मुख्य सामग्रीवर वगळा

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

हॉकीचा जादूगार.

 हॉकीचा जादूगार.देशात 2012 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. देशाचे पंतप्रधान  यांनी खेळाच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे नाव बदलवून मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार केले आहे.
क्रिकेट, फुटबॉल, टेनिस च्या जमान्यात आजकालची मुले कदाचीत हॉकी हा मैदानी खेळ होता तसेच भारतीय राष्ट्रीय खेळ होता हेच विसरले असतिल?
कारण माझ्या मुलाला मी सहजच विचारले आपला राष्ट्रीय खेळ कोणता? तर त्याच उत्तर होत क्रिकेट.
आता त्यात त्याची किंवा राष्ट्रीय खेळ माहीत नसणाऱ्या नवतरूनांची काय चुकी? एक तर आम्ही हॉकी बद्दल कमालीचे उदासीन . दुसरे शाळेत हॉकी सारखा मोठे मैदान लागणारे खेळ घेतल्या जात नाहीत, घेतले तर माझ्या सारख्या शिक्षकाला हॉकी खेळायचे अपुरे ज्ञान, वरून बॉल लागायची भिती वेगळी?
टेलिव्हिजन वरून सुद्धा प्रक्षेपण कमीच? अनेक कारणे सांगता येईल?
पण हाच हॉकीचा खेळ एकेकाळी जगात भारताची ओळख देत होता.
त्या हॉकीचा भारतात आणि जगात ओळख देण्याचे काम जर कोणी केल असेल तर ते *हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांनी*
सैन्य कुटुंबात जन्माला आलेले ध्यानचंदला लहान पासुनच हॉकीचे आकर्षण म्हणून हॉकीची स्टिक मिळत नव्हती तेव्हा झाडाच्या फांदीचा उपयोग स्टिक म्हणून करत हॉकीत नैपुण्य निर्माण केल.
ऑलिम्पिक स्पर्धेत सतत तीन वेळा वर्ल्ड चॉम्पियन पटकावून जगात वेगळेच स्थान निर्माण केले.
एवढेच नव्हे तर 1936 मध्ये जर्मनीत जर्मनीला 8-1. हरवित तत्कालीन जर्मनहुकुमाशहा हिटलर याचे मन जिंकले. हिटलर तर एवढा प्रभावित झाला की त्याने ध्यानचंद ला सैन्य दलात मोठया अधिकाऱ्याची ऑफर दिली पण देशभक्त मेजर ध्यानचंद यांनी ती नाकारली. अशा महान खिलाडूला जीवनात अनेक पुरस्कार भेटले.
 त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिंनम्हणुन साजरा करण्यात येतो. पण.......... 
मेजर ध्यानचंद ज्या पदाचे खरे दावेदार होते ते अजूनही त्यांना मिळाले नाही ही हूरहूर नक्की मनाला लागते.ध्यानचंद यांचा जन्म अलाहाबाद येथे झाला. त्यांचे मोठे भाऊ रुपसिंंग हे सुद्धा हॉकीचे खेळाडू होते. ध्यानचंद यांचे वडील सोमेश्वर दत्त  सैन्यात होते. ते सुद्धा सैन्यात हाॅकी खेळायचे. अशाप्रकारे ध्यानचंद यांना हॉकीचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले.जर्मनी संघाला १९३६ मध्ये ८-१ ने नामावल्यानंतर, त्यांच्या खेळाने प्रभावित होऊन   हिटलरने नाकारली. त्यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत ४०० पेक्षा अधिक त्यांनी एकूण 580 गोल केले.गोल व  हॉकीच्या इतिहासात एका खेळाडूने केलेले सर्वाधिक गोल्स आहेत. भारत सरकारने १९५६ साली त्यांचा पदंभूषण  सत्कार करण्यात आला. 
मनोरंजन वा शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कोणतीही क्रीडा. खेळण्याची प्रवृत्ती ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. लहान
 बालका पासून वृद्धा पर्यंत सर्वांनाच खेळांची आवड असते. अगदी प्राथमिक अवस्थेतील मानवसमाजातह अनेक प्रकारचे खेळ खेळले जात. शिकार, कुस्ती, द्वंद्वे, कवड्या, सोंगट्या, फासे इ. खेळ ते खेळत. प्राचीन ग्रीक लोक अनेक प्रकारचे खेळ खेळत. खेळांना नियमित व सुसंघटित असे स्वरूप ग्रीक लोकांनीच दिले. त्यांच्या जीवनात खेळांना फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. ग्रीक लोकांच्या वैभवकालात त्यांचे ऑलिंपिक, नेमियन, पायथियन, इस्थमियन इ. नियतकालीन सामने प्रसिद्ध होते. या सामन्यांत भाग घेणे व विजय मिळविणे हे मानाचे समजले जाई. या सामन्यांत धावणे, थाळीफेक, रथांच्या व घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टीयुद्ध इ. खेळांचा समावेश असे. रोमन लोकांतही खेळांना प्राधान्य होते.आपल्या भारतात प्राचीन वैदिक कालात, तसेच रामायण व महाभारत कालात द्युत, फासे, कुस्ती, रथांच्या व घोड्यांच्या शर्यती इ. खेळ प्रचलित होते.खेळांना मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. जीवनातील व्यथा व चिंता विसरावया स लावून मनाला विरंगुळा देण्याचे तसेच शरीर व मन ताजेतवाने करण्याचे काम विविध खेळ करू शकतात. शारीरिक श्रमाची  खेळा  शरीरास भरपूर व्यायाम मिळतो आणि त्यामुळे शरीर काटक व बळकट बनते. खेळांमुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडू वृत्ती इ. गुणांचीह वाढ होते. सांघिक खेळामुळे सहकार्याची वृत्ती, संघभावना व नेतृत्वगुण यांना वाव मिळतो आणि या गुणांचा जीवनात विविध प्रसंगी उपयोग होतो. खेळातील चढा ओढी मुळे खेळांचा दर्जाही वाढतो. राष्ट्रा राष्ट्रांती ल क्रीडास्पर्धां मुळे आंतरराष्ट्रीय सामंजस्यह वाढीस लागते.
खेळांचे निरनिराळ्या  अनेक प्रकार पडतात. खेळांची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन सामान्यतः त्यांचे बैठे खेळ व मैदानी खेळ असे दोन प्रमुख प्रकार पडतात. बैठे  खेळ म्हणजे घरात बसून खेळले जाणारे खेळ. उदा., पत्त्यांचे खेळ, बुद्धिबळ सोंगट्या, , कॅरम इत्यादी. मैदानी खेळांतह छोटे मैदानी खेळ व मोठे मैदानी खेळ असे प्रकार असतात. छोट्या मैदान खेळांना छोटी बंदिस्त जागा व आखलेली क्रीडांगणे लागतात. या प्रकारात बॅडमिंटन, टेबल टेनिस, रिंग टेनिस, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल यांसारखे विदेशी खेळ येतात तर खोखो, कबड्डी, आट्यापाट्या, लंगडी इ. देशी खेळ येतात. दुसऱ्या प्रकारच्या मैदानी खेळांना मोठी मैदाने लागतात. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, पोलो, बेसबॉल, गोल्फ इ. विदेशी खेळ मोडतात. यांशिवाय क्षेत्रीय शर्यतींच खेळ असतात १०० मी.,  २०० मी. ते मॅरॅथॉन शर्यत  फेकण्याच गोळाफेक थाळीफेक इ उड्यां लांब उडी, उंच उडी इ. सर्व प्रकार आणि सर्व प्रकारच्या अडथळ्यांच्या शर्यती यांचा समावेश होतो. पोहणे व पाण्यातील खेळ या गटात विविध प्रकारांनी व विविध अंतरे पोहून जाण्याच्या शर्यती, वॉटर-पोलो  उंचीवरून पाण्यात निरनिराळ्या प्रकारच्या उड्या आणि सूर मारणे इत्यादींचा अंतर्भाव होतो.  खेळात वेगवेगळ्या प्रकारच्या कुस्त्या, इत्यादींची गणना होते. शारीरिक   कसरतीखेळांमल्लखांब, आडवा दंड, जोड दंड,  घोडे,  यांसारख्या साधनांच्या आधारे करावयाच्या विविध शारीरिक कसरती व जमिनीवर करावयाच्या कोलांट उड्या,  यांसारख्या कसरती येतात. शीत कटिबंधातील देशांत जमिनीवर हिम पडते. तेथे अनेक प्रकारचे बर्फावरील खेळ खेळले जातात. त्यांत अनेक घसरण्याच्या शर्यती  व बर्फावरील हॉकी यांसारखे खेळ अंतर्भूत होतात. साहसी व रोमांचकारी खेळांत यंत्रविरहित आकाशयानातून उड्डाण करणेमोटारसायकलींच्या शर्यती, मोटार-शर्यती इ. येतात. मानवाच्या धाडसी प्रवृत्तीला अशा खेळांमुळे आव्हान मिळते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...