संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...
मुलांचे बालपण चांगले जावे, त्यांना बालपणात वेगवेगळे अनुभव घेता यावेत, जेणेकरून त्यांचा विकास चांगला होईल यासाठी प्रत्येक पालकाने त्यांना बाहेर खेळण्याची सवय लावली पाहिजे.
कारण त्याचे अनेक प्रकारे फायदा मुलांना होतात.सगळ्यात महत्वाचे म्हणजे बाहेर खेळल्याने मुलांचा व्यायाम होतो.
यामुळे त्यांचा शारीरिक विकास योग्य पद्धतीने होते. त्यांचे टीव्ही बघणे, गेम खेळणे कमी होते.याव्यतिरिक्त सुद्धा बाहेर खेळण्याचे मुलांच्या मानसिक विकासासाठी अनेक फायदे आहेत.
@Childhood
मुलांना सामाजिक भान येते
समजा जर तुम्ही मुलांना घरीच ठेवले तर त्यांना बाहेर, चार लोकात कसे वागायचे याची समज येणार नाही.
@yoga
बाहेर गेल्यावर काय करायचे, काय नाही हे त्यांना शिकवण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे त्यांना बाहेर घेऊन जाणे किंवा त्यांना बाहेर सोडणे.लोकांशी कसे बोलायचे, आपल्याला काही आडले तर लोकांना मदत कशी मागायची याचे प्रात्यक्षिक त्यांना मिळते.तुमची जर लहानशी फॅमिली असेल तर याचा विशेष उपयोग होईल.
परिवारात जर जास्त सदस्य नसतील तर इतरांशी मिळून-मिसळून कसे वागायचे हे मुलांना माहीत नसते.
त्यांना जर बाहेर सोडले तर ते आपणहून चार लोकांशी बोलतात.
यामुळे त्यांचा परीघ विस्तारित होतो. केवळ आपले घर, आपले आईबाबा हेच जग नाही, याची जाणीव त्यांना होते.
यामुळे ते दुसऱ्यांचा विचार करायला शिकतात, इतरांच्या भावनांना किंमत द्यायला शिकतात.
मुलांमध्ये ‘टिम स्पिरीट’ निर्माण होते
बाहेर न जाता घरात मुले एकटीच खेळत असतील तर त्यांना होणारा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे त्यांना मग इतर मुलांबरोबर जवून घ्यायला कठीण जाते.
(friends for each other)
त्यांचे मित्र लवकर होत नाहीत. त्यांना स्वतःपुरताच विचार करायची सवय लागते.
इतर मुलांशी खेळ किंवा खाऊ वाटणे त्यांना अवघड जाते. ती एकलकोंडी होतात.
याउलट जर तुम्ही तुमच्या मुलांना लहानपणापासूनच बाहेर खेळायची सवय लावली तर त्यांना इतर मित्र मैत्रिणी मिळतात.आपल्या वस्तू वाटून घ्यायचे भान त्यांच्यात येते.मुख्य म्हणजे चार मुलांशी मिळून-मिसळून खेळताना त्यांच्यात टीम स्पिरीट निर्माण होते.
आयुष्यात प्रगती करायची असेल तर या टिम स्पिरीटचा उपयोग होतो.
हे स्पिरीट त्यांना फक्त लहानपणीच नाही तर आयुष्यात पुढे, अगदी कामाच्या ठिकाणी सुद्धा उपयोगी पडणार असते.
(Play games and live fit)
मुलांना आयुष्याचे धडे गिरवायला मिळतात मुलांना शास्त्र, गणित, इतिहास, भूगोल असे विषय शाळेत शिकवता येतात पण अनुभवांचे काय?
ते काही त्यांना शिकवता येत नाहीत.
मुले जर बाहेर पडलीच नाहीत, चार मुलांबरोबर बाहेर, मैदानी खेळ खेळलीच नाहीत तर त्यांना वेगवेगळे अनुभव कसे येतील?
त्याचे जगणे बंदिस्त होऊन जाईल.
मुले प्रत्येक गोष्ट टिपत असतात. इतरांच्या वागण्याचा बोलण्याचा त्यांच्यावर परिणाम होत असतो.
यामुळे इतरांच्या मनात काय आहे हे ओळखणे, सगळ्यांशी मिळून मिसळून वागणे या गोष्टी ते आपसूकच शिकतात.
मुलांना प्रत्यक्ष उदाहरणातून शिकायला मिळते पुस्तकात वाचून शिकणे आणि प्रत्यक्षात अनुभव घेऊन शिकणे यात पुष्कळ फरक आहे.
मुले बाहेर पडून मैदानी खेळ खेळत असतील तर त्यांना मातीचे प्रकार, दगडाचे प्रकार, हवामान, निसर्ग, प्राणी, पक्षी, फुले या गोष्टी प्रत्यक्ष बघून शिकता येतील.
बाहेर खेळल्याने त्यांचे कुतूहल वाढेल. यामुळे ते सुद्धा अभ्यासात जास्त लक्ष घालायला बघतील.
(Daily education for good life)
यामुळे त्यांचा अभ्यास सुद्धा पक्का होईल आणि त्यांची प्रगती होत राहील.
मुलांच्या मनावरचा ताण दूर होतो
जसे तुम्हाला अनेक चिंता असतात, स्ट्रेस असतात अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा स्ट्रेस असतो.
त्यांच्या मानसिक विकासावर या स्ट्रेसचा परिणाम होत असतो.
असूया, असुरक्षितता, भीती यासारख्या अनेक भावना मुलांच्या आत असतात. यामुळे त्यांना स्ट्रेस येतो.
पण बाहेर मैदानी खेळ खेळल्यामुळे शरीराला व्यायाम होतो आणि त्यांच्या मनावरचा ताण दूर व्हायला मदत होते.
मुलांची कधीकधी चिडचीड होत असते, त्यांना सुद्धा राग अनावर होऊ शकतो.
अशावेळी त्यांच्यावर ओरडणे हा उपाय नसतो. तर त्यांच्या भावनांना मोकळे करून देणे हा योग्य उपाय आहे.
पण हे कधी होईल? जर त्यांच्यात असलेल्या उर्जेला योग्य वाट मिळाली तर.
बाहेर मैदानी खेळ खेळल्यामुळे त्यांच्या शरीरातील उर्जा योग्य ठिकाणी खर्च होते त्यामुळे त्यांचा स्ट्रेस कमी होतो.
आईबाबांनो, मुलांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, प्रगती करण्यासाठी चांगले मार्क मिळवून चांगले शिक्षण घेणे जसे गरजेचे आहे तितकेच गरजेचे आहे वेगवेगळे अनुभव घेऊन अनुभव संपन्न होणे.
जर मुलांना चार चौघात मिसळता येत नसेल, टीम बरोबर काम करताना अडचणी येत असतील तर त्यांची प्रगती कशी होईल?
मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासाइतकाच मानसिक विकास सुद्धा महत्वाचा आहे,म्हणूनच मुलांच्या संगोपनात अभ्यासाइतकेच प्राधान्य खेळण्याला सुद्धा दिले पाहिजे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -