11 में 1888 रोजी जोतिराव फुले महात्मा जोतिराव फुले झाले .
जनतेने सभा भरवून फुलेंना महात्मा ही पदवी बहाल केली. जनतेने सभा भरवून महात्मा ही पदवी बहाल केलेले एकमेव कृतिशील समाजसुधारक व विचारवंत आहेत.
अज्ञानाच्या अंधकारात अडकलेल्या बहुजन समाजाला ज्ञानाच्या प्रकाशात आणण्यासाठी जीवनभर ज्यांनी कार्य केलं. अस्पृश्यतेच्या विरोधात कृतिशील आंदोलन उभं केलं. स्वतः च्या घरातील पाण्याची विहीर अस्पृश्यांसाठी खुली केली. विधवा पुनर्वीवाह असेल किंवा आंतरजातीय विवाह असतील असे जाती अंताचे अनेक उपक्रम त्यांनी राबवले. चार भिंती मध्ये बंदिस्त असलेल्या महिलांना मुक्त श्वास घेण्याचा अधिकार दिला. छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या शोधा बरोबरच पहिली शिवजयंती साजरी करून महाराजांवरती पहिला पोवाडा लिहिला.शेतकऱ्यांची दयनीय अवस्था का झाली हे शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकातुन दाखवून दिले. 1882 मध्ये हंटर कमिशन समोर प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्यात यावं ही मागणी केली अशी मागणी करणारे जोतिराव फुले हे पहिले समाजसुधारक ठरतात. आपल्या साहित्यामध्ये बळीराजाचा, खंडोबाचा, हिरण्यकश्यपु, बुद्ध, तसेच शूरवीर महार जातींचा इतिहास मांडला आहे. संपूर्ण जगाला मानवतेकडे घेऊन जाईल असा सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ निर्माण केला.फुलेंची प्रेरणा घेऊन अनेक चळवळी, अनेक विचारवंत व समाजसुधारक उदयास आले. जोतिरावांच्या नेतृत्वात भारतातली पहिली कामगार संघटना उभी राहिली. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे दिन बंधू वृत्तपत्र उभे राहिले. सत्यशोधक समाज स्थापन करून सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या मध्ये समाविष्ट करून घेतले. अश्या या कृतीशील समाजसुधारकाच्या प्रति आदर म्हणून मुंबई मधील भायखळा येथे असलेल्या रघुनाथ महाराज सभागृहामध्ये मुंबईयेथील जनतेने जोतिराव फुलेंना वयाच्या 61 व्या वर्षी महात्मा ही पदवी बहाल केली. सदरील समारंभास रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे,रावबहादूर वंडेकर,स्वामी रामय्या अय्यावारू, मोरो विठ्ठल वाळवेकर इत्यादी मातब्बर मंडळी उपस्थित होती.पदवी दान कार्यक्रमानंतर महात्मा फुलेंनी भाषण केलं. जनतेचं प्रेम पाहून फुलेंचं मनभरून आलं. महात्मा फुलेंनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि जोतिराव फुले महात्मा झाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -