मुख्य सामग्रीवर वगळा

बालस्नेही महाराष्ट्र

@मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...

“आ” म्हणजे आकाशाएवढं प्रेम…“ई” म्हणजे ईश्वर…म्हणूनच  म्हणतात, प्रत्येकाला ईश्वरापर्यंत पोहोचता येत नाही, म्हणून ईश्वराने आईची निर्मिती केली.  आई मात्र लेकराच्या एका हाकेसाठी जगाच्या टोकापर्यंत धावते. आई म्हणजे दुधावरची साय असते. जशी साय दुधाचं सौंदर्य वाढवते, तशी आई घराचं सौंदर्य वाढवते. जशी साय गोड, मऊ आणि शुद्ध असते, तशीच आईची माया निर्मळ आणि निस्वार्थ असते. साय काढली तर दूध अपूर्ण वाटतं; तशी आई नसली तर आयुष्य अपूर्ण वाटतं. आई ही लेकराच्या आयुष्याची पहिली गुरू असते. ती चालायला शिकवते, बोलायला शिकवते, जगायला शिकवते. तिच्या अंगाई त प्रेम असते तर तिच्या गोष्टींमध्ये संस्कार दडलेले असतात. आईच्या कुशीतच लेकराला पहिल्यांदा सुरक्षिततेची जाणीव होते. लहान लेकरू रात्री रडते, तेव्हा आईचं हृदय आधी जागं होतं. स्वतःची झोप, भूक, थकवा विसरून ती लेकरासाठी उभी राहते. मुलगा आजारी पडला की रात्रभर त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टी ठेवत जागणारी आई असते. स्वतः उपाशी राहून लेकराला घास भरवणारी आई असते. आईचं प्रेम हे जगातील सर्वात पवित्र प्रेम असतं. या जगात प्रत्येक नातं क...

@मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...

“आ” म्हणजे आकाशाएवढं प्रेम…“ई” म्हणजे ईश्वर…म्हणूनच  म्हणतात,
प्रत्येकाला ईश्वरापर्यंत पोहोचता येत नाही,
म्हणून ईश्वराने आईची निर्मिती केली.
 आई मात्र लेकराच्या एका हाकेसाठी जगाच्या टोकापर्यंत धावते.
आई म्हणजे दुधावरची साय असते.
जशी साय दुधाचं सौंदर्य वाढवते, तशी आई घराचं सौंदर्य वाढवते.
जशी साय गोड, मऊ आणि शुद्ध असते, तशीच आईची माया निर्मळ आणि निस्वार्थ असते.
साय काढली तर दूध अपूर्ण वाटतं; तशी आई नसली तर आयुष्य अपूर्ण वाटतं.
आई ही लेकराच्या आयुष्याची पहिली गुरू असते.
ती चालायला शिकवते, बोलायला शिकवते, जगायला शिकवते.
तिच्या अंगाई त प्रेम असते तर तिच्या गोष्टींमध्ये संस्कार दडलेले असतात.
आईच्या कुशीतच लेकराला पहिल्यांदा सुरक्षिततेची जाणीव होते.
लहान लेकरू रात्री रडते, तेव्हा आईचं हृदय आधी जागं होतं.
स्वतःची झोप, भूक, थकवा विसरून ती लेकरासाठी उभी राहते.
मुलगा आजारी पडला की रात्रभर त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टी ठेवत जागणारी आई असते.
स्वतः उपाशी राहून लेकराला घास भरवणारी आई असते.
आईचं प्रेम हे जगातील सर्वात पवित्र प्रेम असतं.
या जगात प्रत्येक नातं काहीतरी अपेक्षा ठेवतं, पण आईचं प्रेम अपेक्षाविरहित असते.
मुलगा गरीब असो वा श्रीमंत, यशस्वी असो वा अपयशी आईच्या प्रेमात कधीच फरक पडत नाही.
गरीब घरातील आईचा संघर्ष तर शब्दांच्या पलीकडचा असतो.
हाताला  पडलेले असतात, पण चेहऱ्यावर हसू असतं.
उन्हातान्हात मजुरी करून मुलांच्या शिक्षणासाठी पैसे जमवणारी आई म्हणजे त्यागाची मूर्ती असते.
आईच्या हातच्या जेवणाची चव जगात कुठेच मिळत नाही.
तिच्या हातच्या साध्या भाकरीतही अमृताची गोडी असते.
कारण त्या घासात फक्त मसाले नसतात, तर आईचं प्रेम मिसळलेलं असतं.
“जेवलास का रे?” हा तिचा प्रश्न कधीच बदलत नाही.
तिच्या डोळ्यांत सतत लेकराच्या भेटीची आस असते.
आजच्या धावपळीच्या युगात अनेक वृद्ध आई-वडील वृद्धाश्रमात दिसतात.
ही आपल्या समाजासाठी मोठी वेदना आहे.
ज्या आईने नऊ महिने पोटात सांभाळलं, स्वतःच्या रक्ताचं पाणी करून वाढवलं, तिच्यासाठी वृद्धाश्रम हा शब्दही काळजाला हात घालतो.
ती स्वतः जळते, पण घराला प्रकाश देते.
ती स्वतः झिजते, पण लेकरांचं आयुष्य घडवते.
छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ असोत किंवा आपल्या मुलांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारी सामान्य आई असो प्रत्येक आई महान आहे..
भारतीय संस्कृतीत म्हणूनच “मातृदेवो भव” असं सांगितलं गेलं आहे.
आईच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच भाषा असते.
ती काही बोलली नाही तरी तिचं मन लेकराला समजतं.
लेकरू दुःखी असेल तर तिचं हृदय आधी रडतं.
संपूर्ण जगाने नाकारलं तरी आई मात्र आपल्या लेकराला कवेत घेते.
एकदा आईच्या चरणी बसून पाहा…
तिथेच ईश्वराचं खरं रूप दिसेल....
मातृदिनांच्या हार्दिक शुभेच्छा..
मनोज चौरपगार 
9403618991

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...