मुख्य सामग्रीवर वगळा

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

पारसी नूतनवर्ष दिन

पारशी संस्कृतीमध्ये झोराष्ट्रीयन कॅलेंडरनुसार कालगणना होते. त्यानुसार, 15 ऑगस्ट रोजी वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच पतेति सण साजरा करण्यात येईल. तर पुढचा दिवस म्हणजेच 16 ऑगस्ट हा दिवस पारसी नूतन वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाने पारशी कॅलेंडरमधील पहिला महिना फरवर्दीन या महिन्याची सुरुवात होते.पारशी समुदाय हा भारतातील अल्पसंख्याक समुदायांपैकी एक मानला जातो. भारतीय इतिहासात पारशी समुदायाला एक विशिष्ट असं स्थान आहे. या समाजातून अनेक उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वं उदयाला आली. या व्यक्तींनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या कर्तृत्वाची चुणूक वेळोवेळी दाखवून दिली आहे.पारशी समुदाय हा मूळचा इराणमधील पोरस प्रांतातील रहिवासी होता. याठिकाणचे ते राज्यकर्तेही होते.पण अरब मुस्लिमांच्या आक्रमणामुळे आपलं राहतं ठिकाण सोडण्याची वेळ पारशी समुदायावर आली होती. यानंतर जीव मुठीत धरून पारशी बांधव भारताच्या दिशेने निघाले.भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गुजरात राज्यातील दुर्गम अशा ठिकाणी एक गाव आहे उदवाडा. या परिसरातील संजन समुद्रकिनाऱ्यावर पारशी समुदायातील लोकांनी 1200 वर्षांपूर्वी आपलं पहिलं पाऊल ठेवलं.गुजरातच्या संजन समुद्रकिनाऱ्यावर पारशी समुदायातील लोक जहाजातून उतरले. याठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी स्थानिक राजे जाधव राणा हेसुद्धा उपस्थित होता. पारशी समाजाच्या नेत्याने राजांना भारतात प्रवेश करून वास्तव्य करण्याची परवानगी मागितली. त्यावेळी भाषेच्या अडथळ्यामुळे दोघांमधील संवाद योग्यरित्या होऊ शकला नाही. पण पारशी बांधवांचं म्हणणं त्यांच्या लक्षात आलं.या भूमीवर आधीपासूनच लोक वास्तव्याला आहेत. त्यामुळे तुम्हाला कसे सामावून घेणार, असा प्रश्न जाधव राणा यांना विचारायचा होता. त्यासाठी सांकेतिक पद्धतीने जाधव राणा यांनी एका पेल्यात काठोकाठ दूध भरून त्यांच्याकडे पाठवून दिलं. राणा यांचं म्हणणं लक्षात आल्यानंतर पारशी समाजातील नेत्याने या दूधात एक चिमूटभर साखर मिसळून दिली.

भारतीय इतिहासात टाटा कुटुंबाचं योगदान प्रचंड मोठं आहे. सध्या टाटा समूहाची गणना देशातील आघाडीच्या संस्थांमध्ये केली जाते. याच टाटा समूहाची पायाभरणी जमशेदजी टाटा यांनी केली होती. त्यांना भारतीय उद्योगजगताचे जनक म्हणून ओळखलं जातं.3 मार्च 1839 रोजी जन्मलेल्या जमशेदजी टाटा यांनी कमी वयातच आपल्या कल्पकतेची चुणूक सर्वांना दाखवली. त्यांनी त्यांचे औद्योगिक संबंध इंग्लंड, अमेरिका, चीन तसंच जपान या देशांमध्ये प्रस्थापित केले.टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स, टायटन इंडस्ट्रीज, टाटा-टी आणि व्होल्टास या कंपन्यांचं जाळं उभं केलं. तसंच भारताची पहिली विमान कंपनी टाटा एअरलाईन्सची स्थापनाही त्यांनीच केली होती. स्वातंत्र्यानंतर हीच कंपनी भारत सरकारने आपल्या अखत्यारित केली होती.टाटा समूहाच्या स्वरूपात मोठा वारसा लाभलेल्या रतन टाटा यांनी आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनंच केलं. रतन टाटा हे 1991 ते 2012 अशी सुमारे 19 वर्षे टाटा समूहाचे अध्यक्ष होते.

अणु ऊर्जा कार्यक्रमाचे जनक म्हणून होमी भाभा त्यांचे नाव घेतले जाते ,भाभा यांचा जन्म मुंबईतील एका सधन पारसी कुटुंबात झाला होता. त्यांनी 1945 मध्ये आण्विक कार्यक्रमाला चालना देण्यासाठी टाटा इंन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) संस्थेची स्थापना केली होती.1947 ला भारत सरकारने स्थापन केलेल्या आण्विक ऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्षही ते होते. ते सुमारे 15 वर्षं या आयोगाचे अध्यक्ष होते. यादरम्यान भाभा यांना पाचवेळा भौतिकशास्त्र विषयात नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.भारताच्या लष्करी इतिहासातील उल्लेखनीय अधिकाऱ्यांमध्ये सॅम माणेकशॉ यांचा समावेश होतो. भारत-पाकिस्तानदरम्यानच्या 1971 च्या युद्धादरम्यान माणेकशॉ हे भारताचे लष्करप्रमुख होते.आपल्या तब्बल 40 वर्षांच्या लांबलचक लष्करी कारकिर्दीतील 5 वर्षे ते भारताचे लष्करप्रमुख राहिले. इतकंच नव्हे तर सुरुवातीच्या काळात ब्रिटिश सैन्याकडून त्यांनी दुसऱ्या महायुद्धातही सहभाग नोंदवला होता.

अर्देशिर गोदरेज हे अत्यंत खटपट्या उद्योजक होते आपल्या किशोरवयापासूनच त्यांनी अनेक व्यवसाय सुरू केले. पण त्यांना म्हणावं तितकं यश मिळालं नाही. अखेर, 1897 साली कुलुपाच्या उद्योगात त्यांना यशाची चावी मिळाली.अर्देशिर गोदरेज हे मुळात व्यवसायाने वकील होते. पण त्यांनी उद्योजक होण्याचा निर्णय घेतला. अनेक व्यवसायांमध्ये अपयश येऊनही त्यांचा धीर खचला नाही. सध्या गोदरेजचे 1.1 अब्ज ग्राहक विविध क्षेत्रात आहेत. कंपनीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार त्यांचं उत्पन्न 4 अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षाही जास्त आहे.

दादाभाई नौरोजी ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून येणारे आशियाई नेते होते पण त्यांची ओळख एवढीच नाही. महात्मा गांधी यांच्याआधीचे ते देशातील प्रमुख नेते होते. जगभरात त्यांना जातीयवाद आणि साम्राज्यवादाविरोधात लढणारे नेते, म्हणूनही मान होता.आज जगभरात विविध संकटांनी डोकं वर काढलेलं असताना नौरोजींच्या कार्याचं स्मरण करणं आवश्यक आहे. आपल्या प्रगतिशील राजकीय इच्छाशक्तीमुळे दादाभाईंचं आयुष्य इतिहासातल्या काळ्या पर्वातही आशेचा किरण होता.दादाभाईंचा जन्म मुंबईतल्या एका गरीब कुटुंबात झाला. फ्री-पब्लिक स्कूलिंग योजनेअंतर्गत त्यांचं शिक्षण झालं. लोकांची सेवा करणं हेच सार्वजनिक शिक्षणाच्या ऋणातून मुक्त होण्याचा मार्ग आहे, असं त्यांना वाटायचं.लहान वयातच प्रागैतिक विचारांनी त्यांना आकर्षित केलं. 1840 मध्ये दादाभाईंनी मुलींसाठी शाळा उघडली. कर्मठ पारंपरिक विचारसरणीच्या पुरुषांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. स्वत:ची भूमिका योग्य पद्धतीने मांडण्याची त्यांच्याकडे हातोटी होती. काळाच्या पुढचा विचार करणारं द्रष्टेपण त्यांच्या अंगी होतं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...