संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि देशभक्तीने प्रेरित होऊन साजरा करीत आहोत.
भारत देश जवळजवळ चौदाशे वर्ष वेगवेगळ्या प्रांतात आणि भागात पारतंत्र्य अनुभवत होता.जागोजाग स्वातंत्र्याच्या मशाली पेटल्या होत्या.परंतु भारताच्या स्वातंत्र्यासाठी खरी क्रांतीची अग्निज्वाला छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेतून आणि त्यासाठी त्यांनी सुलतानांच्या जुलमी राजवटीविरुद्ध दिलेल्या लढ्यातून खऱ्या अर्थाने निर्माण झाली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी छत्रपती शिवरायांचे योगदान अत्यंत मुलगामी व प्रेरणादायी होते.व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रज डच पोर्तुगीज इत्यादी युरोपीय लोकांनी भारत देश हळूहळू आपल्या जुलुमी राजवटीखाली आणला.तो कसा आणला हे भारतीयांना सुद्धा आश्चर्य वाटू लागले. वेगवेगळ्या लढा यांमधून इंग्रजांनी फोडा झोडा आणि राज्य मिळवा.राज्य करा. अशी भेदनीती अवलंबून संपूर्ण हिंदुस्तान किंवा भारतीय उपखंडच आपल्या टाचेखाली आणला.भारत देश यापूर्वीच परकीय जुलमी रानटी सुलतानांच्या गुलामगिरीत होता आणि आता इंग्रजांच्या अन्यायकारक जुलमी सत्तेखाली आला. अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर यश न मिळता संपुष्टात आले.भारतामध्ये इंग्रजांनी शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्यामुळे सुशिक्षित तरुणांमध्ये विचारवंत निर्माण झाले. वेगवेगळ्या विचारवंत आणि देशभक्तांनी वर्तमानपत्रे सुरू केली राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू केले आहे राजा राम मोहन रॉय यांनी बंगालमध्ये जागृती निर्माण केली महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू लोकहितवादी लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर बाबासाहेब आंबेडकर इत्यादी मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्र जागृत केला देशाच्या विविध भागांमध्ये विचारांच्या जागृतीने भारताच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलने उभी राहिली.महात्मा गांधींनी सत्य अहिंसा शांतता या चिरंतन मार्गांनी भारताचा स्वातंत्र्य लढा अखंडपणे सुरू ठेवला. स्वातंत्र्याची चळवळ सर्वसामान्य माणसा पर्यंत नेली याच वेळी हिंदुस्तानामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर,भगतसिंग, सुखदेव,राजगुरू,सचिंद्रनाथ संन्याल, खुदीराम बोस, चंद्रशेखर आजाद,जतीनदास,अनंत कान्हेरे अशा अनेक क्रांतिकारकांनी देशभर सशस्त्र क्रांतीचा लढा सुरू करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढा दिला त्या सर्वांची नावे आज इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहेत. परंतु सर्वच देशभक्त आणि क्रांतिकारक आणि त्यांचा जाज्वल्य इतिहास सर्वांसमोर आलाच असे नाही. कारण इतिहासाची काही सोनेरी पाने अज्ञात असतात हा जणू इतिहासाला शापच असतो. भारताचे स्वातंत्र्य अखंड हिंदुस्थानचे धर्मावर आधारित दोन तुकडे होऊन प्राप्त झाले. फाळणीची भळभळती रक्ताळलेली जखम घेऊन भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. आज या गोष्टीला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत.
देश स्वतंत्र झाला पण देशाच्या स्वातंत्र्याच्या निमित्ताने देशभक्त आणि क्रांतिकारकांनी वैभव शाली आणि बलवान भारत देशाचे स्वप्न पाहिले होते; एका समता, शांतता आणि बंधुता यांनी परिपूर्ण असणाऱ्या सार्वभौम भारत राष्ट्राचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न आज साकार झाले का? असा प्रश्न प्रत्येक भारतीयांनी स्वतःला विचारला पाहिजे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने साजरा तर केलाच पाहिजे. कारण यानिमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या अगणित ज्ञात आणि अज्ञात क्रांतिकारक आणि देशभक्त यांना खऱ्याअर्थाने आदरांजली वाहता वाहता त्यांच्यातील देशभक्तीची जाज्वल्य भावना आपल्यामध्ये निर्माण व्हावी ही अपेक्षा करता येईल. स्वातंत्र्याचा पावन मंगल दिन ज्यांनी आपल्याला दाखवला त्या महान देशभक्ताला स्मरावे; त्यांचा आदराने उल्लेख करावा; त्यांचे बलिदान व योगदान व्यर्थ गेले नाही हे आपल्या कृतीतून दाखवून द्यावे. यासाठी आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव प्रत्येक नागरिकांनी अगदी आनंदाने साजरा करावा...
"ए मेरे वतन के लोगो जरा आंखो मे भरलो पानी,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -