संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...
हिमा दास : "संघर्षातून सुवर्ण कळसाकडे"भारतीय अॅथलेटिक्समध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारी हिमा दास ही केवळ एक धावपटू नाही, तर संघर्ष, जिद्द आणि स्वप्नांचा पाठलाग कसा करावा याचा जिवंत आदर्श आहे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेली हिमा आज भारताची ‘गोल्डन गर्ल’ म्हणून ओळखली जाते. तिच्या जीवनप्रवासात अडथळे होते, अंधार होता, पण तिच्या आत्मविश्वासाने आणि मेहनतीने तिला प्रकाशाकडे नेले.
९ जानेवारी २००० रोजी आसामच्या नागाव जिल्ह्यातील एका छोट्या खेडेगावात हिमा दासचा जन्म झाला. तिचे वडील शेतकरी होते, घरची आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची होती. पण परिस्थितीपेक्षा मोठी तिची जिद्द होती. लहानपणापासूनच तिला फुटबॉलची आवड होती, पण तिच्या प्रशिक्षकांनी तिच्या वेगावर लक्ष ठेवून तिला धावण्याचा सल्ला दिला. तिच्याकडे धावण्याचे बूट घेण्यासाठी पैसे नव्हते. पण इच्छाशक्तीसमोर आर्थिक अडचणी टिकू शकत नाहीत. एका स्पर्धेसाठी तिने साध्या बूटांवर हाताने ‘आदिदास’ असे लिहिले आणि मैदानात उतरली. तिच्या वेगाने आणि जिद्दीने सर्वांनाच अचंबित केले. जेव्हा तिने सुवर्णपदक जिंकले, तेव्हा ‘Adidas’ कंपनीने तिला अधिकृत प्रायोजकत्व दिले आणि तिच्यासाठी खास बूट तयार केले. आणि त्यावर लिहल.."हिमा दास"! हीच तर असते मेहनतीची खरी कमाई!
✅ २०१८ IAAF वर्ल्ड U20 चॅम्पियनशिप ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला अॅथलीट.
✅ एशियन गेम्स २०१८ ४०० मीटर आणि ४×४०० मीटर रिलेमध्ये रौप्य व सुवर्णपदक.
✅ २०१९ मध्ये ५ सुवर्णपदकं – युरोपियन अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये सलग ५ सुवर्णपदकं पटकावली.
या यशाने केवळ भारताचा झेंडा उंचावला नाही, तर प्रत्येक सामान्य घरातील मुलामुलींना स्वप्न उंच उडण्याची उमेद दिली.एका स्पर्धेदरम्यान, अंतिम रेषा पार करताना हिमाच्या चेहऱ्यावरची वेदना आणि विजयाची चमक एकाच वेळी दिसत होती. थकव्याने शरीर थांबण्याची विनवणी करत होतं, पण तिच्या मनात फक्त एकच आवाज घुमत होता "आता थाबलीस, तर पुन्हा संधी नाही!"ती शेवटच्या क्षणापर्यंत धावली, आणि सुवर्णपदक तिच्या गळ्यात पडले. हा क्षण तिच्यासाठी फक्त यश नव्हता, तर संघर्षाच्या प्रत्येक कणाचा सन्मान होता.
हिमा दास हिची कहाणी म्हणजे मेहनत आणि इच्छाशक्तीचे मूर्तिमंत उदाहरण,परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरीही जर तुम्ही जिद्दीने प्रयत्न केले, तर स्वप्ने साकार होतात.
जीवनात अडथळे येतात, पण त्यांना पार करायला मनगटात बळ हवं!
हिमा दास हिच्या संघर्षातून , जिंकण्यासाठी जन्म लागत नाही, तर जिद्द लागते! तिचा प्रवास भारतातील लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या वेगासोबतच तिच्या कष्टांनाही सलाम!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -