मुख्य सामग्रीवर वगळा

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

गाणंकोकिळा लतादीदी


स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

भारतीय संगीताचा झगमगता तारा, स्वरांचा अमूल्य ठेवा आणि अनंत काळापर्यंत मनोमनी घुमणारा सुरेल स्वर अशी लता मंगेशकर यांची ओळख शब्दांत मावणारी नाही. त्यांच्या मधुर स्वरांनी संपूर्ण जगाला मोहित केले आणि आजही त्यांच्या गाण्यांमधून ते सूर आपल्या हृदयात जिवंत राहतील.

लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर येथे झाला. संगीत हा त्यांच्या रक्तातच होता. वडील पं. दीनानाथ मंगेशकर हे सुप्रसिद्ध गायक व नटसम्राट होते, तर आई शेवंतीबाई यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. तीन बहिणी आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि एक भाऊ  ह्रदयनाथ मंगेशकर या सर्वांमध्ये संगीताचा वारसा चालवण्याचे बळ होते.
लता मंगेशकर यांना लहानपणापासूनच संगीताची गोडी लागली. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर गाण्याची सुरुवात केली. मात्र, नियतीने घाला घातला, आणि वडिलांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या नाजूक खांद्यावर येऊन पडली. पण हा परीक्षेचा क्षण त्यांनी धैर्याने स्वीकारला आणि संगीतातील आपला प्रवास अविरत सुरू ठेवला.
वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी चित्रपटासाठी पहिले पार्श्वगायन केले .
‘माता एक सपूत की दुनिया बदल दे’. तेव्हा कुणी विचारही केला नसेल, की हा नाजूक आवाज एक दिवस संपूर्ण भारतीय संगीतविश्वावर अधिराज्य गाजवेल. त्यांच्या स्वरातील जादू ऐकून हृदयाच्या गाभ्यातून भावनांचा पूर उसळायचा.

'लग जा गले', 'प्यार किया तो डरना क्या', 'अजीब दास्तां है ये', 'मोहे पनघट पे', 'अल्लाह तेरो नाम' यांसारखी हजारो गाणी ही भारतीय संगीताच्या सुवर्णकाळाची ओळख बनली. विशेषतः ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या देशभक्तीपर गीताने संपूर्ण देशाला अश्रूंच्या धारा लागल्या. त्यांच्या आवाजातील सच्चेपणा आणि भावनिक ताकद ऐकून पंडित नेहरू यांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले होते.

हिंदी चित्रपटसृष्टीसह मराठी संगीताच्या सोनेरी युगालाही लता दीदींनी आपले सूर बहाल केले. ‘गाणे तुम्हारे मी ऐकत होते’, ‘प्रेमाचं झुललं गोकुळ’, ‘घनश्याम सुंदर’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ यांसारखी कित्येक अमर गाणी त्यांच्या स्वरस्पर्शाने अजरामर झाली. त्यांच्या आवाजातील माधुर्याने मराठी भावगीतांना एक वेगळेच सौंदर्य दिले.
लता मंगेशकर यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी त्यांच्या महानतेची साक्ष देते. त्यांना भारतरत्न (2001), दादासाहेब फाळके पुरस्कार (1989), पद्मभूषण (1969), पद्मविभूषण (1999), आणि असंख्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. परंतु, त्यांचा खरा सन्मान त्यांच्या गाण्यांवर प्रेम करणाऱ्या करोडो श्रोत्यांच्या मनात आहे.
6 फेब्रुवारी 2022 रोजी, 92 व्या वर्षी लता मंगेशकर यांनी या जगाचा निरोप घेतला. पण त्यांच्या आवाजाचा सुगंध अजूनही संपूर्ण विश्वात दरवळतो आहे. त्यांच्या गाण्यांचे सूर काळाच्या पलीकडे जात अजरामर झाले आहेत.

आजही कोणी ‘लग जा गले’ गुणगुणले की मनात एक वेगळीच हळव्या भावनांची लहर उठते. कारण लता मंगेशकर म्हणजे केवळ एक गायिका नव्हे, तर स्वरांना मिळालेलं अमरत्व आहे.

त्यांच्या अमृतस्वरांना कोटी कोटी प्रणाम!

"भावपूर्ण श्रद्धांजली!"

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...