मुख्य सामग्रीवर वगळा

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा 2023@ NEP 2020 ..#शालेय संकुलाच्या माध्यमातून शालेय शिक्षणामध्ये अनुशासन: -

 - शालेय संकुलाच्या माध्यमातून शालेय शिक्षणामध्ये अनुशासन: -

------------------------------

NEP2020---

   शालेय संकुलात उपलब्ध साधने एकमेकासोबत वाटून घेता यादीत व शालेय अनुशासन अधिक स्थानिक ,प्रभावी व कार्यक्षम व्हावे या उद्देशाने शाळांना शालेय संकुल गटबद्द करण्यात आलेआहे . सध्या अनेक शासकीय शाळांना विशेष त्या छोट्या शाळांना साधनाची टंचाई जाणवत असल्याची समस्या समोर आली आहे ,

शालेय संकुलाची उभारणी केल्या मुळे हा प्रश्न निकालात निघेल. त्यांचे भौगोलिक स्थलांतर न करताही त्या एकाच  संस्थात्मक प्रशासकीय छताखाली आणल्या जातील. त्यामुळे मुलांसाठी कोणतीही तडजोड किंवा गैरसोय  निर्माण न होता अतिशय प्रभावी व कार्यक्षम प्रशासकीय यंत्रणा अस्तित्वात येईल.

२०२३पर्यंत राज्य शासन लोकसंख्येचे प्रमाण संधानाता व इतर  स्थानिक मुद्द्यांचा विचार करून शाळांना विविध शालेय संकुलामध्ये गटबद्ध करेल ,गटबद्ध कण्याच्या या उपक्रमामध्ये  विद्यमान शाळांच्या अवस्थांचे पुनर्विलोकन करून ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या अतिशय कमी आहे ( उदा .20 पेक्षा कमी विद्यार्थी) अशा शाळांचे विलिनीकरण करण्यात येईल, मात्र असे करताना मुलांना शाळेमध्ये ये
- जा करण्यात कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून दळणवळणाची आवश्यक सुविधा पुरवण्यात येईल, या माध्यमातून राज्य शासनाला विद्यमान शाळांच्या अवस्थेची छाननी करण्याची ही संधी मिळेल.  शालेय संकुलामुले मुख्य प्रवाहां पासून  वेगळ्या पडलेल्या छोट्या  शाळाचा अलगपणा नाहीसा होईल आणि शैक्षणिक दृष्ट्या व प्रशासकीय दृष्ट्या एकत्रित  काम करण्यासाठी व एकमेकांना साहाय्य करण्यासाठी  शिक्षकांचा  प्राचार्यांचा एक विशाल समुदाय निर्माण होईल ,शासकीय शालेय प्रणालीसाठी शालेय संकुल हे प्राथमिक प्रशासकीय युनिट असेल.

एखाद्दे विशिष्ट शालेय संकुल म्हणजे एकमेकांशी जोडल्या गेलेल्या किंवा एकसंघ असलेल्या प्रदेशातील 10 - 20 शासकीय शाळांचा समूह असेल .त्या ठिकाणी शिक्षणाच्या  पायाभूत स्तरापासून ते इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण प्रदान करण्यात येईल माध्यमिक शाळेचे प्राचार्य या शालेय संकुलाचे प्रमुख असतील.

एखाद्या विशिष्ट शालेय संकुल म्हणजे निम - स्वायत युनिट ,असेल ज्यामध्ये शिक्षणाच्या पायाभूत स्तरा पासून ते इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण प्रदान करण्यात येईल , यामध्ये एक माध्यमिक शाळा असेल  (इयत्ता नववी ते बारावी )आणि त्यांच्या आसपास सर्व शासकीय शाळांमधून मूलभूत प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षण प्रदान करतील.

शाळांना शालेय संकुलामध्ये गटबद्ध केल्यामुळे विषयाचे शिक्षक ,क्रीडा, संगीत व कला शिक्षक, समुपदेशक आणि समाज सेवक यांच्यासह सर्वसाधान  सुविधा शाळांना एकमेकांसोबत गरजेनुसार वाटून घेणे शक्य होईल .याशिवाय या  एकत्रीकरणामुळे  प्रयोगशाळा, ग्रंथालय ,आय .सी .टी .संगीत वाद्य, क्रीडा उपकरणे व भौतिक साहित्य एकमेकासोबत नियोजनबद्ध पद्धतीने वाटून घेणे शक्य येईल परिणामी सार्वजनिक साधन सुविधांचा इंष्टतम  विनियोग होईल.

प्रारंभीक  तीन वर्षाचे पायाभूत शिक्षण देणाऱ्या शाळा ,व्यावसायिक शिक्षण व प्रोढ शिक्षण  देणाऱ्या संस्था, शिक्षक साहित्य संस्था व एकमेकांशी भौगोलिक दृष्ट्या जवळ असलेल्या किंवा जोडलेल्या परिसरातील दिव्यांग मुलांना सांगत देणे एकमेकांच्या कामांमध्ये साहाय्य करण्यासाठी सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधांचा सलग्न  संच तयार करणे ,हा शालेय संकुल निर्मितीमागील महत्त्वपूर्ण उद्देश आहे .जिल्ह्यातील उच्च शिक्षण संस्था याबाबत सर्वतोपरी सहाय्य करतील.
प्रत्येक संकुलासाठी सर्वसमावेशक शिक्षक विकास आराखडा करण्यात येईल जाणीवपूर्वक विकसित केले जातील व साप्ताहिक बैठका ,शिक्षक अध्ययन केंद्र अशा प्रक्रियांमधून त्याला शाश्वत ठेवण्यात येईल , यासोबत परिसंवाद ,वर्गातील ,देखरेखीतून  मार्गदर्शन, अनुभव भेटी, इत्यादीतून सातत्याने व्यावसायिक विकास घडवून आणण्यात येईल . जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि ब्लॉक, कल्स्टर रिसर्च सेंटर यांच्यासह शैक्षणिक व शिक्षक साहाय्य प्रणाली ही शालेय संकुल प्रणालीशी सुसंगत करण्यात येईल.
प्रत्येक शालेय संकुलामध्ये एक शालेय संकुल व्यवस्थापन समिती असेल ज्यामध्ये संकुलातील सर्व शाळांचे त्यांच्यासोबत प्रौढ   प्रशिक्षण केंद्र  ,गटसाधन केंद्र इत्यादी संकुलाची संलग्न असणारे इतर संस्थांचे प्रतिनिधीही असतील .शाळेच्या वतीने  राज्य शासन तिच्या  समित्या त्यांच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार या समितीला असेल, सदर समिती शिक्षकांच्या कामगिरीच्या  मूल्यमापनामध्ये ही मोलाची व मध्यवर्ती भूमिका पार पाडेल.
प्रारंभी प्रत्येक शाळा स्वतःचा विकास आराखडा तयार करतील,


 त्या वरून शालेय संकुलाचा विकास आराखडा आखण्यात येईल तत्पच्चात त्याला शालेय शिक्षण विभागाकडून अनुमोदक देण्यात येईल. शालेय प्रणालीच्या देखरेखीसाठी व  त्याचे कार्य सुरळीत होऊन त्यांच्या सबलीकरण यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा शिक्षण परिषद स्थापन करण्यात येईल.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...