मुख्य सामग्रीवर वगळा

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

शितलदेवी : "जिद्दीच्या बळावर इतिहास घडवणारी तिरंदाज"..

शितलदेवी : "जिद्दीच्या बळावर इतिहास घडवणारी तिरंदाज"..
खेळ ही केवळ शारीरिक ताकदाची चाचणी नाही, तर मनगटातील जिद्द, डोक्यातील धारदार रणनीती आणि मनगटाला मिळणाऱ्या आत्मविश्वासाचीही परीक्षा असते.     विशेषतः पॅरा खेळाडूंसाठी हा प्रवास अधिक खडतर असतो. शितलदेवी ही त्या जिद्दीचे मूर्तिमंत रूप आहे.जन्मजात फोकोमेलिया या दुर्मिळ विकारामुळे तिच्या हात-पायांची वाढ अपूर्ण राहिली. मात्र, शारीरिक मर्यादा तिच्या यशाच्या आड कधीच आल्या नाहीत. तिने संकल्प केला, बाण उचलला आणि तिरंदाजीच्या मैदानावर इतिहास घडवला.पॅरा ऑलिंपिक, नॅशनल आर्चरी चॅम्पियनशिप, जागतिक आर्चरी चॅम्पियनशिप आणि आशियाई स्पर्धांमध्ये पदकांची मालिका उभी करत तिने आपल्या बाणाने फक्त लक्ष्यच नाही, तर लोकांच्या मनालाही वेधले!
फोकोमेलिया ही जन्मजात विकृती हात किंवा पाय पूर्ण विकसित न होण्यास कारणीभूत ठरते. यामुळे अवयव लहान, अशक्त किंवा अपूर्ण राहतात. समाज अशा मर्यादांकडे दुर्बलतेच्या नजरेने पाहतो, पण शितलदेवीच्या कुटुंबाने तिला कधीही दिव्यांग समजले नाही.१० जानेवारी २००७ रोजी जन्मलेल्या शितलदेवीने लहानपणापासूनच जगाच्या दृष्टीने अशक्य गोष्टी शक्य करण्याचा ध्यास घेतला. इतर मुलांसारखी धावू शकत नसली, बागडू शकत नसली, तरी तिने मनाने कधीच हरायचे ठरवले नव्हते.घरातील प्रत्येक वस्तू उचलण्यापासून, स्वतःची कामे स्वतः करण्यापर्यंत तिचा प्रत्येक दिवस संघर्षांनी भरलेला होता. पण ती जितकी  दिव्यांग होती, त्याच्या शंभरपट जिद्दी होती!
तिरंदाजी हा खेळ अचूकतेचा, एकाग्रतेचा आणि ध्येयधोरणाचा असतो. एकदा का बाण कमानीतून सुटला, की तो फक्त लक्ष्यावरच जावा लागतो दुसऱ्या संधीला जागा नसते.
शितलदेवीसाठी हा खेळ निवडणे स्वतःच एक आव्हान होते. हात पूर्ण विकसित नसताना बाण पकडणे, योग्य वेग आणि कोन मिळवत लक्ष्य गाठणे यासाठी ती दिवस-रात्र मेहनत घेत होती.“हे तुला जमणार नाही,” असे अनेकांनी सांगितले. पण ती ठाम होती,तिच्या हातात बाण होता, डोक्यात ध्येय होतं आणि मनगटात असाधारण बळ होतं!
विशेष प्रशिक्षण घेत, हातातील शक्तीचा योग्य वापर करत आणि स्वतःची वेगळी शैली विकसित करत तिने आर्चरीमध्ये आपली जागा निर्माण केली. तिला अडवणाऱ्या प्रत्येक संकटाचा तिने एका नेमबाजासारखा सामना केला,स्थिर बुद्धी, भेदक नजर आणि अचूक लक्ष्य!
२०२४ पॅरा ऑलिंपिकमध्ये शितलदेवीने सामूहिक ब्राँझ पदक पटकावले आणि संपूर्ण जगाला तिच्या जिद्दीचे दर्शन घडवले.तिच्या बाणांनी मैदान जिंकलं आणि तिच्या आत्मविश्वासाने लाखो हृदयं!
अत्यंत कठीण स्पर्धकांविरुद्ध तिने उत्तम कामगिरी केली. प्रत्येक टप्प्यात तिच्या बाणांनी लक्ष्याचा वेध घेतला. अंतिम सामन्यात अखेरच्या निर्णायक क्षणी तिने असा एक बाण सोडला की, तो फक्त लक्ष्यावरच नाही, तर इतिहासावरही अचूक जाऊन लागला!
संपूर्ण स्टेडियम तिच्या नावाच्या जयघोषाने दणाणून गेले. भारताचा तिरंगा गर्वाने फडकत होता, आणि तिच्या डोळ्यांत स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान होतं.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजयांचे सोनेरी पान तिने केवळ ऑलिंपिकमध्येच नव्हे, तर विविध स्पर्धांमध्येही आपले वर्चस्व गाजवले.
, नॅशनल आर्चरी चॅम्पियनशिप  सुवर्णपदक,आशियाई आर्चरी चॅम्पियनशिप  रौप्य आणि कांस्य
, जागतिक आर्चरी चॅम्पियनशिप  आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची पदके
तिच्या या यशामुळे भारताच्या आर्चरी खेळाला नवी ओळख मिळाली आणि भारतीय खेळाडूंसाठी ती प्रेरणास्थान बनली.
शितलदेवीच्या अद्वितीय प्रवासानंतर तिला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले."अर्जुन पुरस्कार"  भारत सरकारचा सर्वोच्च क्रीडा सन्मान, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी गौरव , तिच्या संघर्षाला दिलेली 
तिच्या प्रवासाने हजारो दिव्यांग आणि महिला खेळाडूंना स्वप्न बघण्याची आणि ती सत्यात उतरवण्याची प्रेरणा दिली.
 शारीरिक अपंगत्व म्हणजे अपयश नव्हे! इच्छाशक्ती असेल, तर कोणतीही मर्यादा यशाच्या आड येत नाही.
 अविरत सराव आणि मेहनत हेच यशाचे खरे शस्त्र! खेळात प्राविण्य मिळवण्यासाठी सातत्य आवश्यक आहे.
आत्मविश्वास आणि जिद्द हा खरा विजयाचा मंत्र! कठीण प्रसंगातही हार मानू नये.
तिने सिद्ध केले की, दिव्यांगता ही कमतरता नाही, तर जिद्द हीच खरी ताकद असते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...