मुख्य सामग्रीवर वगळा

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

मराठी व्याकरण @समास प्रकार

समास प्रकार :  
दोन किंवा अधिक शब्दांचा परस्पर संबंध दर्शविणाऱ्या प्रत्ययांचा किंवा अव्ययांचा लोप होऊन जोडशब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द म्हणतात.जोडशब्द बनविण्याची अथवा एकत्रीकरणाची ही जी प्रक्रिया आहे तिला समास म्हणतात. , 

(१) अव्ययीभाव – यात अव्यय हे प्रधान असून सामान्यतः पूर्वनिपाताने ते समासात पहिल्या स्थानी येते. म्हणून हा समास पूर्वपदप्रधान असतो. संपूर्ण सामासिकशब्द हा व्याकरणदृष्ट्या अव्यय म्हणूनच राहत असल्याने त्याला अव्ययीभाव अशी संज्ञा आहे. हा समास एकवचनी व नपुंसकलिंगी असतो. 
उदा.,दररोज,यथाक्रम.


(२) तत्पुरुष– हा समास उत्तरपदप्रधान असतो.या समासात दुसरे पद महत्वाचे असते. या समासाचे कर्मधारय, द्विगु, उपपदतत्पुरुष एवढेच उपप्रकार पाणिनीने सांगितले आहेत. परंतु विग्रहाच्या प्रकारानुसार अलिकडच्या काळात विभक्ति तत्पुरुष, प्रादितत्पुरुष, नञ्-तत्पुरुष हे सुद्धा उपप्रकार मानण्यात येतात. समासातील शेवटच्या शब्दानुसार संपूर्ण सामासिक शब्दाचे व्याकरणदृष्ट्या स्थान म्हणजे नाम किंवा विशेषण व लिंग ठरते.

कर्मधारय– सामान्याधिकरण्यात म्हणजे दोन समान विभक्तींत (प्रथमा विभक्तीत) हा समास सोडवला जातो. त्यामुळे त्यांच्यातील विशेषण-विशेष्य, विशेषनाम, उपमान-उपमेय असे संबंध हा समास दाखवतो. समासात विशेषणाला व विशेषनामाला पूर्वनिपात होतो. उदा. नीलं कमलम् – नीलकमलम् । महत् नगरम् – महानगरम् । पुणे नाम नगरम् – पुणेनगरम् । तर उपमेय-उपमान संबंधात दोन्हीपैकी कोणालाही पूर्वनिपात होऊ शकतो. 

द्विगु– संख्यावाचक पदांशी समास झाल्यास तो द्विगु तत्पुरुष समास मानला जातो व संख्यावाचक शब्दाला पूर्वनिपात होतो. हा समास नेहमी एकवचनी असतो.
उपपदतत्पुरुष – पाणिनीच्या सूत्रांनुसार उपपदसंज्ञक पदांचा समर्थ शब्दांशी तत्पुरुष समास होतो. हे नित्यसमास असतात. म्हणजे त्यांचे स्वपद-विग्रह होत नाहीत.या समासातील दुसरे पद कृदंत किंवा धातुसाधित असते,त्याचा स्वतंत्रपणे वाक्यात उपयोग होऊ शकत नाही. उदा. कुम्भं करोति – कम्भकारः । येथे ‘कुम्भं करोति’ हा विग्रह नसून अर्थबोध करून देणारे वाक्य आहे. याचप्रमाणे, शास्त्रं जानाति – शास्त्रज्ञः, पङ्कात् जायते – पङ्कजम् । हे सुद्धा उपपदतत्पुरुष समास आहेत.ग्रंथकार,पांथस्थ,गृहस्थ हीसुद्धा काही उदाहरणे आहेत.

विभक्ति तत्पुरुष – त्या त्या कारकांच्या संबंधानुसार द्वितीया ते सप्तमी या विभक्तिंतील शब्दांबरोबर होणाऱ्या समासांना विभक्तितत्पुरुष असे म्हटले जाते. समास होत असताना जो विभक्ती लोप पावतो किंवा विग्रह करताना ज्या विभक्तीचा उपयोग करावा लागतो त्या विभक्तीचे नाव त्या विभक्ती तत्पुरुष समसास देण्यात येते.उदा. कष्टं श्रितः – कष्टश्रितः । भूमिं गतः – भूमिगतः । दैवेन रक्षितः – दैवरक्षितः । कुण्डलाय हिरण्यम् – कुण्डलहिरण्यम् । काकाय बलिः – काकबलिः । सर्पात् भयम् – सर्पभयम् । ऋणात् मुक्तः – ऋणमुक्तः । राज्ञः पुरुषः – राजपुरुषः । कलायां निपुणः – कलानिपुणः ।

नञ्-तत्पुरुष – नकारार्थी अव्यय पूर्वपदी असून त्याचा समर्थ पदाशी समास झाल्यास तो नञ्-तत्पुरुष समास होतो. उदा. न भयम् – अभयम् । न आदरः – अनादरः । नञ्-तत्पुरुष समास ही विशेष संज्ञा अलिकडच्या काळात प्रचलित झाली आहे.

(३) द्वंद्वसमास –यात दोन्ही वा जास्त शब्द तुल्यदर्जाचे असतात व ते ‘चकारा’ने म्हणजेच ‘आणि’ या अर्थाने जोडले जातात. थोडक्यात त्यांच्यात एकमेकांशी कारकाचा संबंध नसतो. इतरेतर व समाहार असे द्वंद्वसमासाचे उपप्रकार आहेत.

इतरेतर– यात समासाचे लिंग हे समासातील शेवटच्या शब्दाच्या लिंगानुसार होते. वचन हे समासात असणाऱ्या शब्दांच्या संख्येनुसार एकवचन किंवा बहुवचन असते.  रामः च कृष्णः च – रामकृष्णौ । ग्रामाः च वनानि च – ग्रामवनानि । दम्पती(प्रथमा द्विवचन) – जाया च पतिः च । येथे जाया या शब्दाला दम् असा आदेश होऊन ‘दम्पती’ असा समास बनतो.

समाहार– समाहार याचा अर्थ समूह. या समासाच्या विग्रहात दोन्ही पदांच्या आणखी इतरही पदांचा समावेश होतो.त्यामुळे हा समास नेहमीच नपुंसकलिंगी व एकवचनी असतो.उदा.पाऊसपाणी,पैसाअडका तसेच  पाणी च पादौ च  एतेषां समाहारः – पाणिपादम् ।

एकशेष – एकशेष हा पाच वृत्तींपैकी एक प्रकार असून त्याचा विग्रह द्वंद्व समासाप्रमाणेच होतो. मात्र द्वंद्वाप्रमाणे विग्रहातील सर्व शब्द सामासिक शब्दात येत नाहीत, तर त्यांतील एकच शब्द समासात शिल्लक रहातो. त्यामुळेच पाणिनीय व्याकरणानुसार तो समास नसून त्याला समासाची कार्ये लागू होत नाहीत.अलिकडच्या काळात मात्र त्याला एकशेषसमास असे संबोधले जाऊ लागले. उदा. माता च पिता च – पितरौ ।

(४) बहुव्रीही– समासातील पदांखेरीज अन्यपदार्थाला प्राधान्य असते, तेव्हा हा समास होतो. त्यामुळे संपूर्ण सामासिकशब्द हा विशेषणात्मक असतो. याचे दोन प्रकार आहेत. १. समासातील दोन्ही शब्द विग्रहात एकाच विभक्तीत असल्यास तो समानाधिकरण बहुव्रीही होतो. 
उदा. विद्या एव धनं यस्य सः – विद्याधनः (गुरुः) । पीतम् अम्बरं यस्य सः – पीताम्बरः (विष्णुः) । २. समासातील दोन्ही शब्द विग्रहात वेगवेगळ्या विभक्तींत असल्यास तो व्यधिकरण बहुव्रीही होतो. 
उदा. चक्रं पाणौ यस्य सः – चक्रपाणिः

(५)अलुक् समास – हा स्वतंत्र प्रकार नसून वरील समासांचाच उपप्रकार म्हणता येईल. समास तयार करताना सामान्यपणे विग्रहातील पदांच्या विभक्ति-प्रत्ययांचा लोप होतो. पण कधीकधी विभक्ति-प्रत्ययांचा लोप न होता ते प्रत्यय सामासिक शब्दांतही तसेच राहतात. तेव्हा त्याला अलुक् समास म्हणतात. असे अलुक् समास तत्पुरुष व बहुव्रीही समासान्तर्गत आढळतात. उदा. युधि स्थिरः – युधिष्ठिरः  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...