मुख्य सामग्रीवर वगळा

#covid 19 second Wave #कोरोना व्हायरस : लहान मुलांमध्ये ही लक्षणं दिसल्यास सतर्क व्हा..

कोरोना व्हायरस : लहान मुलांमध्ये ही लक्षणं दिसल्यास सतर्क व्हा..



लहान मुलांमध्ये अतिसार, उलटी आणि पोटदुखी ही कोरोना संसर्गाची लक्षणं असू शकतात, असा ब्रिटीश संशोधकांचा दावा आहे.

क्विंस युनिव्हर्सिटी बेलफास्टमध्ये कोरोना विषाणू आणि लहान मुलं या विषयावर संशोधन सुरू आहे. या संशोधकांच्या मते कोरोना विषाणूची जी लक्षणं सांगितली जात आहेत त्यात या नवीन लक्षणांचाही समावेश करायला हवा.

सध्या कोरोना विषाणूची तीनच अधिकृत लक्षणं आहेत - ताप, खोकला, गंध आणि चव जाणे. यापैकी कुठलंही लक्षण असणाऱ्या व्यक्तीला होम आयसोलेशनचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच त्या व्यक्तीला कोव्हिड-19 चाचणी करण्यासही सांगण्यात आलं आहे.

मात्र, लहान मुलांबाबत ब्रिटीश संशोधक करत असलेल्य या अभ्यासावरून लक्षणांच्या यादीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संशोधनात जवळपास एक हजार लहान मुलांचा समावेश करण्यात आला. मेडरिक्स या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार 992 मुलांपैकी 68 मुलांच्या शरिरात कोरोना विषाणूविरोधातल्या अँटीबॉडीज आढळल्या.
ज्या मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत त्यातल्या निम्म्या मुलांमध्ये कोव्हिड-10 ची लक्षणंही आढळली आहेत. मात्र, यापैकी एकाही मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडली नाही.

या संशोधन कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. टॉम वॉटरफिल्ड सांगतात, "चांगली बाब म्हणजे विषाणूमुळे मुलांची प्रकृती फार ढासळली नाही. मात्र, त्या संक्रमित मुलांकडून विषाणू इतर किती मुलांपर्यंत पोहोचला, हे आपल्याला माहिती नाही. आमच्या संशोधनात मुलांमध्ये अतिसार आणि उलट्या ही लक्षणं म्हणून दिसली. 

अमेरिकेतल्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने कोव्हिड-19 च्या लक्षणांमध्ये मळमळ, उलटी आणि अतिसार यांचा समावेश केलेला आहे.

यापूर्वी ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्विसने कोरोना विषाणूची तीन लक्षणं सांगितलेली आहेत.

ही लक्षणं आढळताच तुम्ही सतर्क होऊन सर्व ती काळजी घ्यायची आहे. यात वैद्यकीय सल्ला घेण्याचाही समावेश आहे.

तीन लक्षणं कुठली?

सारखा खोकला येणं - कोरोनाची लागण झालेली असल्यास सारखा खोकला येऊ शकतो. एकदा खोकल्याची उबळ आली की, जवळपास तासभर किंवा त्याहून अधिक वेळेसाठी खोकला येऊ शकतो. 24 तासात तीन किंवा त्याहून जास्त वेळा अशी उबळ येऊ शकते. खोकल्यामध्ये कफ असल्यास तेसुद्धा काळजीचं कारण असू शकतं.

ताप - या विषाणूमुळे थंडी वाजून ताप येताना दिसतो.



गंध आणि चव जाणे - तज्ज्ञांच्या मते खोकला आणि ताप याव्यतिरिक्त हेदेखील कोरोना विषाणूची लागण झाल्याचं महत्त्वाचं लक्षण असू शकतं, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

त्यामुळे तुम्हाला किंवा तुम्ही ज्यांच्यासोबत रहाता त्यापैकी कुणाला यातलं एकही लक्षण आढळल्यास घरीच आयसोलेट व्हा, जेणेकरून इतर कुणाला संसर्ग होऊ नये.

अमेरिकेतल्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) या संस्थेच्या म्हणण्यानुसार थंडी वाजणे, थरथरणे, अंगदुखी आणि घसा खवखवणे हीसुद्धा कोरोना विषाणूची लागण झाल्याची लक्षणं असू शकतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.