संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...
खेळ ही केवळ शारीरिक ताकदाची चाचणी नाही, तर मनगटातील जिद्द, डोक्यातील धारदार रणनीती आणि मनगटाला मिळणाऱ्या आत्मविश्वासाचीही परीक्षा असते. विशेषतः पॅरा खेळाडूंसाठी हा प्रवास अधिक खडतर असतो. शितलदेवी ही त्या जिद्दीचे मूर्तिमंत रूप आहे.जन्मजात फोकोमेलिया या दुर्मिळ विकारामुळे तिच्या हात-पायांची वाढ अपूर्ण राहिली. मात्र, शारीरिक मर्यादा तिच्या यशाच्या आड कधीच आल्या नाहीत. तिने संकल्प केला, बाण उचलला आणि तिरंदाजीच्या मैदानावर इतिहास घडवला.पॅरा ऑलिंपिक, नॅशनल आर्चरी चॅम्पियनशिप, जागतिक आर्चरी चॅम्पियनशिप आणि आशियाई स्पर्धांमध्ये पदकांची मालिका उभी करत तिने आपल्या बाणाने फक्त लक्ष्यच नाही, तर लोकांच्या मनालाही वेधले!
फोकोमेलिया ही जन्मजात विकृती हात किंवा पाय पूर्ण विकसित न होण्यास कारणीभूत ठरते. यामुळे अवयव लहान, अशक्त किंवा अपूर्ण राहतात. समाज अशा मर्यादांकडे दुर्बलतेच्या नजरेने पाहतो, पण शितलदेवीच्या कुटुंबाने तिला कधीही दिव्यांग समजले नाही.१० जानेवारी २००७ रोजी जन्मलेल्या शितलदेवीने लहानपणापासूनच जगाच्या दृष्टीने अशक्य गोष्टी शक्य करण्याचा ध्यास घेतला. इतर मुलांसारखी धावू शकत नसली, बागडू शकत नसली, तरी तिने मनाने कधीच हरायचे ठरवले नव्हते.घरातील प्रत्येक वस्तू उचलण्यापासून, स्वतःची कामे स्वतः करण्यापर्यंत तिचा प्रत्येक दिवस संघर्षांनी भरलेला होता. पण ती जितकी दिव्यांग होती, त्याच्या शंभरपट जिद्दी होती!
तिरंदाजी हा खेळ अचूकतेचा, एकाग्रतेचा आणि ध्येयधोरणाचा असतो. एकदा का बाण कमानीतून सुटला, की तो फक्त लक्ष्यावरच जावा लागतो दुसऱ्या संधीला जागा नसते.
शितलदेवीसाठी हा खेळ निवडणे स्वतःच एक आव्हान होते. हात पूर्ण विकसित नसताना बाण पकडणे, योग्य वेग आणि कोन मिळवत लक्ष्य गाठणे यासाठी ती दिवस-रात्र मेहनत घेत होती.“हे तुला जमणार नाही,” असे अनेकांनी सांगितले. पण ती ठाम होती,तिच्या हातात बाण होता, डोक्यात ध्येय होतं आणि मनगटात असाधारण बळ होतं!
विशेष प्रशिक्षण घेत, हातातील शक्तीचा योग्य वापर करत आणि स्वतःची वेगळी शैली विकसित करत तिने आर्चरीमध्ये आपली जागा निर्माण केली. तिला अडवणाऱ्या प्रत्येक संकटाचा तिने एका नेमबाजासारखा सामना केला,स्थिर बुद्धी, भेदक नजर आणि अचूक लक्ष्य!
२०२४ पॅरा ऑलिंपिकमध्ये शितलदेवीने सामूहिक ब्राँझ पदक पटकावले आणि संपूर्ण जगाला तिच्या जिद्दीचे दर्शन घडवले.तिच्या बाणांनी मैदान जिंकलं आणि तिच्या आत्मविश्वासाने लाखो हृदयं!
अत्यंत कठीण स्पर्धकांविरुद्ध तिने उत्तम कामगिरी केली. प्रत्येक टप्प्यात तिच्या बाणांनी लक्ष्याचा वेध घेतला. अंतिम सामन्यात अखेरच्या निर्णायक क्षणी तिने असा एक बाण सोडला की, तो फक्त लक्ष्यावरच नाही, तर इतिहासावरही अचूक जाऊन लागला!
संपूर्ण स्टेडियम तिच्या नावाच्या जयघोषाने दणाणून गेले. भारताचा तिरंगा गर्वाने फडकत होता, आणि तिच्या डोळ्यांत स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान होतं.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजयांचे सोनेरी पान तिने केवळ ऑलिंपिकमध्येच नव्हे, तर विविध स्पर्धांमध्येही आपले वर्चस्व गाजवले.
, नॅशनल आर्चरी चॅम्पियनशिप सुवर्णपदक,आशियाई आर्चरी चॅम्पियनशिप रौप्य आणि कांस्य
, जागतिक आर्चरी चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची पदके
तिच्या या यशामुळे भारताच्या आर्चरी खेळाला नवी ओळख मिळाली आणि भारतीय खेळाडूंसाठी ती प्रेरणास्थान बनली.
शितलदेवीच्या अद्वितीय प्रवासानंतर तिला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले."अर्जुन पुरस्कार" भारत सरकारचा सर्वोच्च क्रीडा सन्मान, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी गौरव , तिच्या संघर्षाला दिलेली
तिच्या प्रवासाने हजारो दिव्यांग आणि महिला खेळाडूंना स्वप्न बघण्याची आणि ती सत्यात उतरवण्याची प्रेरणा दिली.
शारीरिक अपंगत्व म्हणजे अपयश नव्हे! इच्छाशक्ती असेल, तर कोणतीही मर्यादा यशाच्या आड येत नाही.
अविरत सराव आणि मेहनत हेच यशाचे खरे शस्त्र! खेळात प्राविण्य मिळवण्यासाठी सातत्य आवश्यक आहे.
आत्मविश्वास आणि जिद्द हा खरा विजयाचा मंत्र! कठीण प्रसंगातही हार मानू नये.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -