मुख्य सामग्रीवर वगळा

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

#पाणी & आपण

पृथ्वीवर वास्तव्य करणारे आम्ही निसर्गाने अगदी मोफत दिलेल्या अमूल्य अशा पाण्याचे महत्त्व जाणतो का? म्हणतात की पाणी जेवढे प्याल तेवढे कमीच आहे. परंतु, ही बाब खरोखरच पूर्णपणे सत्य आहे का, असे विचारले तर त्याचे उत्तर नाही असेच येईल. गरजेपेक्षा जास्त पाणी पिणेदेखील आरोग्यास घातक ठरू शकते. कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात करणे केव्हाही धोकादायकच आणि पाणीदेखील त्याला अपवाद नाही. पाणी कार्बोहायड्रेट्स, प्रोटिनसारखे पोषणाचे काम करत असते.

जिवांना ज्या वस्तूची ज्या अनुपातात गरज असते निसर्गाने ते तत्त्वही त्याचा अनुपातात उपलब्ध करून दिले आहे. परंतु, सध्याचा विचार करता पाणी आणि वायू या दोन्ही गोष्टींबाबत गंभीर संकट निर्माण झाले असेल तर आम्ही नक्कीच कुठे ना कुठे चूक केली हे समजून घेण्याची गरज आहे. पाणी हा तरल पदार्थ आहे जो ठोस आणि वायू स्वरूपातही उपलब्ध आहे. 

पृथ्वीचा सुमारे 71 टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मानवासह भूतलावर असलेल्या सर्वच प्राण्यांसाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे. मात्र, असे असले तरी पिण्याचे स्वच्छ पाणी खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. सुरक्षित पाण्याचा अभाव म्हणजेच दुष्काळ. आजही देशाच्या अनेक भागांमध्ये पाण्याचा दुष्काळ असून, त्या भागातील जनतेला पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे हे एक फार मोठे आव्हान आहे. पाण्याच्या अभावामुळे लोकांना अनेक दैनंदिन समस्यांना तोंड द्यावे लागते. दुष्काळी भागातील लोकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी खूप प्रयत्न, पैसा आणि वेळ लागतो. केवळ भारतच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. ज्या लोकांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध आहे त्यांना आपण दररोज अनावश्यक कारणांसाठी जो पाण्याचा अपव्यय करतो त्याचे महत्त्वच लक्षात येत नाही.

आपणा सर्वांना याची कल्पना असेलच की, पृथ्वीवरील फक्त दोन टक्के पाणी शुद्ध आणि मानवाने सेवन करण्यासाठी उपयुक्त आहे. बहुतांश पाणी ग्लेशियर, बर्फ आणि इतर खुल्या स्रोतांमध्ये अडकले आहे. भूजल हा शुद्ध पाण्याचा मुख्य स्रोत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तिथे पाण्याचे शुद्धीकरण करण्याची नैसर्गिक प्रक्रिया उपलब्ध असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून जागतिक हवामान बदल, प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग या विविध कारणांमुळे भूजलाची पातळी दिवसेंदिवस खाली जात असून, नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळामुळे स्वच्छ पाण्याची अनुपलब्धता वाढत आहे. वाढती लोकसंख्या, कृषी व औद्योगिक क्षेत्राची वाढती गरज लक्षात घेता येणार्या दशकांमध्ये स्वच्छ पाण्याच्या पुरवठ्याच्या मागणीत वाढ होणार हे निश्चित.

ही बाब लक्षात घेता शक्य तेवढे पाणी वाचविण्यासाठी आम्ही एकत्र येऊन प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. दैनंदिन जीवनात पाणी वाचविण्याचे अनेक उपाय आहेत. जल संवर्धनाच्या वेगवेगळ्या पद्धतींनुसार पाणी वाचविले जाऊ शकते. वर्तमान आणि भविष्यातील गरज भागवायची असेल तर पाणी वाचविण्यासह ते प्रदूषित होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. येणार्या पिढ्यांना पाणी उपलब्ध होईल हे सुनिश्चित करण्यासाठी आज ते वाचविणे आवश्यक आहे. जर आम्ही आजच या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली नाहीत तर नैसर्गिक स्रोतांपासून मिळणार्या शुद्ध पाण्याची कमतरता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. पाण्याची गरज कमीत कमी करुन आम्ही केवळ मानवालाच नव्हे, तर शुद्ध पाण्याचे स्रोत, स्थानिक वन्यजीव आणि स्थलांतरित पक्ष्यांनाही वाचवू शकतो. यादृष्टीने पाण्याचा प्रत्येक थेंब न थेंब वाचविण्यासाठी आम्हाला आमच्या सवयींमध्ये अनेक सकारात्मक बदल घडवून आणावे लागतील.
पाणी पिण्याचे फायदे:-
१)सकाळी झोपेतून उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी पिणं गरजेचं असतं. पाणी न पिताच चहा किंवा कॉफी प्यायल्याने पित्त, गॅस किंवा इतर अनेक समस्या निर्माण होवू शकतात. शरीरात ७० टक्के पाणी असतं.
शरीराचं कार्य सुरळीत चालण्यालाठी पाणी गरजेचं असतं. खरं तर रात्री आपण झोपलो असलो तरी आपल्या शरीरात अनेक प्रक्रिया सुरु असतात. शरीरातील रासायनिक प्रक्रियेसाठी पाण्याची आवश्यकता असल्याने सकाळी उठल्यानंतर आधी चहा कॉफी किंवा ज्यूस पिण्याएवजी साधं पाणी पिणं हा एक आरोग्यदायी पर्याय आहे.शरीर स्वच्छ होण्यास मदत- पाणी हे एखाद्या क्लिंजरप्रमाणे आपल्या शरीरात काम करतं. सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायल्य़ाने शरीरात साचलेले टॉक्सिन म्हणजेच विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.

२)त्वचेवर चमक येते- सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. पाण्यामुळे रक्तप्रवाह वाढण्यास आणि नव्या रक्तपेशी तयार होण्यास मदत होत असल्याने त्वचेवर skin glow येतो. तसचं चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

३. चयापचय क्रिया सुधारते- रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यावने चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. यामुळे वजन कमी होण्यासही मदत होवू शकते. त्यामुळेच ज्यांन वजन कमी करायचं आहे. त्यांनी सकाळी उठल्यानंतर पाणी पिणं गरजेचं आहे.

४)मूतखडा आणि युरीन इंफेक्शनचा धोका कमी- पाण्यामुळे पोटातील आम्लता कमी होवून मूतखड्याचा धोका कमी होते. तुम्ही सकाळी उठून जितकं पाणी प्याल तितकेच विषारी पदार्थ तुमच्या शरीरातून बाहेर पडण्यास मदत होईल. यामुळे युरीन इंफेक्शनचा धोका कमी होईल.

५. बद्धकोष्ठता होईल दूर- बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्यांनी सकाळी उठल्यानंतर किमान २ ग्लास तरी पाणी प्यावं. नियमितपणे पाण्याचं सेवन केल्यास लवकरच बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल. यामुळे मल उत्सर्जनास कोणताही त्रास देखील होणार नाही.
@बालस्नेही
#Drink water 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...