मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

आईचे डोळे* - श्री. प्रविण दवणे.

  *आईचे डोळे*                                                                                         - श्री. प्रविण दवणे.   सुंदर कथा आहे कृपया पालकांनी आपल्या मुलांना जरूर एकदा ही कथा वाचून दाखवावी.-           गुणवत्ता यादीत चमकलेल्या रामकुष्णाच अभिनंदन करण्यासाठी मी फुलांचा गुच्छ घेऊन त्याचं घर शोधत गेलो. घर शोधता शोधता प्रश्न पडला- 'अशा झोपडपट्टीत राहतो रामकुष्ण ? पण राहतो किती नीटनेटका.' त्याच्या व्यक्तीमत्वातील टापटिपीवरून त्याच्या घराचा बांधलेला अंदाज साफ कोसळला होता.        गटारांची अनेक जाळी धडपडत ओलांडत एका फळकुटाच्या झोपडीजवळ गेलो. 'इथंच तो राहतो', म्हणून कुणीतरी सांगितलं.        काळोखातून प्रकाश बाहेर यावा तसा सलील माझ्या आवाजानंच बाहेर आला. "सर ?" आत गेलो. "अभिनंदन!" गुच्छ देत म्हटलं...

21 डिसेंबर गुरु -शनि महायुतीचे बना प्रत्यक्ष साक्षीदार*🪐🪐🌔

 21 डिसेंबर गुरु -शनि महायुतीचे बना प्रत्यक्ष साक्षीदार       सरत्या वर्षात *२१ डिसेंबरची रात्र* आपल्यासाठी एक दुर्मिळ योग घेऊन येत आहे. गेल्या चारशे वर्षात न दिसलेली एक आकाशीय घटना या रात्री घडणार आहे. २१ डिसेंबरला रात्री *साडेसात ते साडेनऊ* या वेळात पश्चिमेला आकाशात तेजस्वी आणि आपल्या *सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आणि शनी एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत.* हे दृश्य नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे.  🌎पृथ्वीवर आज घडीला जिवंत असलेल्या कुणीही हे दृश्य पाहिलेले नाही आणि या नंतर त्यासाठी २०८० सालची प्रतीक्षा करावी लागेल. अर्थात *गुरु आणि शनी* हे ग्रह जवळ येण्याची घटना दर २० वर्षांनी घडते पण यावेळी ते जितके एकमेकांच्या जवळ आहेत ते *यापूर्वी ४०० वर्षांपूर्वी घडले होते.* या युतीला ग्रेट कंजेशन असे म्हटले जाते. *आपल्या ग्रहमालिकेत गुरु पाचवा तर शनी सहावा ग्रह आहे पण दोघांच्या सूर्यप्रदक्षिणेला लागणारा काळ वेगवेगळा आहे.* या पूर्वी असा योग १६ जुलै १६२३ रोजी आला होता आणि त्यावेळी *दुर्बिणीचा शोध लावणारा गॅलिलिओ जिवंत होता पण दुर्बिणीचा शोध त्यावेळी लागलेला नव्हता....

Buddhism in Odisha

ओरिसा - बौद्ध संस्कृतीचा समृद्ध वारसा  Buddhism in Odisha भारतामधील ओरिसा राज्याचे मूळ नाव ओद्र-देसा असून ते बौद्ध संस्कृतीतून उदयास आले आहे. इथल्या प्रत्येक जिल्ह्यात डोकावून बघितल्यास अक्षरशः हजारो पुरातन बौद्ध स्थळे दिसून येतील. यांची नावे आज जरी बदलली असली तरी मूळ संस्कृती अवशेष काही नष्ट झाले नाहीत. आंध्रप्रदेशाची किनारपट्टी ते पश्चिम बंगाल किनारपट्टी पर्यंतचा भाग पुरातन बौद्ध स्थळांनी भरलेला आहे. बंगालच्या उपसागराला लागून असलेले ओरिसा राज्य हे आंध्रप्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगाल यांच्या सीमांनी पूर्ण वेढले आहे. एकेकाळच्या या उत्कल प्रांतात सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर सर्व कायापालट केला. धम्मप्रसारासाठी १९ तुकड्या स्थापित केल्या. त्यामुळे त्यांच्या काळातच बौद्ध संस्कृतीची भरभराट येथे झाली. थेरवाद, महासंघीका आणि सर्वस्तीवाद या शाखा तेथे लोकप्रिय झाल्या. म्हणूनच या राज्याच्या केंद्रभागी 'बौद्ध' नावाचा जिल्हा असून इतरही नावे बघितल्यास बौद्ध संस्कृतीची खाणच इथे असल्याचे दिसते. गजापती, गंजम, पुरी, भद्रक, देवगढ, बारगढ, अंगुल, जाजपुर, बालनगीर, बालेश्वर अशा अनेक जिल...
शरद गोविंद पवार !       माणसाच्या जन्माची कौटुंबिक पार्श्वभूमी त्याचे प्राक्तन कसे घडणार, हे सुनिश्चीत करत असतेच. शून्यातून विश्व निर्माण करणारांना लाभलेला शून्याचा आकार केवढा होता हे पाहण्याची आपली पद्धत नाही. प्रत्येकाच्या वाट्याला आलेला शून्य देखील सारखा नसतोच. पवारांना लाभलेला शून्य काळाच्या बराच पुढचा होता.      शरद गोविंद पवार हे नाव कुठल्याही सामान्य माणसाला सहज चपखल बसू शकेल. या नावाचा शेतमजूर असू शकतो. गवंडी किंवा शाळेत शिपाई देखील असू शकतो. गावाचे नाव सुद्धा काटेवाडी म्हणजे फार काही आकर्षक नाही. शिक्षण बी.कॉम. म्हणजे आजच्या काळात तेही फार मोठे नाही. पण हा जन्मला एका सत्यशोधकी विचारांच्या कुटुंबात. १८८५ला कॉन्ग्रेस पक्षच स्थापन झाला असे नाही. पुण्यात फर्ग्युसन कॉलेज देखील त्याच वर्षी स्थापन झाले आणि नीरा उजवा कालवा देखील त्याच वर्षी वाहू लागला. बारामतीचे शेतकरी बागायतदार झाले. पाच दशकांची बागायती सुबत्ता वारसा म्हणून पवार कुटुंबात नांदल्यावर १९४०ला शरद पवार जन्मले‌. आर्थिक, सामाजिक व वैचारिक सुबत्तेचे हे संचित पवारांच्या घरात राजकीय सुबत्ता देखील घ...

आकाश मोजतो आम्ही, भिमा तुझ्यामूळे.... वादळ ही रोखतो आम्ही,. भिमा तुझ्यामूळे. डॉ . भिमराव आंबेडकर हे मुंबई राज्याचे राज्यसभा सदस्य होते.स्वातंत्र्य पूर्व काळात ब्रिटिश सरकारमध्ये बाबासाहेबांनी बांधकाम व उर्जा मंत्री म्हणून उत्तम काम केले आहे.बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पी.एच.डी.पदवी मिळविली.तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले.त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते एक अर्थशास्त्रज्ञ,प्राध्यापक आणि वकील होते,त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले.ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले,वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान आहेइ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोक संस्कृतीत उभारली गेली आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते.मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती. त्यामुळे मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारांत शुद्ध विचाराला व शुद्ध आचाराला महत्त्वाचे स्थान होते. रामजी हे मालोजींचे चौथे अपत्य होते.रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व इंग्रजी सैन्याच्या तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी हे धार्मिक वृत्तीचे होते.त्यांनी संत कबीराचे दोहे, ज्ञानेश्वर,नामदेव,चोखोबा, एकनाथ,तुकाराम इत्यादी संतांचे अभंग पाठ केले होते.ते रोज ज्ञानेश्वरी वाचत!डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्यप्रदेशातील महू या गावी झाला त्यावेळी रामजी हे महू गावात सुभेदार होते.त्यांचे मुळ गाव महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील अंबावडे हे होते.बाबासाहेब यांचे प्राथमिक शिक्षण महू,सातारा व मुंबई मध्ये पुर्ण झाले.बाबासाहेब मॅट्रिकची परिक्षा पास झाल्यानंतर पुढे शिक्षणाची परिस्थिती नव्हती त्यावेळी केळुसकर गुरूजी,सयाजीराव गायकवाड व शाहू महाराज यांनी शिक्षणासाठी मदत केली.बाबासाहेब हे बालवयापासूनचं प्रचंड हुशार प्रगल्भ बुध्दीचे होते.त्यांना पदोपदी जातीय चटके बसू लागल्याने ते पेटून उठले व आपल्या समाजाचे प्रश्न भारतीय नेते, इंग्रज सरकार समोर मांडु लागले व आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजासाठी काम करून संविधानाच्या माध्यमातून त्यांना हक्क मिळवून दिले.त्यांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी हिंदू कोडबील आणले.त्यांचे असे म्हणने होते की, मुलींना वडीलांच्या संपत्तीत जो पर्यंत वाटा मिळत नाही तो पर्यंत त्या कुटूंबाची आर्थिक उन्नती होऊ शकत नाही.संविधानाच्या मसुदा समितीतील प्रत्येक सदस्याने कोणते ना कोणते कारण सांगून माघार घेतली.व शेवटी बाबासाहेबांनी अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून 2 वर्षे 11 महिने व 17 दिवसात भारतीय घटना लिहिली.म्हणूनच बाबासाहेबांना भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत!!!भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते.आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात विद्यावाचस्पती पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवरील संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकीर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनानीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे संस्कृतीत केली गेली आहेत. आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते.त्यांनी नोव्हेंबर, १८९६ ते नोव्हेंबर १९२३ अशा २७ वर्षांत मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ, आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५०च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्यात,१४एप्रिल हा दिवस आमच्या साठी प्रेरणा देणारा दिवस आहे.१एप्रिलच्या सुरूवातीला रिझर्व्ह बॅंकेची स्थापना ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या" द प्राब्लेम ऑफ रुपी"या पबंधानुसार झाली.त्यामुळे जगातीलसर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव करीत रिझर्व्ह बॅंकेचा स्थापना दिन साजरा होतो.भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी डॉ बाबासाहेबाचेविचार मार्गदर्शक ठरतात.डॉ.बाबासाहेबांनी बहुजन वर्गाला स्पृश्यास्पृश्यतेच्या अमानुष भेदभावाच्या दृष्टचक्रातून बाहेर काढूनदेशाच्या, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले.निरक्त क्रांतीपर्वाचे उद्गातेमहामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हेसमतेच्या युगाचे युगप्रवर्तक महापुरुष आहेत.संविधानाचे शिल्पकार म्हणूनभारताचे भविष्यविधाते , आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्माते ठरलेल्या डॉ आंबेडकरांनी सर्वांना राष्ट्रप्रेमाचीशिकवण दिली.ते नेहमी म्हणत की.मीप्रथम भारतीय आणि अंतिमतः ही भारतीयच आहे.धर्म, प्रांत, भाषेपेक्षा राष्ट्र श्रेष्ठ आहे.हे विचार दिले.त्यामुळे आम्ही राष्ट्राभिमानी झालोय.डॉ बाबासाहेबांनी भारताला दिलेले संविधान हे जगातील सर्व श्रेष्ठ संविधान आहे.सामाजिक ,आर्थिक समता, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभावबंधुता, न्याय, स्वातंत्र्य या मुल्यामुळेसंविधान मजबूत आहे.भारतीय लोकशाहीचा झेंडा उंच डोलाने फडकत असून त्याचा मजबूत पाया भारतीय संविधान आहे.प्रत्येक भारतीयांसाठी संविधान प्राण ठरल्या मुळे ते मानत आहेत संविधानातून सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. भारतीय म्हणून राष्ट्राभिमानी झालो पाहिजे. १४एप्रिल हा दिवस आमच्या साठी प्रेरणा देणारा दिवस आहे.१एप्रिलच्या सुरूवातीला रिझर्व्ह बॅंकेची स्थापना ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या" द प्राब्लेम ऑफ रुपी"या पबंधानुसार झाली.त्यामुळे जगातीलसर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव करीत रिझर्व्ह बॅंकेचा स्थापना दिन साजरा होतो.भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी डॉ बाबासाहेबाचेविचार मार्गदर्शक ठरतात.डॉ.बाबासाहेबांनी बहुजन वर्गाला स्पृश्यास्पृश्यतेच्या अमानुष भेदभावाच्या दृष्टचक्रातून बाहेर काढूनदेशाच्या, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले.निरक्त क्रांतीपर्वाचे उद्गातेमहामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हेसमतेच्या युगाचे युगप्रवर्तक महापुरुष आहेत.संविधानाचे शिल्पकार म्हणूनभारताचे भविष्यविधाते , आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्माते ठरलेल्या डॉ आंबेडकरांनी सर्वांना राष्ट्रप्रेमाचीशिकवण दिली.ते नेहमी म्हणत की.मीप्रथम भारतीय आणि अंतिमतः ही भारतीयच आहे.धर्म, प्रांत, भाषेपेक्षा राष्ट्र श्रेष्ठ आहे.हे विचार दिले.त्यामुळे आम्ही राष्ट्राभिमानी झालोय.डॉ बाबासाहेबांनी भारताला दिलेले संविधान हे जगातील सर्व श्रेष्ठ संविधान आहे.सामाजिक ,आर्थिक समता, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभावबंधुता, न्याय, स्वातंत्र्य या मुल्यामुळेसंविधान मजबूत आहे.भारतीय लोकशाहीचा झेंडा उंच डोलाने फडकत असून त्याचा मजबूत पाया भारतीय संविधान आहे.प्रत्येक भारतीयांसाठी संविधान प्राण ठरल्या मुळे ते मानत आहेत संविधानातून सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. भारतीय म्हणून राष्ट्राभिमानी झालो पाहिजे.अशी भावना मनामनात जागी करणे हेच खरे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजच्या दिवशी अभिवादन ठरेल.......

७ कोटीचा ZP गुरुजी - रणजितसिंह डीसलेसोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीरजगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव, भारताला पहिल्यादाचं मिळाला सन्मान* युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ आज जाहीर झाला असून सोलापूर च्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार आज जाहीर झाला। लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली। असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत। जगभरातील 140 देशांतील 12 हजार हुन शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे। QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनवं क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल। डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंड करीता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशिलतेला चालना मिळेल.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...