मुख्य सामग्रीवर वगळा

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

WORLD BLOOD DONOR DAY

माणसाच्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे रक्त.रक्त हे शरीरात नैसर्गिकरित्या तयार होत असते.परंतु अपघात व शस्रक्रिया यांमुळे अति रक्तस्त्राव होत असतो मग अश्यावेळी रक्ताची गरज भासते,अशावेळी आपल्याला तसेच आपल्या घरच्यांना स्वतःचा रक्तगट माहित असणे गरजेचे असते जेणेकरून गरजेच्या वेळी लवकरात लवकर आपल्याला मदत मिळेल.


रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास  महत्त्वाचे कार्य करते. भारत देशात १२० कोटी लोकसंख्या असूनही केवळ ७४ लाख ते १ कोटी २० लाख लिटर रक्त संकलित होते.



महत्त्वाचे रक्तगट दोंन आहेत. प्रथिन प्रकार ए, आणि प्रथिन प्रकार बी. यालाच ए रक्तगट आणि बी रक्तगट असे म्हणतात. तांबड्या पेशीवर कोणत्याही प्रकारचे प्रथिने नाहीत म्हणजे रक्तगट ओ. आणि ए, व बी या दोन्ही प्रकार्ची प्रथिने असल्यास एबी रक्तगट. रक्त हे पेशी आणि रक्तरस म्हणजे प्लाझमा या द्रवांनी बनलेले असते. रक्तपेशी ए गटातील असल्या म्हणजे रक्तरसामध्ये बी प्रकारच्या प्रथिनांविरुद्ध प्रतिद्रव्य असते. तसेच बी रक्तगट असल्यास ए प्रकारच्या पेशी विरुद्ध प्रतिद्रव्य रक्तरसामध्ये असते. ए बी रक्तगट असल्यास रक्तरसामध्ये प्रतिद्रव्य नाही. पण ओ गटाचे रक्त असल्यास रक्तरसामध्ये दोन्ही ए आणि बी पेशी विरुद्ध प्रतिद्रव्य असते.

"रक्तगटाचा शोध लॅंड्स्टेनर यानी लावला या शोधांबद्दल त्याना नोबेल पुरस्कार मिळाला".

अ‍ॅन्टिजेनांच्या भिन्‍नतेमुळे वेगवेगळ्या माणसांचे रक्‍त वेगवेगळे असते. या वेगवेगळ्या रक्‍तांनाच रक्‍तगट वा ब्लडग्रुप म्हणतात. ए. (प्रोटीन) असलेला ‘ए’ रक्‍तगट, बी असलेला ‘बी’ रक्‍तगट, दोन्ही असलेले ‘एबी’ रक्‍तगट यापैकी एकही प्रोटीन नसलेला ‘ओ’ रक्‍तगट.
@World blood donor day 14th june 
रक्‍तातील आरएच (ऱ्हिसस) हे सुद्धा एक प्रथिनेच असतात. ज्यांच्या रक्‍तात ते असते त्यांना आरएच पॉझिटिव्ह व नसणाऱ्याला आरएच निगेटिव्ह म्हणतात.
रक्‍तगट आनुवंशिक असतात व ते आपल्या शरीरात माता व पित्याकडून येणाऱ्या गुणसूत्रांवर अवलंबून असतात. माता व पिता यांच्या रक्तगटाप्रमाणे त्यांच्या अपत्यांचे रक्तगट असतात किंवा दोघांच्या रक्तगटाच्या एकत्रपणावर अवलंबून असतात. त्यामुळे भावा-बहिणींचे रक्‍तगट एकच असेल असे नाही.
समजा माता ‘ए’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘बी’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट असतात.
#ए आरएच पॉझिटिव्ह
#एबी आरएच पॉझिटिव्ह#एबी आरएच निगेटिव्ह
#ए निगेटिव्ह
#बी निगेटिव्ह#बी पॉझिटिव्ह
#ओ पॉझिटिव्ह#ओ निगेटिव्ह
समजा माता ‘एबी’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘ए’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट .
*ए आरएच पॉझिटिव्ह*एबी आरएच पॉझिटिव्ह
*एबी आरएच निगेटिव्ह*ए निगेटिव्ह
*बी निगेटिव्ह*बी पॉझिटिव्ह
समजा माता ‘ओ’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘ओ’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट आहे.
@ओ पॉझिटिव्ह@ओ निगेटिव्ह@बॉंबे रक्तगट
#निरोगी व्यक्ती वर्षातून किमान चार वेळा रक्त देऊ शकतात .

The theme for World Blood Donor Day 2024 is_
"20 years of celebrating giving: thank you blood donors"

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...