भारतीय इतिहासात टाटा कुटुंबाचं योगदान प्रचंड मोठं आहे. सध्या टाटा समूहाची गणना देशातील आघाडीच्या संस्थांमध्ये केली जाते. याच टाटा समूहाची पायाभरणी जमशेदजी टाटा यांनी केली होती. त्यांना भारतीय उद्योगजगताचे जनक म्हणून ओळखलं जातं.3 मार्च 1839 रोजी जन्मलेल्या जमशेदजी टाटा यांनी कमी वयातच आपल्या कल्पकतेची चुणूक सर्वांना दाखवली. त्यांनी त्यांचे औद्योगिक संबंध इंग्लंड, अमेरिका, चीन तसंच जपान या देशांमध्ये प्रस्थापित केले.टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स, टायटन इंडस्ट्रीज, टाटा-टी आणि व्होल्टास या कंपन्यांचं जाळं उभं केलं. तसंच भारताची पहिली विमान कंपनी टाटा एअरलाईन्सची स्थापनाही त्यांनीच केली होती. स्वातंत्र्यानंतर हीच कंपनी भारत सरकारने आपल्या अखत्यारित केली होती.टाटा समूहाच्या स्वरूपात मोठा वारसा लाभलेल्या रतन टाटा यांनी आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनंच केलं. रतन टाटा हे 1991 ते 2012 अशी सुमारे 19 वर्षे टाटा समूहाचे अध्यक्ष होते.
अणु ऊर्जा कार्यक्रमाचे जनक म्हणून होमी भाभा त्यांचे नाव घेतले जाते ,भाभा यांचा जन्म मुंबईतील एका सधन पारसी कुटुंबात झाला होता. त्यांनी 1945 मध्ये आण्विक कार्यक्रमाला चालना देण्यासाठी टाटा इंन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) संस्थेची स्थापना केली होती.1947 ला भारत सरकारने स्थापन केलेल्या आण्विक ऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्षही ते होते. ते सुमारे 15 वर्षं या आयोगाचे अध्यक्ष होते. यादरम्यान भाभा यांना पाचवेळा भौतिकशास्त्र विषयात नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.भारताच्या लष्करी इतिहासातील उल्लेखनीय अधिकाऱ्यांमध्ये सॅम माणेकशॉ यांचा समावेश होतो. भारत-पाकिस्तानदरम्यानच्या 1971 च्या युद्धादरम्यान माणेकशॉ हे भारताचे लष्करप्रमुख होते.आपल्या तब्बल 40 वर्षांच्या लांबलचक लष्करी कारकिर्दीतील 5 वर्षे ते भारताचे लष्करप्रमुख राहिले. इतकंच नव्हे तर सुरुवातीच्या काळात ब्रिटिश सैन्याकडून त्यांनी दुसऱ्या महायुद्धातही सहभाग नोंदवला होता.
अर्देशिर गोदरेज हे अत्यंत खटपट्या उद्योजक होते आपल्या किशोरवयापासूनच त्यांनी अनेक व्यवसाय सुरू केले. पण त्यांना म्हणावं तितकं यश मिळालं नाही. अखेर, 1897 साली कुलुपाच्या उद्योगात त्यांना यशाची चावी मिळाली.अर्देशिर गोदरेज हे मुळात व्यवसायाने वकील होते. पण त्यांनी उद्योजक होण्याचा निर्णय घेतला. अनेक व्यवसायांमध्ये अपयश येऊनही त्यांचा धीर खचला नाही. सध्या गोदरेजचे 1.1 अब्ज ग्राहक विविध क्षेत्रात आहेत. कंपनीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार त्यांचं उत्पन्न 4 अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षाही जास्त आहे.
दादाभाई नौरोजी ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून येणारे आशियाई नेते होते पण त्यांची ओळख एवढीच नाही. महात्मा गांधी यांच्याआधीचे ते देशातील प्रमुख नेते होते. जगभरात त्यांना जातीयवाद आणि साम्राज्यवादाविरोधात लढणारे नेते, म्हणूनही मान होता.आज जगभरात विविध संकटांनी डोकं वर काढलेलं असताना नौरोजींच्या कार्याचं स्मरण करणं आवश्यक आहे. आपल्या प्रगतिशील राजकीय इच्छाशक्तीमुळे दादाभाईंचं आयुष्य इतिहासातल्या काळ्या पर्वातही आशेचा किरण होता.दादाभाईंचा जन्म मुंबईतल्या एका गरीब कुटुंबात झाला. फ्री-पब्लिक स्कूलिंग योजनेअंतर्गत त्यांचं शिक्षण झालं. लोकांची सेवा करणं हेच सार्वजनिक शिक्षणाच्या ऋणातून मुक्त होण्याचा मार्ग आहे, असं त्यांना वाटायचं.लहान वयातच प्रागैतिक विचारांनी त्यांना आकर्षित केलं. 1840 मध्ये दादाभाईंनी मुलींसाठी शाळा उघडली. कर्मठ पारंपरिक विचारसरणीच्या पुरुषांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. स्वत:ची भूमिका योग्य पद्धतीने मांडण्याची त्यांच्याकडे हातोटी होती. काळाच्या पुढचा विचार करणारं द्रष्टेपण त्यांच्या अंगी होतं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -