मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...
अलीकडील पोस्ट

छत्रपती शाहू महाराज..

छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते. ते कागलच्या घराण्यात जन्मले. लहानपणापासूनच त्यांच्यावर संस्कारशील आणि प्रगत विचारांचे वातावरण होते. त्यांच्या शिक्षणावर विशेष भर देण्यात आला. 1894 मध्ये त्यांना कोल्हापूरच्या राजघराण्यात दत्तक घेण्यात आले आणि त्यानंतर ते कोल्हापूर संस्थानचे राजे झाले. हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. याच क्षणापासून त्यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग समाजहितासाठी करण्यास सुरुवात केली. राज्यकारभाराची सूत्रे हाती घेणे राज्यकारभार हाती घेतल्यानंतर त्यांनी त्वरित अनेक सुधारणा सुरू केल्या. त्यांनी प्रशासन अधिक न्याय्य आणि लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यावर उपाययोजना केल्या. शाहू महाराजांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या सुधारणा. त्यांनी शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले. हा निर्णय त्या काळात अत्यंत धाडसी होता. त्यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू केली आणि शिष्यवृत्ती योजना राबवली. 1902 स...

जागतिक पुस्तक दिन

जागतिक पुस्तक दिवस सकाळची शांत वेळ, उगवत्या सूर्याची कोवळी किरणं खिडकीतून आत डोकावतात आणि समोर कपाटात ठेवलेली, धुळीनं झाकलेली पुस्तकं शांतपणे काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या पानांमध्ये  अखंड जीवनाच्या असंख्य गोष्टी बंदिस्त असतात. आज जागतिक पुस्तक दिन! आणि हाच तो दिवस, ज्या दिवशी जगातील सर्वश्रेष्ठ नाटककार विल्यम शेक्सपियर यांचा जन्म झाला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. म्हणूनच, हा दिवस  पुस्तकांच्या रूपाने  गौरव करण्यासाठी आहे. कोणतेही पुस्तक एका दिवसात जन्म घेत नाही. लेखकाच्या मनात कल्पनेची एक ठिणगी पडते. तो त्याच्या मनातल्या भावना, विचार, अनुभव यांना शब्दांत पकडू लागतो. लिहिताना तो रडतो, हसतो, जगतो. त्याच्या डोळ्यांत झोप नसते, हातात थरथर असते. प्रत्येक वाक्य म्हणजे त्याच्या आत्म्याचा एक अंश. हे पुस्तक तुमच्या हातात पोहोचेपर्यंत अनेक टप्पे पार करते,कागद, संपादन, मुद्रण, वितरण. ते केवळ शब्द नाहीत, तर लेखकाच्या हृदयाचा ठाव असतात. कधी तुम्ही कपाट उघडलंय का?          तिथे  रांगेत लावलेली पुस्तकं तुमच्याकडे बघत म्हणत अस...

"राष्ट्रीय विज्ञान दिवस"

भारताचे मिशन मंगळ: "वैज्ञानिक प्रगतीची नवी उंची" राष्ट्रीय विज्ञान दिवस (National Science Day) दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी भारतात साजरा केला जातो. हा दिवस प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक सी. व्ही. रमण यांनी १९२८ मध्ये शोधलेल्या "रमण प्रभाव" (Raman Effect) या महत्त्वपूर्ण शोधाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. या शोधाबद्दल त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. विज्ञानाच्या तेजस्वी सूर्यप्रकाशात भारताने आपल्या बुद्धिमत्तेच्या दीपस्तंभाने आकाश व्यापले आहे. अंतराळाच्या अथांग गूढतेत भारतीय विज्ञानाने आपल्या कौशल्याने एक नवा तारा प्रज्वलित केला , "मिशन मंगळ"! भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या ISROप्रयत्नांनी, अथक परिश्रमांनी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने 2013 मध्ये इतिहास रचला गेला. मंगळयान, हा भारताच्या विज्ञानाच्या कुशीतून जन्मलेला तेजस्वी मोती, अवकाशाच्या गूढतेत नांदणाऱ्या लाल ग्रहाला स्पर्श करू पाहत होता.ही मोहीम म्हणजे केवळ एक यान नव्हे, तर भारताच्या वैज्ञानिक क्षमतेची भव्य गगनभरारी होती. संपूर्ण जगाच्या नजरा भारताकडे लागल्या होत्या आणि भारताने त्या अपेक्...

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...