संत बसवेश्वर महाराज कर्नाटकातील संत, समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्मातीलजातिव्यवस्थेविरुद्ध व अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला.
मातंग चेन्नय्या, डोहर कक्कय्या, हडपद अप्पाण्णा, नुलीय चंदय्या, कुंभार गुंडय्या, चांभार हरळय्या, अंबिगर चौडय्या, मेदार बुरुड केतय्या, तुरुंगाहि रामण्णा, मादार धूळय्या, वैद्य संगण्णा, कन्नप्पा तेली, किन्नरी बोमय्या, अल्लमप्रभु, बहुरूपी चौडय्या, शरण सुरय्या, शरण उरलिंगदेव हे शरण शुद्रातिशूद्र समजल्या जाणाऱ्या जातीतून बसवांच्या चळवळीत सहभागी झाले. सुळे सक्कव्वे, सुळे पद्मलदेवी, सुळे चामलदेवी यांसारख्या वेश्या बसवाच्या विचाराला प्रभावित होऊन शरणी झाल्या. वेश्या आपला पूर्वाश्रमीचा व्यवसाय आणि पूर्वाश्रम सोडून पुण्यांगना झाल्या. चोर, लुटारू, दरोडेखोर यांनी आपले दुष्कृत्य सोडून दिले. ते शरण बनले. दारू विकणारा हेडद मारय्या वाटसरूंच्या सेवेसाठी पाणी, दूध आणि ताक विकायला लागला.
सर्वजण दुष्कर्मे सोडून सदाचारी बनले,शरण बनले. महात्मा बसवेश्वरांनी ऐतखाऊ लोकांचे मनपरिवर्तन केले. त्यांना कष्टाचे महत्त्व समजावून सांगितले. कायकाकवे कैलास, श्रम हाच ईश्वर हा मूलमंत्र महात्मा बसवेश्वरांनी भारतीय अर्थव्यवस्थेला दिला. श्रमाला व्यवसायाला कायकाला मानाचे, सन्मानाचे स्थान प्राप्त करून दिले. दिवसभर कष्ट करून शरण संध्याकाळी अनुभवमंटपात एकत्र येत.
सुंदर आचरण असणाऱ्या व्यक्तीची सुंदर रचना म्हणजे वचने आहेत. वचने हे एक अनुभवजन्य साहित्य आहे. अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी, पुरोहितशाही, काल्पनिक धर्मग्रंथ, जातिभेद, स्त्रीदास्य, श्रम इ. अनेक विषयांवर प्रहार करणारे क्रांतिकारक विचार वचनांत आहेत. वचन हा लिंगायतांचा धर्मग्रंथ आहे.
बसवेश्वर वचनांचे महत्त्व सांगताना म्हणतात-
- आद्यांचे वचन परीस माने मी,
- परि ते परीस कैसे गवसे मज ?
- तन-मन-धन वर्जून सांगे मी,
- परि त्याचा स्पर्श सहन न होई मज
- अंत्यजाच्या ढोलकीसम बोलणारा दांभिक मी,
- कुडलसंगमदेवा.
आद्यांचे वचन परिसासम असे पहा :
- तेच सदाशिवलिंग, असा विश्वास ठेवावा,
- विश्वास ठेवताच तू विजयी पहा.
- अधरास कडू, उदरास गोड,
- कुडलसंगाच्या शरणांचे वचन
- कडूलिंब चाखल्यागत.
- जातीच्या आधारावर कोणीही भेदभाव करू नये . त्यांनी 'सेल्फ रिलायन्स'चा पुरस्कार केला आणि स्वतःची उदरनिर्वाह स्वतःच करावी असा आग्रह धरला. त्यांनी आपल्या शारीरिक श्रम तत्त्वज्ञानातून 'काम हेच काम' ही संस्कृती जोपासली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -