प्रेमचंद यांनी महात्मा गांधी विचारांनी प्रेरित होऊन आपली सरकारी नोकरी सोडली व पहिली कादंबरी हिंदुस्थानवरील ब्रिटिश सत्तेच्या जुलमाची आणि भारतीयांच्या गुलामगिरीवर लिहिली. ती जेव्हा पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली, तेव्हा जप्त झाली. मात्र, देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक होण्यापासून प्रेमचंद वाचले. त्यानंतर त्यांनी आपले नबाब धनपतराय हे नाव बदलून प्रेमचंद घेतले.
इ.स. १९२१पर्यंत प्रेमचंद शिक्षण खात्यात डेप्युटी कलेक्टर म्हणून नोकरी करीत होते, मात्र त्यानंतर ते बनारसला परतले, आणि त्यांनी फक्त देशमुक्तीच्या संघर्षाकरिता आपली लेखणी चालवण्याचे ठरविले. इ.स. १९२३मध्ये त्यांनी 'सरस्वती प्रेस'ची स्थापना केली. प्रेसच्या खर्चासाठी कर्ज मिळविण्याच्या उद्देशाने प्रेमचंद मुंबईला आले व त्यांनी एक चित्रपट लिहून दिली. चित्रपटात त्यांनी मजुराच्या बापाची भूमिकाही केली. मात्र वर्षभरात प्रेमचंद परत गेले. प्रेमचंद हे लेखणीचा शिपाई म्हणून ओळखले जातात.
प्रेमचंद्र आधुनिक हिंदी साहित्याचे पितामह म्हणून ओळखले जातात. १९०१ पासून त्यांच्या साहित्यिक जीवनाचा आरंभ सुरू झाला. पण त्यांची पहिली हिंदी कथा सरस्वती पत्रिकेत डिसेंबरच्या अंकात १९१५ मध्ये 'सौत' या नावाने प्रकाशित झाली. त्यांचा पहिला कथासंग्रह 'सोजे वतन'. देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत असल्याने त्यांच्या पुस्तकांवर इंग्रज सरकारने बंदी घातली व अशा प्रकारचे लेखन करू नये म्हणून बजावण्यात आले.
मरणोपरान्त त्यांची कथा मानसरोवर नावाने ८ खंडांमध्ये प्रकाशित झाली. त्यांची शेवटची कथा 'कफन' १९३६मध्ये प्रकाशित झाली. याच्या आधी हिंदीमध्ये काल्पनिक,अय्यारी आणि पौराणिक धार्मिक रचनाच प्रकाशित केली जात होती. प्रेमचंद यांनी हिंदीमध्ये यथार्थवादाची सुरुवात केली. भारतीय साहित्याचा बराचसा विमर्श नंतर समोर आला. दलित साहित्य आणि नारी साहित्याची खोलवर मुळे प्रेमचंदांच्या साहित्यात दिसली. प्रेमचंदांचा लेख 'पहली रचना' आपल्या मामांवर लिहिलेला व्यंगलेख होता, मात्र हा आता अनुपलब्ध आहे. त्यांचा पहिली उपलब्ध कादंबरी उर्दू उपन्यास 'असरारे हमसवाब' होय. याचे हिंदीत रूपांतर प्रेमा नावाने १९०७ साली प्रकाशित झाले .प्रेमचंदांची दुसरी कादंबरी 'हमखुर्मा व हमसवाब' पण प्रकाशित झाली. यानंतर प्रेमचंदांचा पहिला कथासंग्रह सोज़े-वतन नावाने आला. तो १९०८मध्ये प्रकाशित झाला. देशभक्तीच्या भावनांनी ओतप्रोत असल्याने यावर इंग्रज़ी शासनाने बंदी घातली, आणि भविष्यात अशा प्रकारचे लेखन न करण्याचे निर्देश दिले. या कारणांनी त्यांना नाव बदलून लेखन करावे लागले. 'प्रेमचंद' या नावाने त्यांची पहिली कथा 'बड़े घर की बेटी 'ज़माना पत्रिका'मध्ये डिसेंबर १९१० च्या अंकात प्रकाशित झाली. कथा सम्राट प्रेमचंदांचे म्हणणे होते की साहित्यकार देशभक्ति आणि राजनीतीच्या मागे जाणारी सच्चाई नाही तर त्याच्या पुढे मशाल दाखवत चालणारी सच्चाई आहे. हे सत्य त्यांच्या साहित्यातून दिसून येते. १९२१मध्ये त्यांनी महात्मा गांधींच्या आवाहनानुसार आपली नोकरी सोडून दिली आणि काही महिने 'मर्यादा पत्रिकाचा संपादनभार सांभाळला. सहा वर्षापर्यंत 'माधुरी' या पत्रिकेचे संपादन केले. १९३०मध्ये बनारस येथून आपले मासिक पत्र 'हंस' सुरू केले आणि १९३२ च्या सुमारास जागरण नावाने एक साप्ताहिक अजून काढले. त्यांनी लखनौमध्ये १९३६ साली झालेल्या अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघ संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी मोहन दयाराम भवनानींच्या अजंता सिनेटोन कंपनीमध्ये कथालेखक म्हणून नोकरीपण केली. १९३४मध्ये प्रदर्शित मजदूर या फिल्मची कथा लिहिली आणि कॉन्ट्रॅक्ट केलेल्या वर्षभराचा कालावधी पूर्ण करण्याआधीच दोन महिन्याचा पगार सोडून ते बनारस येथे पळून गेले. त्यांनी मूळरूपाने हिंदीमध्ये १९१५ पासून कथा लिहिल्या आणि १९१८ च्या 'सेवासदन'पासून कादंबऱ्या लिहायला सुरुवात केलीप्रेमचंदांच्या अनेक कथांमध्ये निम्न व मध्यम वर्गांचे चित्रण आहे. डॉ॰ कमलकिशोर गोयंकाने प्रेमचंदांच्या सर्व हिंदी-उर्दू कथांना 'प्रेमचंद कथा रचनावली' नावाने प्रकाशित केले आहे. त्यांच्यानुसार प्रेमचंदांनी एकूण ३०१ कथा लिहिल्या, पैकी ३ अप्राप्य आहेत. प्रेमचंदांचा पहिला कथासंग्रह सोज़े वतन'नावाने जून १९०८मध्ये प्रकाशित झाला. याच संग्रहातली पहिली कथा 'जगातील सर्वात अनमोल रत्न'ला त्यांची पहिली प्रकाशित कथा मानले गेले.
प्रेमचंदांना "मुन्शी प्रेमचंद" या नावाने ओळखले जाते. प्रेमचंदांच्या नावाला 'मुंन्शी' कधी आणि केव्हा चिकटले ? या विषयावर बहुतेक लोक हेच मानतीत की सुरुवातीला प्रेमचंद अध्यापक होते अध्यापकांना त्या वेळी मुन्शी म्हटले जाई. शिवाय कायस्थांच्या नावापुढे सन्मानस्वरूपी 'मुन्शी' शब्द लावण्याची परंपरा होती म्हणून प्रेमचंदांच्या नावाआधी मुन्शी शब्द रूढ झाला.. प्रोफेसर शुकदेव सिंहांच्या मते प्रेमचंदांनी आपल्या नावाआधी 'मुन्शी' शब्दाचा प्रयोग स्वतः कधी केला नाही. प्रेमचंदांच्या प्रशंसकांनी 'मुन्शी' कधी लावले हे केवळ तर्काने जाणून घेता येते .प्रेमचंदांच्या नावाआधी मुन्शी हे विशेषण जोडण्याचे प्रामाणिक कारण हे आहे की 'हंस' नामक पत्रिका प्रेमचंद आणि 'कन्हैयालाल मुन्शी' यांच्या सहसंपादनामध्ये निघत असे. त्याच्या काही प्रतींवर कन्हैयालाल मुन्शींचे पूर्ण नाव न छापता फक्त 'मुन्शी' छापलेले असायचे. त्यामुळे प्रेमचंदांच्या नावालाही मुन्शी चिकटले.
प्रेमचंदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारतीय डाकतार विभागातर्फे ३० जुलै १९८०ला त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ३० पैसे मूल्याचे एक डाक तिकीट काढले होते. गोरखपुरच्या ज्या शाळेत ते शिक्षक होते तेथे प्रेमचंद साहित्य संस्थेची स्थापना केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -