मुख्य सामग्रीवर वगळा

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

"ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल"

१ मे महाराष्ट्र दिन! 
हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ.
शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे,
हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात.
याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प्रतीक आहेत. हे झाड जसे टिकाऊ, शुद्ध हवा देणारे व औषधी आहे, तसाच महाराष्ट्राचा बाणा, रक्षण करणारा, आरोग्य देणारा, आणि मनोहर,पर्यावरणाशी सुसंगती: ताम्हण हे पक्ष्यांचे निवासस्थान, मधमाशांसाठी उपयुक्त, आणि पर्यावरण संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
औषधी व पर्यावरणीय  ताम्हणाच्या सालीचा काढा मधुमेह नियंत्रणासाठी वापरला जातो.याच्या पानांचा वापर पारंपरिक औषधांमध्ये केला जातो. अनेक पक्षी, कीटक, व मधमाशा आश्रय घेतात. मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषण करणारा वनस्पती वर्ग.
ताम्हणाच्या फुलांवर अनेक मराठी कवींनी काव्यलेखन केले आहे.हे फूल कोमलतेचं आणि तेजस्वितेचं प्रतीक मानलं जातं.शाळा, कॉलेज, बागा, आणि शासकीय इमारतींमध्ये याची सजावटीसाठी लागवड केली जाते.
भीमाशंकर अभयारण्य , ताम्हणांचा नैसर्गिक अधिवास संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई
नाशिक, पुणे, नागपूर, कोल्हापूर व औरंगाबाद येथील शासकीय बागा महाबळेश्वर, कोयना, आणि सातपुडा पर्वतरांगांमधील जंगलं,ताम्हण हे फुल केवळ एक शोभेची गोष्ट नाही, तर ती आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीची, निसर्गाशी असलेल्या नाळेची आणि भावनिक ओळखीची जिवंत निशाणी. ते आपल्या मातीचं गौरवगीत आहे ,जे प्रत्येक महाराष्ट्र दिनी नव्याने उमलतं आणि आपल्याला आपल्याच अस्मितेची आठवण करून देतं.म्हणूनच, आपण सर्वांनी ताम्हणाच्या फुलाचे सौंदर्य, त्याचे संवर्धन आणि त्याचं पर्यावरणीय मूल्य जपलं पाहिजे. महाराष्ट्र दिवसाच्या शुभप्रभात ताम्हणासारखं बहरू द्या रंगात, तेजात, आणि जीवनमूल्यांमध्ये.
महाराष्ट्राचा राज्य पक्षी : हिरवा होळा Yellow-footed Green Pigeon
पिवळ्या पायाची हरोळी याचे शरीर फिकट हिरवट-पिवळसर रंगाचे असते.
पाय पिवळ्या रंगाचे, यावरूनच "Yellow-footed" हे नाव आले आहे.डोळे लालसर, चोच लहान व निळसर टोकदार.पंख थोडे गर्द हिरव्या छटेतले असतात, आणि मादी व नर यांच्यात रंगसंगती फारशी वेगळी नसते.
सदाहरित, निमसदाहरित व कोरड्या पानझडी जंगलात, तसेच फळझाडांनी समृद्ध भागांमध्ये हा पक्षी आढळतो.महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, सह्याद्री पर्वतरांगांमध्ये याचा चांगला वावर आढळतो.गावांजवळील मध्यम उंचीची झाडे, विशेषतः अंजन, उंबर, फिकाम व पिंपळ यावर दिसतो,उंबर, पिंपळ, जांभूळ, बोर इ. झाडांची फळं, फुलं आणि काही वेळा कोवळी पानं.
तो बीजप्रसारक म्हणून जंगलाच्या नैसर्गिक पुनरुत्पादनासाठी अत्यंत उपयुक्त  करतो. हा 
