मुख्य सामग्रीवर वगळा

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

21 डिसेंबर गुरु -शनि महायुतीचे बना प्रत्यक्ष साक्षीदार*🪐🪐🌔

 21 डिसेंबर गुरु -शनि महायुतीचे बना प्रत्यक्ष साक्षीदार


      सरत्या वर्षात *२१ डिसेंबरची रात्र* आपल्यासाठी एक दुर्मिळ योग घेऊन येत आहे. गेल्या चारशे वर्षात न दिसलेली एक आकाशीय घटना या रात्री घडणार आहे. २१ डिसेंबरला रात्री *साडेसात ते साडेनऊ* या वेळात पश्चिमेला आकाशात तेजस्वी आणि आपल्या *सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आणि शनी एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत.* हे दृश्य नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे.  🌎पृथ्वीवर आज घडीला जिवंत असलेल्या कुणीही हे दृश्य पाहिलेले नाही आणि या नंतर त्यासाठी २०८० सालची प्रतीक्षा करावी लागेल. अर्थात *गुरु आणि शनी* हे ग्रह जवळ येण्याची घटना दर २० वर्षांनी घडते पण यावेळी ते जितके एकमेकांच्या जवळ आहेत ते *यापूर्वी ४०० वर्षांपूर्वी घडले होते.* या युतीला ग्रेट कंजेशन असे म्हटले जाते. *आपल्या ग्रहमालिकेत गुरु पाचवा तर शनी सहावा ग्रह आहे पण दोघांच्या सूर्यप्रदक्षिणेला लागणारा काळ वेगवेगळा आहे.* या पूर्वी असा योग १६ जुलै १६२३ रोजी आला होता आणि त्यावेळी *दुर्बिणीचा शोध लावणारा गॅलिलिओ जिवंत होता पण दुर्बिणीचा शोध त्यावेळी लागलेला नव्हता.*                       जेव्हा 🌕🟠दोन ग्रह एकमेकांच्या जवळ येतात त्याला त्या ग्रहांची युती म्हणतात. याबाबत मुंबई येथील नेहरू तारांगणचे अरविंद परांजपे म्हणाले, *"गुरू"* 🌕हा सूर्याची एक परिक्रमा ११.८७ वर्षांनी पूर्ण करतो. तर 🪐 *"शनिला"* २९.५० वर्षे लागतात. या दोन्हींचा परिणाम असा, की दर सुमारे १९ वर्षे आणि ७ महिन्यांनी या ग्रहांची महायुती होते. पण, प्रत्येक महायुतीवेळी यांच्यातील अंतरे वेगवेगळी असतात. दि.२१ डिसेंबर रोजी हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून फक्त ०.१ अंश कोनीय (अर्थात ६ कला आणि ६ विकला) अंतरावर असतील.   ज्यांची नजर तेज आहे अश्या लोकांना *२१ डिसेंबर रोजी 🪐🌙शनीचा चंद्र टायटन हाही दिसू शकणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी 🔭दुर्बिणीची आवश्यकता नाही.  गेल्या काही दिवसांपासून रोज सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर 6 ते 8.30pm या वेळेत पश्चिमेच्या आकाशात क्षितिजापासून 30 अंश उंचीवर *दोन ठळक चांदण्या* दिसत आहेत. इतर चांदण्यांप्रमाणे अजिबात न टिमटिमणाऱ्या या दोन्ही चांदण्या म्हणजे सूर्यमालेतील सर्वात मोठे दोन ग्रह गुरु व शनि आहेत. हे दोन्ही ग्रह  दुर्बिणीशिवाय सहजपणे पाहता  व ओळखता येतात .. 
*त्यांपैकी मोठी चांदणी म्हणजे गुरु ग्रह* ... 
*तर छोटी चांदणी म्हणजे शनि ग्रह* ...

गुरु हा सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह सुर्यापासून सरासरी *80 कोटी किमी* दूर असून त्याला सुर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यास 12 वर्षे लागतात .. तर शनि हा सुर्यमालेतील सर्वात सुंदर कडी असणारा ग्रह  सुर्यापासून सरासरी *150 कोटी किमी* दूर असून त्याला सुर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यास 29.5 वर्षे लागतात . त्यामुळे पृथ्वीवरून रात्रीच्या आकाशात पाहताना त्यांची दर 20 वर्षांनी युती होतच असते. म्हणजे हे दोन्ही ग्रहजवळ आलेले दिसतात ..
      पण या दर वीस वर्षांनी होणाऱ्या युतीत गुरु व शनि विशिष्ट अंतरावर एकत्र येतात. मात्र या वेळी *21 डिसेंबर 2020 रोजी महायुती* घडेल , म्हणजे गुरु व शनि एवढे एकत्र येतील कि दोन स्वतंत्र चांदण्यांऐवजी दोघांची मिळून *एकच चांदणी* दिसू लागेल. आकाशात गुरु व शनिची ही अशी अवस्था दिनांक 20 , 21, व 22 डिसेंबर पर्यंत पाहायला मिळेल. यालाच गुरु व शनिची महायुती म्हणतात ..
   22 डिसेंबर नंतर गुरु ग्रह शनिला ओलांडून पूर्वेकडे (वर ) सरकताना दिसेल त्या दोन्हीं ग्रहातील अंतर दिवसेंदिवस वाढत जाईल. गुरु शनिच्या महायुतीची ही घटना *1623* साली घडली होती. तेव्हा गॅलिलीओ गॅलिली नुकताच दुर्बीणी चा वापर करू लागला होता. आणि यानंतर ही घटना *2080* साली पुन्हा घडेल. त्यामुळे आपणाला या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची हीच एकमेव संधी आहे. तेव्हा ही संधी दवडू नका .
      आजपासून पुढचे 2 -3 दिवस रोज सायंकाळी सूर्य मावळल्यापासून आकाशात हे दोन ग्रह शोधूया . 
*21 डिसेंबर पर्यंत या दोन ग्रहांतील कमी होत जाणारे अंतर* , 
*21 डिसेंबरची दोन्ही ग्रहांची महायुती* आणि त्यानंतर या *दोन ग्रहांत रोज वाढत जाणारे अंतर* याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊया .दुर्बीण असेल तर त्यातून हे दोन्ही ग्रह पाहणे ही सुद्धा एक मोठी खगोलीय संधीच असेल. पण दुर्बीणीशिवायही सर्वांना या घटनेचा अनुभव घेणे सहज शक्य आहे. 
रात्रीच्या आकाशात अशा अभूतपूर्व घटना घडत असतात आणि विश्वातील अनेक सत्य व आश्चर्य मानवासमोर उलगडत असतात. आपण मात्र ग्रहताऱ्यांच्या अज्ञानापोटी अंधश्रद्धा जोपासत ग्रह ताऱ्यांना राशी नक्षत्रांना घाबरत राहतो आणि निसर्गाने बहाल केलेल्या विश्वाला समजून घेण्याच्या संधी अवैज्ञानिक भितीपोटी गमावत राहतो ..
     *शनि किंवा कोणताही ग्रह दुष्ट /वाईट /अशुभ नसतो*. त्यामुळे *शनिची साडेसाती ही निवळ अंधश्रद्धा* आहे . कोणत्याही *राशी नक्षत्रे आपले भविष्य ठरवत नाहीत आणि बिघडवतही नाहीत*. आकाशाविषयी असणाऱ्या अशा अंधश्रद्धांना बळी पडून घाबरून ही संधी घालवू नये.



*सर्व जिल्हयातील/ तालुक्यातील केंद्रप्रमुख  विषयसाधन व्यक्ती, केंद्रीय HM, IE चे विषय तज्ञ व विषय शिक्षक या सर्व पर्यवेक्षिय यंत्रणेनी सर्व पालक व विद्यार्थी यांना ही घटना पाहण्याचे आवाहन करावे.
मनोज चौरपागर 
अमरावती 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...