मुख्य सामग्रीवर वगळा

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

@एकच मिशन जूनी पेंशन #OPS


जुनी पेन्शन हक्कासाठी.!!    
 चलो अमरावती.             
सप्रेम नमस्कार ,

गेल्या काही वर्षापासून पेन्शन हा विषय घेवून आपण संघटनात्मक लढा शासनाविरुद्ध लढत आहोत. जुनी पेन्शन योजना लागू होणेसाठी शक्य ते सर्व प्रयत्न आपण करत आहोत व करताच राहणार. हाच विषय घेवून *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने* विविध चार राज्यातून पेंशन यात्रा काढल्या आहेत पैकी दिनांक 5 सप्टेंबर पासून तामिळनाडू येथून निघालेली  भारत *पेन्शन संघर्ष यात्रा* ही आपल्या जिल्ह्यात *शनीवारी* येत आहे . या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेचे  नेतृत्व आपल्या प्राचीन भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे *राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री हरगोविंदणजी श्रीमती.सीमा माथुर दिल्ली (राष्ट्रीय महिला सचिव) तसेच श्रीमती रमादेवी आंध्रप्रदेश (राष्ट्रीय उपाध्यक्ष)असल्याने आपल्या या  लढ्याला बळकटी देणेसाठी एक पेन्शन योद्धा म्हणून आपण  सर्वांनी सहभागी होवू या.     
                
 *कत्रांटी शिक्षक भरतीस विरोध,
 शाळा दत्तक योजनेस सामुहिक विरोध करून शाळा वाचविणे,
 कमी पटाच्या शाळा बंद करण्यास विरोध करण्यासाठी*, 
सर्वांनी सहभागी व्हावे.
*पेंशन यात्रेचे अमरावती जिल्ह्यातील नियोजन पुढीलप्रमाणे:-* 
*दिनांक: 30/09/2023*
*वार: शनीवार 🕙सकाळी 10:00🕙 वा.*
*आगमन स्थळ: यवतमाळ टी पॉइंट जनक रेसिडेन्सी जवळ.* 
                                                                  ₹₹₹₹🚴🏿‍♀️ *बाईक रॅली*  🚴🏿‍♂️₹₹₹₹                                                                        
*रॅली प्रारंभ वेळ:- 10.30 वा.

 मार्गे 
जनक रेसिडेन्सी, 
बस डेपो बडनेरा, 
जूनिवस्ती, साईनगर, 
नवाथे प्लॉट, राजापेठ, 
राजकमल चौक, जयस्तंभ चौक, 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,
 गर्ल हायस्कूल चौक ला वळण घेऊन प.स.भातकुली सभागृह शिक्षणाधिकारी कार्यालय येथे रॅली विसर्जित होऊन तिथे सभा होईल. 
---------------------------------------------------
           ▫️    *सभा*   ▫️                                                                
▫️वेळ: 11 :30 वा.▫️
*स्थळ: प. स. भातकुली सभागृह, शिक्षणाधिकारी कार्यालय परिसर अमरावती.*
------------------------------------------
*तरी आपण सर्वांनी सभेला उपस्थिती दर्शवावी,

ही विनंती.*
   

आपलेच विनीत
*राज्य उपाध्यक्ष तथा विदर्भ विभाग प्रमुख*.                                                                          किरण पाटील                    
*जिल्हाध्यक्ष*
गजानन चौधरी
*जिल्हा सरचिटणीस*.                                    सुभाष सहारें                                                  
*जिल्हा कार्याध्यक्ष*
संजय साखरे.                                            *जिल्हा कोषाध्यक्ष*                                     अशोक चव्हाण.                           
  *जेष्ठ उपाध्यक्ष*                           
ज्योतीताई उभाड                 
   संजय वाटाणे                              
 प्रमोद  घाटोळ    
*जिल्हाध्यक्ष(महिला)*
 सुनीता पाटील
*जिल्हा समन्वयक*
वृषाली देशमुख
                                                         

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...