मुख्य सामग्रीवर वगळा

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

माणुस म्हणून माझी जबाबदारी काहीच नाही का ?

माणुस म्हणून माझी जबाबदारी काहीच नाही का ?
  आज विटभट्टीवरील शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी एका विटभट्टीवर गेलो . एक आठ वर्षाचा मुलगा ४०से. तापमानात माती गाळतांना दिसला. घामाघूळ झालेला आणि सकाळपासून पोटात अन्नाचा एकही घास न घेतलेला मुलगा काम करतांना त्याच्या वडीलाला विचारले की , तुम्ही एवढी सुंदर विट बनविता त्या विटेने सुंदर कलाकृती इमारत तयार होते मग तुला वाटत नाही का आपल्या या मुलाचं आयुष्य चांगले जावे .
  साहेब , मलाबी वाटते हे मुले शिकावे , शाळेत जावे पण मजबुरी आहे . आता खरीच वाढवतो त्याला .
विटभट्टी मालकांनी स्वतःहून सांगितले की , मी यांना स्वतः घेवून जातो , अरे ही मुले शिकली पाहीजे अशीच जर काम करत गेली तर दुखाची बाब आहे .
     आता बालरक्षकही तेथे पोहचले त्यांना दाखल केले आणि हा विषय संपला मग प्रश्न हा पडतो जेथे पालकाचीच इच्छा नाही तेथे काय ? माझ्या एका मित्रांनी मला मॅसेज केला जर पालकच मुले कामावर नेत असतील तर त्या पालकाना काय म्हणावे ? ऊसतोडीसाठी तांड्याचे तांडे बाहेर पडतात अडकतात पालकासंगे स्थलांतर होणारी निरागस बालके . रोजगार जगण्यासाठी महत्वाचा आहे परंतु शिक्षण कसे जगावे यासाठी महत्वाचे आहे हे कळून सुद्धा कोणीतरी येथे चुकते.
    स्थलांतर काय असते हे आम्ही लॉकडॉउनमध्ये अनुभवले आहे . जेव्हा घरातलं सारं काही संपते त्यावेळेस कुटूंब प्रमुखाला फक्त दिसते कुटूंबांचे पालनपोषण कारण वाचू तर शिकू आणि तेच झाले . जगण्याच्या नादात खरं आयुष्य जगणे सोडून दिले. फाटके कपडे आमचेही असायचे , पँन्टवर ठिगळ आमच्याही असायचे पण आम्ही कधी नाही झालो शाळाबाहय आणि नाही होवू दिले आमच्या वडीलांनी शाळाबाहय! ज्या पिढीने संघर्ष पाहिला त्या पिढीला शिक्षणाचे महत्व कळाले पण येथे संघर्ष आहे तोही अर्धवट शिक्षण सोडलेलं ?
     गावातील माणसे स्थलांतरीत होते मात्र गावातील मुले मात्र थांबतात श्रीरामतांडा , वरवंडी , चांदूरवाडी , आलाडोह , ठाकरवाडी सारखे शेकडो गावे पाहायला मिळतील जेथे मुलांचे स्थलांतर थांबले कारण तेथील पालकांना माहित झाले शिक्षण काय असते . आई गेल्यावर ओमही त्याच्या वडीलाकडे गेला . अप्पानी त्याला त्यांच्याकडे ठेवायचे आहे असे ओमच्या आईनी अप्पाना म्हटले कारण तीला जग सोडताना सुद्धा वाटत होते की माझा ओम शिकावं मोठं व्हावं . तो दिवस आठवतो मला आपरेशनसाठी जाताना ओमच्या आईने बोलवले मला आणि म्हणाली , गुरुजी याला शिकवा याच्या कडे लक्ष दया आता ओमला अभ्यास करायला कोणीच सांगणार नाही . दुसऱ्या दिवसी त्या ओमला सोडून गेल्याचे माहित झाले . आज ओम पाचवी वर्गात शिकतोय कारण येथे सारे काही जुळून आले . मग असे का होतय की , रस्त्याच्या बाजुला आईवडीलासोबत मुले असतात पण शाळेत पाठवण्यापेक्षा ते मुलांना भिक मागायला लावतात . आपण तेथे गेला आणि शाळेबददल म्हटले की म्हणतात , "हा चारशे कमावते आज काय करायचे शायेत धाडून " . मग अशा वेळेस अन्य विभागानी बालरक्षकाना मदत करणे गरजेचे आहे . कधी कधी मारण्याच्या धमक्याही येतात पण त्यांना समजत नाही की आम्ही त्यांच्या भल्यासाठीच आलोय त्यांच्या झोपडीजवळ उज्वल राज्याचे स्वप्न उराशी बाळगून !
    मग स्वतःलाच प्रश्न विचारतो आम्ही माणसेच ना ? का स्थानिक प्रतिनिधी यांच्या समस्या सभागृहात मांडत नाही ? का या विषयाला महत्व दिल्या जात नाही ? कारण हीच मुले उदयाची बिना ध्येयाची मतसंख्या आहे. लाखो रुपयाचे बॅनर झळकतांना दिसतील पण या मुलाच्या अंगावरील फाटलेले शर्टवरील ठिगळ बसवायला पैसे वेळ आणि माणुसपण कुणाचकडे नाही हे माणुसपणाला मारणारा आहे , होय माणुसपणाला मारणारा !
    क्रांतीवीर मधला एक संवाद खूप आवडला , आपण चुप आहोत हेच लक्षण आहे गुलामगीरी स्विकारण्याचे ! होय आपणच सारे काही उघड्या डोळयानी पाहतो क्षणभर चुक ऽ ऽ चुक म्हणतो आणि जशास तसे पण बाबानो भविष्य आपल्या या चुप्पीची दखल घेणारच आहे की , आपण या शाळाबाहय मुलांसाठी आपण काय केलात ?
'मुलांना दाखल करा' , शाळेत दररोज पाठवा ची चित्रफित सगळेजन उत्साहाने एकमेकांना व ग्रृपवर पाठवत आहे पण आपण कधी यासाठी प्रयत्न केलात का ? आई कामाला जाते म्हणून बाळाला सांभाळणाऱ्या त्या शाळाबाह्य झालेल्या छकुलीला शाळेत आणण्यासाठी वा पाठवण्यासाठी प्रयत्न केलात कधी ? नाही ना मग एक सोनेरी क्षण आपल्या या पवित्र कामाची वाट पाहतोय. पालकांनी खरंच जागृक होण्याची गरज आहे . आपले आयुष्य तर कामात संघर्षात गेलेत परंतु आपल्या इवलश्या मुलांना शाळेत पाठवा . विटभट्टीच्या , उसशेताच्या , मोठ्याबांधकामाजवळ , आपण पालमांडून राहत असलेल्या वस्तीत आहे की हो शाळा , पाठवून सहकार्य करा बालरक्षक चळवळीला आणि हातभार लावा आपले राज्य शाळाबाहय मुल मुक्त करायला .
                  विनोद राठोड
         बालरक्षक टिम महाराष्ट्र
<

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...