दिवस हा महाराष्ट्रातील महान संत आणि महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त साजरा केला जातो. चक्रधर स्वामी हे 13व्या शतकातील एक महान संत होते, ज्यांनी महानुभाव पंथाची स्थापना केली. या पंथाचा प्रमुख उद्देश एकेश्वरवाद, साधी जीवनशैली आणि भक्ति मार्गाचा प्रसार करणे होता.  चक्रधर स्वामी यांचा अवतार दिवस अत्यंत भक्तिभावाने आणि धार्मिक विधींनी साजरा केला जातो. त्यांच्या अनुयायांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण या दिवशी ते त्यांच्या गुरूंना आदर आणि प्रेमभाव व्यक्त करतात. चक्रधर स्वामींची जीवनकथा: चक्रधर स्वामी मूळचे गुजरातमधील असल्याचे मानले जाते. त्यांनी आपल्या जीवनात समाजाच्या विविध वर्गांसाठी काम केले आणि जात-पात, धर्मभेद यांना बाजूला ठेवून मानवतेची शिकवण दिली. त्यांनी अनेक ठिकाणी फिरून लोकांना धार्मिकता, साधेपणा, आणि अध्यात्मिक जीवनाचे महत्त्व पटवून दिले. महानुभाव पंथ: चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला महानुभाव पंथहा एक आध्यात्मिक आणि धार्मिक पंथ आहे, ज्यात भगवान कृष्णाला सर्वोच्च देवता मानले जाते. या पंथात भक्ती, त्याग, आणि धर्माची शि...

शिक्षक दिनाचे महत्त्व

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन  हे भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि महान तत्त्वज्ञ, शिक्षक, तसेच शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तामिळनाडूच्या थिरुत्तनी गावात झाला. डॉ. राधाकृष्णन यांचे संपूर्ण जीवन शिक्षण, तत्त्वज्ञान आणि मानवी मूल्यांच्या प्रसाराला समर्पित होते. त्यांच्या महान कार्यामुळे त्यांच्या जयंतीला म्हणजेच 5 सप्टेंबरला भारतात शिक्षक दिनसाजरा केला जातो. शिक्षण आणि प्रारंभिक जीवन: डॉ. राधाकृष्णन यांनी आपल्या शिक्षणाचा प्रारंभ तामिळनाडूमध्येच केला. त्यानंतर त्यांनी ख्रिश्चन मिशनरी संस्थेत शिक्षण घेतले आणि तत्त्वज्ञानात विशेष रुची निर्माण केली. त्यांनी पश्चिम आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा गहन अभ्यास केला आणि दोन्ही विचारसरणींचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला.  तत्त्वज्ञान आणि विचार: डॉ. राधाकृष्णन यांचे तत्त्वज्ञान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होते. त्यांनी वेद, उपनिषदे आणि भगवद्गीता यांवर आधारित भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रचार केला आणि पश्चिमेतील तत्त्वज्ञांशी त्याची तुलना केली. त्यांनी अध्यात्म आणि धार्मिकता यांचा अर्थ मानवतेशी जोडला आणि मानवी जीवनातील शांती व सौहार्द यांवर...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...