समूहात राहणारा पक्षीअतिशय शांत स्वभावाचा व सावध असतो.उंच झाडांवरून निरीक्षण करणे अवघड असते कारण तो रंगामुळे पानांमध्ये मिसळून जातो.शक्यतो उडताना फारसे आवाज करत नाही, पण बसलेल्या अवस्थेत हलका "कोउ-कुहू" असा आवाज करताना ऐकू येते.
फेब्रुवारी ते मे  ऋतू.जोडी बनवून मादी एक ते दोन अंडी घालते.घरटे अतिशय साधे, काही फांद्यांवर बनवलेले असते.
नर व मादी दोघेही अंडी उबवतात व पिल्लांची काळजी घेतात.
महाराष्ट्र शासनाने या पक्ष्याला "राज्य पक्षी" म्हणून गौरवून सजगतेने संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्राच्या जंगलांचा प्रतिनिधी म्हणून त्याचे स्थान महत्त्वाचे आहे.
विविध लोककथांमध्ये हरोळीचा उल्लेख पावसाची चाहूल देणारा पक्षी म्हणून केला जातो.
महाराष्ट्रातील नैसर्गिक समृद्धतेचे आणि पर्यावरणीय संतुलनाचे प्रतीक म्हणून या पक्ष्याची निवड करण्यात आली.
१९९० च्या दशकात याला राज्य पक्ष्याचा दर्जा मिळाला.
पक्ष्याची हिरवी-पिवळी रंगसंगती महाराष्ट्राच्या समृद्ध वनवैभवाचे प्रतिकात्मक दर्शन घडवते.
हिरवा होला केवळ महाराष्ट्राचा 'राज्य पक्षी' नसून, तो प्रकृतीशी आपली नाळ जोडणारा एक नाजूक दुवा आहे. त्याचे संरक्षण म्हणजे आपल्या पर्यावरणाचे रक्षण होय. या पक्ष्याच्या अस्तित्वामुळे आपले जंगल, त्यातील झाडे, फळे आणि जैवसाखळी एकत्र जिवंत राहतात.
महाराष्ट्राचा राज्य प्राणी, शेकरू Malabar Giant Squirrel  Indian Giant Squirrel.
शेकरू प्रामुख्याने पश्चिम घाट, पूर्व घाटाचे काही भाग, तसेच सातपुडा पर्वतरांगा यामधील घनदाट, सदाहरित व अर्ध-सदाहरित जंगलांमध्ये आढळते.
महाराष्ट्रातील भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे शेकरूसाठी एक विशेष संवर्धन क्षेत्र मानलेजाते २५–४५ सें.मी. शरीर लांबी, आणि शेपूटही जवळपास तितकीच लांब.गर्द जांभळसर, तांबूस, काळसर, पिवळसर आणि कधीकधी तपकिरी छटा असलेला बहुरंगी व लोभस रंगाचा केसाळ शरीर.शेपूट, खूप लांबट, झुपकेदार व आकर्षक असते, जी तोल राखण्यास मदत करते.मोठे डोळे व नाजूक कान यामुळे त्याला चपळपणे झाडांवर हालचाल करता येते.शेकरू एकल जीवन जगणारा प्राणी आहे.तो प्रामुख्याने दिवसाचाच सक्रिय असतो अतिशय चपळपणे झाडांच्या फांद्या व झाडावरून झाडावर उड्या मारतो.
आपले घरटे मोठ्या झाडांवरील फांद्यांवर, पाने व टवटवीत लाकडापासून तयार करतो.फळं, झाडांची कोवळी पाने, बियां, फुलं, कधीकधी कीटकही त्याच्या आहारात समाविष्ट असतात.तो वनस्पती आधारित आहारास प्राधान्य देतो.
महाराष्ट्र शासनाने १९८० साली शेकरूला ‘राज्य प्राणी’ म्हणून घोषित केले.भीमाशंकर व पांढरकवडा भागांतील आदिवासी समाजामध्ये शेकरूचे सांस्कृतिक महत्त्व आहे.शेकरू महाराष्ट्राच्या वनवैभवाचे प्रतीक मानले जाते,
शेकरू हा केवळ एक प्राणी नसून महाराष्ट्राच्या निसर्गश्रीमंतीचा, जैवविविधतेचा आणि सांस्कृतिक अस्मितेचा एक जिवंत प्रतीक आहे. त्याचे संरक्षण करणे म्हणजे आपल्या जंगलांचे, निसर्गाचे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे होय.
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...