“आ” म्हणजे आकाशाएवढं प्रेम…“ई” म्हणजे ईश्वर…म्हणूनच म्हणतात, प्रत्येकाला ईश्वरापर्यंत पोहोचता येत नाही, म्हणून ईश्वराने आईची निर्मिती केली. आई मात्र लेकराच्या एका हाकेसाठी जगाच्या टोकापर्यंत धावते. आई म्हणजे दुधावरची साय असते. जशी साय दुधाचं सौंदर्य वाढवते, तशी आई घराचं सौंदर्य वाढवते. जशी साय गोड, मऊ आणि शुद्ध असते, तशीच आईची माया निर्मळ आणि निस्वार्थ असते. साय काढली तर दूध अपूर्ण वाटतं; तशी आई नसली तर आयुष्य अपूर्ण वाटतं. आई ही लेकराच्या आयुष्याची पहिली गुरू असते. ती चालायला शिकवते, बोलायला शिकवते, जगायला शिकवते. तिच्या अंगाई त प्रेम असते तर तिच्या गोष्टींमध्ये संस्कार दडलेले असतात. आईच्या कुशीतच लेकराला पहिल्यांदा सुरक्षिततेची जाणीव होते. लहान लेकरू रात्री रडते, तेव्हा आईचं हृदय आधी जागं होतं. स्वतःची झोप, भूक, थकवा विसरून ती लेकरासाठी उभी राहते. मुलगा आजारी पडला की रात्रभर त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टी ठेवत जागणारी आई असते. स्वतः उपाशी राहून लेकराला घास भरवणारी आई असते. आईचं प्रेम हे जगातील सर्वात पवित्र प्रेम असतं. या जगात प्रत्येक नातं क...
“आ” म्हणजे आकाशाएवढं प्रेम…“ई” म्हणजे ईश्वर…म्हणूनच म्हणतात,
प्रत्येकाला ईश्वरापर्यंत पोहोचता येत नाही,
आई मात्र लेकराच्या एका हाकेसाठी जगाच्या टोकापर्यंत धावते.
आई म्हणजे दुधावरची साय असते.
जशी साय दुधाचं सौंदर्य वाढवते, तशी आई घराचं सौंदर्य वाढवते.
जशी साय गोड, मऊ आणि शुद्ध असते, तशीच आईची माया निर्मळ आणि निस्वार्थ असते.
साय काढली तर दूध अपूर्ण वाटतं; तशी आई नसली तर आयुष्य अपूर्ण वाटतं.
आई ही लेकराच्या आयुष्याची पहिली गुरू असते.
ती चालायला शिकवते, बोलायला शिकवते, जगायला शिकवते.
तिच्या अंगाई त प्रेम असते तर तिच्या गोष्टींमध्ये संस्कार दडलेले असतात.
आईच्या कुशीतच लेकराला पहिल्यांदा सुरक्षिततेची जाणीव होते.
लहान लेकरू रात्री रडते, तेव्हा आईचं हृदय आधी जागं होतं.
मुलगा आजारी पडला की रात्रभर त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टी ठेवत जागणारी आई असते.
स्वतः उपाशी राहून लेकराला घास भरवणारी आई असते.
आईचं प्रेम हे जगातील सर्वात पवित्र प्रेम असतं.
या जगात प्रत्येक नातं काहीतरी अपेक्षा ठेवतं, पण आईचं प्रेम अपेक्षाविरहित असते.
मुलगा गरीब असो वा श्रीमंत, यशस्वी असो वा अपयशी आईच्या प्रेमात कधीच फरक पडत नाही.
गरीब घरातील आईचा संघर्ष तर शब्दांच्या पलीकडचा असतो.
हाताला पडलेले असतात, पण चेहऱ्यावर हसू असतं.
उन्हातान्हात मजुरी करून मुलांच्या शिक्षणासाठी पैसे जमवणारी आई म्हणजे त्यागाची मूर्ती असते.
आईच्या हातच्या जेवणाची चव जगात कुठेच मिळत नाही.
तिच्या हातच्या साध्या भाकरीतही अमृताची गोडी असते.
कारण त्या घासात फक्त मसाले नसतात, तर आईचं प्रेम मिसळलेलं असतं.
“जेवलास का रे?” हा तिचा प्रश्न कधीच बदलत नाही.
तिच्या डोळ्यांत सतत लेकराच्या भेटीची आस असते.
आजच्या धावपळीच्या युगात अनेक वृद्ध आई-वडील वृद्धाश्रमात दिसतात.
ही आपल्या समाजासाठी मोठी वेदना आहे.
ज्या आईने नऊ महिने पोटात सांभाळलं, स्वतःच्या रक्ताचं पाणी करून वाढवलं, तिच्यासाठी वृद्धाश्रम हा शब्दही काळजाला हात घालतो.
ती स्वतः जळते, पण घराला प्रकाश देते.
ती स्वतः झिजते, पण लेकरांचं आयुष्य घडवते.
छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ असोत किंवा आपल्या मुलांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारी सामान्य आई असो प्रत्येक आई महान आहे..
भारतीय संस्कृतीत म्हणूनच “मातृदेवो भव” असं सांगितलं गेलं आहे.
आईच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच भाषा असते.
ती काही बोलली नाही तरी तिचं मन लेकराला समजतं.
लेकरू दुःखी असेल तर तिचं हृदय आधी रडतं.
एकदा आईच्या चरणी बसून पाहा…
तिथेच ईश्वराचं खरं रूप दिसेल....
मनोज चौरपगार
9403618991
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -