मुख्य सामग्रीवर वगळा

"डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम".



 "डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम".
भारताचे प्रख्यात अवकाश-शास्त्रज्ञ व माजी  राष्ट्रपती...
वाचन प्रेरणा दिन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. 
वाचन प्रेरणा दिन 15 ऑक्टोंबर या दिवशी असतो. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन या नावाने ओळखले जाते. भारतातील युवा शक्तीमुळे भारत देश महासत्ता बनणार, यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे अब्दुल कलाम यांचे म्हणणे आहे.
त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम  होते, त्यांचा जन्म 15ऑक्टोबर  1931
 तमिळनाडू, भारत 
यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते.   ते भारताचे अकरावे राष्ट्रपती.     
आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते
 "लोकांचे राष्ट्रपती"!! म्हणून लोकप्रिय झाले.
१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत  I.S.R.O  क्षेपणास्त्र koविकासातील एसएलव्ही  सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओ  D.R.D.O )मध्ये आले.
स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हा पासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत  असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल - ३या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या विक्रम साराभाई अवकाश केंद्रा चे ते प्रमुख झाले.
वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील _अग्नी_ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुनहा एम.बी.टी.( Man Battle Tank) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट ( एलसीए ) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.1960 मध्ये मद्रास येथून  पदवी घेतल्यानंतर कलाम हे संरक्षण संशोधन आणि विकास सेवा  चे सदस्य बनले आणि त्यानंतर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, भारत सरकारद्वारे) एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटमध्ये शास्त्रज्ञ म्हणून सामील झाले. त्यांनी एक लहान हॉवरक्राफ्ट डिझाईन करून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, परंतु डीआरडीओमध्ये नोकरीच्या निवडीबद्दल त्यांना खात्री पटली नाही. कलाम हे प्रसिद्ध अंतराळ शास्त्रज्ञ यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या INCOSPAR समितीचा देखील भाग होते.

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा गौरव करण्यात आला...
मेघालयची राजधानी शिलाँग येथे 27 जुलै 2015 रोजी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्यामुळे डॉ. माजी राष्ट्रपती डॉ.कलाम यांचे अंतिम संस्कार गुरुवारी 30 जुलै 2015 रोजी सकाळी 11 वाजता तामिळनाडूतील रामेश्वरम शहरात पूर्ण सैन्य सन्मानासह करण्यात आले.त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात, त्यांना प्रेमाने "जनतेचे राष्ट्रपती" (People's President) म्हणून ओळखले जात असे. असे म्हणतात की ऑफिस ऑफ द प्रॉफिट स्वाक्षरी करणे हा त्यांच्या कार्यकाळात घेतलेला सर्वात कठीण निर्णय होता.राष्ट्रपतीपदानंतर कलाम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदूर येथे व्हिजिटिंग प्रोफेसर बनले; इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोरचे मानद फेलो; इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी तिरुवनंतपुरमचे कुलपती; अण्णा विद्यापीठातील एरोस्पेस अभियांत्रिकीचे प्राध्यापक; आणि भारतभरातील इतर अनेक शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये सहायक. त्यांनी हैदराबादच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये माहिती तंत्रज्ञान आणि बनारस हिंदू विद्यापीठ आणि अण्णा विद्यापीठात तंत्रज्ञान शिकवले.
डॉ अब्दुल कलाम हे एक महान शास्त्रज्ञ होते तसेच एक गंभीर विचारवंत आणि एक चांगले मानव होते. 
डॉ. कलाम यांच्या मते,
 एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनीआपल्या जीवनात अनेक साहित्य पुस्तके वाचावी, आणि आपल्या जीवनाचा आणिसमाजाचा उद्धार करावा..

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

#तारे जमी पर -

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.