संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...
11 में 1888 रोजी जोतिराव फुले महात्मा जोतिराव फुले झाले .
जनतेने सभा भरवून फुलेंना महात्मा ही पदवी बहाल केली. जनतेने सभा भरवून महात्मा ही पदवी बहाल केलेले एकमेव कृतिशील समाजसुधारक व विचारवंत आहेत.
अज्ञानाच्या अंधकारात अडकलेल्या बहुजन समाजाला ज्ञानाच्या प्रकाशात आणण्यासाठी जीवनभर ज्यांनी कार्य केलं. अस्पृश्यतेच्या विरोधात कृतिशील आंदोलन उभं केलं. स्वतः च्या घरातील पाण्याची विहीर अस्पृश्यांसाठी खुली केली. विधवा पुनर्वीवाह असेल किंवा आंतरजातीय विवाह असतील असे जाती अंताचे अनेक उपक्रम त्यांनी राबवले. चार भिंती मध्ये बंदिस्त असलेल्या महिलांना मुक्त श्वास घेण्याचा अधिकार दिला. छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या शोधा बरोबरच पहिली शिवजयंती साजरी करून महाराजांवरती पहिला पोवाडा लिहिला.शेतकऱ्यांची दयनीय अवस्था का झाली हे शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकातुन दाखवून दिले. 1882 मध्ये हंटर कमिशन समोर प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्यात यावं ही मागणी केली अशी मागणी करणारे जोतिराव फुले हे पहिले समाजसुधारक ठरतात. आपल्या साहित्यामध्ये बळीराजाचा, खंडोबाचा, हिरण्यकश्यपु, बुद्ध, तसेच शूरवीर महार जातींचा इतिहास मांडला आहे. संपूर्ण जगाला मानवतेकडे घेऊन जाईल असा सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ निर्माण केला.फुलेंची प्रेरणा घेऊन अनेक चळवळी, अनेक विचारवंत व समाजसुधारक उदयास आले. जोतिरावांच्या नेतृत्वात भारतातली पहिली कामगार संघटना उभी राहिली. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे दिन बंधू वृत्तपत्र उभे राहिले. सत्यशोधक समाज स्थापन करून सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या मध्ये समाविष्ट करून घेतले. अश्या या कृतीशील समाजसुधारकाच्या प्रति आदर म्हणून मुंबई मधील भायखळा येथे असलेल्या रघुनाथ महाराज सभागृहामध्ये मुंबईयेथील जनतेने जोतिराव फुलेंना वयाच्या 61 व्या वर्षी महात्मा ही पदवी बहाल केली. सदरील समारंभास रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे,रावबहादूर वंडेकर,स्वामी रामय्या अय्यावारू, मोरो विठ्ठल वाळवेकर इत्यादी मातब्बर मंडळी उपस्थित होती.पदवी दान कार्यक्रमानंतर महात्मा फुलेंनी भाषण केलं. जनतेचं प्रेम पाहून फुलेंचं मनभरून आलं. महात्मा फुलेंनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि जोतिराव फुले महात्मा झाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -