मुख्य सामग्रीवर वगळा

@मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...

“आ” म्हणजे आकाशाएवढं प्रेम…“ई” म्हणजे ईश्वर…म्हणूनच  म्हणतात,
प्रत्येकाला ईश्वरापर्यंत पोहोचता येत नाही,
म्हणून ईश्वराने आईची निर्मिती केली.
 आई मात्र लेकराच्या एका हाकेसाठी जगाच्या टोकापर्यंत धावते.
आई म्हणजे दुधावरची साय असते.
जशी साय दुधाचं सौंदर्य वाढवते, तशी आई घराचं सौंदर्य वाढवते.
जशी साय गोड, मऊ आणि शुद्ध असते, तशीच आईची माया निर्मळ आणि निस्वार्थ असते.
साय काढली तर दूध अपूर्ण वाटतं; तशी आई नसली तर आयुष्य अपूर्ण वाटतं.
आई ही लेकराच्या आयुष्याची पहिली गुरू असते.
ती चालायला शिकवते, बोलायला शिकवते, जगायला शिकवते.
तिच्या अंगाई त प्रेम असते तर तिच्या गोष्टींमध्ये संस्कार दडलेले असतात.
आईच्या कुशीतच लेकराला पहिल्यांदा सुरक्षिततेची जाणीव होते.
लहान लेकरू रात्री रडते, तेव्हा आईचं हृदय आधी जागं होतं.
स्वतःची झोप, भूक, थकवा विसरून ती लेकरासाठी उभी राहते.
मुलगा आजारी पडला की रात्रभर त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टी ठेवत जागणारी आई असते.
स्वतः उपाशी राहून लेकराला घास भरवणारी आई असते.
आईचं प्रेम हे जगातील सर्वात पवित्र प्रेम असतं.
या जगात प्रत्येक नातं काहीतरी अपेक्षा ठेवतं, पण आईचं प्रेम अपेक्षाविरहित असते.
मुलगा गरीब असो वा श्रीमंत, यशस्वी असो वा अपयशी आईच्या प्रेमात कधीच फरक पडत नाही.
गरीब घरातील आईचा संघर्ष तर शब्दांच्या पलीकडचा असतो.
हाताला  पडलेले असतात, पण चेहऱ्यावर हसू असतं.
उन्हातान्हात मजुरी करून मुलांच्या शिक्षणासाठी पैसे जमवणारी आई म्हणजे त्यागाची मूर्ती असते.
आईच्या हातच्या जेवणाची चव जगात कुठेच मिळत नाही.
तिच्या हातच्या साध्या भाकरीतही अमृताची गोडी असते.
कारण त्या घासात फक्त मसाले नसतात, तर आईचं प्रेम मिसळलेलं असतं.
“जेवलास का रे?” हा तिचा प्रश्न कधीच बदलत नाही.
तिच्या डोळ्यांत सतत लेकराच्या भेटीची आस असते.
आजच्या धावपळीच्या युगात अनेक वृद्ध आई-वडील वृद्धाश्रमात दिसतात.
ही आपल्या समाजासाठी मोठी वेदना आहे.
ज्या आईने नऊ महिने पोटात सांभाळलं, स्वतःच्या रक्ताचं पाणी करून वाढवलं, तिच्यासाठी वृद्धाश्रम हा शब्दही काळजाला हात घालतो.
ती स्वतः जळते, पण घराला प्रकाश देते.
ती स्वतः झिजते, पण लेकरांचं आयुष्य घडवते.
छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ असोत किंवा आपल्या मुलांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारी सामान्य आई असो प्रत्येक आई महान आहे..
भारतीय संस्कृतीत म्हणूनच “मातृदेवो भव” असं सांगितलं गेलं आहे.
आईच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच भाषा असते.
ती काही बोलली नाही तरी तिचं मन लेकराला समजतं.
लेकरू दुःखी असेल तर तिचं हृदय आधी रडतं.
संपूर्ण जगाने नाकारलं तरी आई मात्र आपल्या लेकराला कवेत घेते.
एकदा आईच्या चरणी बसून पाहा…
तिथेच ईश्वराचं खरं रूप दिसेल....
मातृदिनांच्या हार्दिक शुभेच्छा..
मनोज चौरपगार 
9403618991

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.