संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...
आज विटभट्टीवरील शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी एका विटभट्टीवर गेलो . एक आठ वर्षाचा मुलगा ४०से. तापमानात माती गाळतांना दिसला. घामाघूळ झालेला आणि सकाळपासून पोटात अन्नाचा एकही घास न घेतलेला मुलगा काम करतांना त्याच्या वडीलाला विचारले की , तुम्ही एवढी सुंदर विट बनविता त्या विटेने सुंदर कलाकृती इमारत तयार होते मग तुला वाटत नाही का आपल्या या मुलाचं आयुष्य चांगले जावे .
साहेब , मलाबी वाटते हे मुले शिकावे , शाळेत जावे पण मजबुरी आहे . आता खरीच वाढवतो त्याला .
विटभट्टी मालकांनी स्वतःहून सांगितले की , मी यांना स्वतः घेवून जातो , अरे ही मुले शिकली पाहीजे अशीच जर काम करत गेली तर दुखाची बाब आहे .
आता बालरक्षकही तेथे पोहचले त्यांना दाखल केले आणि हा विषय संपला मग प्रश्न हा पडतो जेथे पालकाचीच इच्छा नाही तेथे काय ? माझ्या एका मित्रांनी मला मॅसेज केला जर पालकच मुले कामावर नेत असतील तर त्या पालकाना काय म्हणावे ? ऊसतोडीसाठी तांड्याचे तांडे बाहेर पडतात अडकतात पालकासंगे स्थलांतर होणारी निरागस बालके . रोजगार जगण्यासाठी महत्वाचा आहे परंतु शिक्षण कसे जगावे यासाठी महत्वाचे आहे हे कळून सुद्धा कोणीतरी येथे चुकते.
स्थलांतर काय असते हे आम्ही लॉकडॉउनमध्ये अनुभवले आहे . जेव्हा घरातलं सारं काही संपते त्यावेळेस कुटूंब प्रमुखाला फक्त दिसते कुटूंबांचे पालनपोषण कारण वाचू तर शिकू आणि तेच झाले . जगण्याच्या नादात खरं आयुष्य जगणे सोडून दिले. फाटके कपडे आमचेही असायचे , पँन्टवर ठिगळ आमच्याही असायचे पण आम्ही कधी नाही झालो शाळाबाहय आणि नाही होवू दिले आमच्या वडीलांनी शाळाबाहय! ज्या पिढीने संघर्ष पाहिला त्या पिढीला शिक्षणाचे महत्व कळाले पण येथे संघर्ष आहे तोही अर्धवट शिक्षण सोडलेलं ?
गावातील माणसे स्थलांतरीत होते मात्र गावातील मुले मात्र थांबतात श्रीरामतांडा , वरवंडी , चांदूरवाडी , आलाडोह , ठाकरवाडी सारखे शेकडो गावे पाहायला मिळतील जेथे मुलांचे स्थलांतर थांबले कारण तेथील पालकांना माहित झाले शिक्षण काय असते . आई गेल्यावर ओमही त्याच्या वडीलाकडे गेला . अप्पानी त्याला त्यांच्याकडे ठेवायचे आहे असे ओमच्या आईनी अप्पाना म्हटले कारण तीला जग सोडताना सुद्धा वाटत होते की माझा ओम शिकावं मोठं व्हावं . तो दिवस आठवतो मला आपरेशनसाठी जाताना ओमच्या आईने बोलवले मला आणि म्हणाली , गुरुजी याला शिकवा याच्या कडे लक्ष दया आता ओमला अभ्यास करायला कोणीच सांगणार नाही . दुसऱ्या दिवसी त्या ओमला सोडून गेल्याचे माहित झाले . आज ओम पाचवी वर्गात शिकतोय कारण येथे सारे काही जुळून आले . मग असे का होतय की , रस्त्याच्या बाजुला आईवडीलासोबत मुले असतात पण शाळेत पाठवण्यापेक्षा ते मुलांना भिक मागायला लावतात . आपण तेथे गेला आणि शाळेबददल म्हटले की म्हणतात , "हा चारशे कमावते आज काय करायचे शायेत धाडून " . मग अशा वेळेस अन्य विभागानी बालरक्षकाना मदत करणे गरजेचे आहे . कधी कधी मारण्याच्या धमक्याही येतात पण त्यांना समजत नाही की आम्ही त्यांच्या भल्यासाठीच आलोय त्यांच्या झोपडीजवळ उज्वल राज्याचे स्वप्न उराशी बाळगून !
मग स्वतःलाच प्रश्न विचारतो आम्ही माणसेच ना ? का स्थानिक प्रतिनिधी यांच्या समस्या सभागृहात मांडत नाही ? का या विषयाला महत्व दिल्या जात नाही ? कारण हीच मुले उदयाची बिना ध्येयाची मतसंख्या आहे. लाखो रुपयाचे बॅनर झळकतांना दिसतील पण या मुलाच्या अंगावरील फाटलेले शर्टवरील ठिगळ बसवायला पैसे वेळ आणि माणुसपण कुणाचकडे नाही हे माणुसपणाला मारणारा आहे , होय माणुसपणाला मारणारा !
क्रांतीवीर मधला एक संवाद खूप आवडला , आपण चुप आहोत हेच लक्षण आहे गुलामगीरी स्विकारण्याचे ! होय आपणच सारे काही उघड्या डोळयानी पाहतो क्षणभर चुक ऽ ऽ चुक म्हणतो आणि जशास तसे पण बाबानो भविष्य आपल्या या चुप्पीची दखल घेणारच आहे की , आपण या शाळाबाहय मुलांसाठी आपण काय केलात ?
'मुलांना दाखल करा' , शाळेत दररोज पाठवा ची चित्रफित सगळेजन उत्साहाने एकमेकांना व ग्रृपवर पाठवत आहे पण आपण कधी यासाठी प्रयत्न केलात का ? आई कामाला जाते म्हणून बाळाला सांभाळणाऱ्या त्या शाळाबाह्य झालेल्या छकुलीला शाळेत आणण्यासाठी वा पाठवण्यासाठी प्रयत्न केलात कधी ? नाही ना मग एक सोनेरी क्षण आपल्या या पवित्र कामाची वाट पाहतोय. पालकांनी खरंच जागृक होण्याची गरज आहे . आपले आयुष्य तर कामात संघर्षात गेलेत परंतु आपल्या इवलश्या मुलांना शाळेत पाठवा . विटभट्टीच्या , उसशेताच्या , मोठ्याबांधकामाजवळ , आपण पालमांडून राहत असलेल्या वस्तीत आहे की हो शाळा , पाठवून सहकार्य करा बालरक्षक चळवळीला आणि हातभार लावा आपले राज्य शाळाबाहय मुल मुक्त करायला .
विनोद राठोड
<
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -