पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र आढळणार नाही. परंतु, एकंदरीत पाण्याचा अविचारी, आयोग्य आणि अतिवापर होत असल्याचे काही दशकांपूर्वी जाणवले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पुरेसे पाणी मिळवण्यासाठी तिसरे महायुध्द होण्याची शक्यता वर्तवली जाते इतके त्याचे महत्त्व आहे !
जागतिक जल दिन साजरा करण्याचा आंतरराष्ट्रीय पुढाकार ब्राझीलमध्ये 22 मार्च 1992 रोजी रिओ दि जानेरो येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकासाच्या परिषदेत घेण्यात आला.
तहान लागल्यावर विहीर खणू लागल्याने पश्न सुटत नाही. त्यासाठी या बाबींकडे सर्वांचेच सतत लक्ष असले पाहिजे-
- पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करणे.
- पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे.
- जगात गोड्या पाण्याच प्रमाण मुळातच फार कमी आहे.
- पिण्याचे पाणी सर्वांनाच गरजेप्रमाणे मिळेल हे पाहणे.
- यावर्षी जागतिक जल दिनाची थीम ही भूजल: अदृश्य दृश्यमान बनवणे' अशी आहे. ही थीम IGRAC म्हणजेच आंतरराष्ट्रीय भूजल संसाधन मूल्यांकन केंद्राद्वारे प्रस्तावित केली आहे. 21 मार्च 2022 रोजी डकार, सेनेगल येथे 9व्या जागतिक जल मंचाच्या उद्घाटन सत्रात ते सादर केले जाईल.
पाण्यासंदर्भातील काही महत्वाचे तथ्य -
- मुंबईत दररोज गाड्या धुण्यासाठी 50 लाख लिटर पाणी खर्च होते.
- दिल्ली, मुंबई आणि चेन्नईमध्ये पाईप लाईन खराब झाल्यामुळे 17 ते 40 टक्के पाणी वाया जाते.
- अनेक ठिकाणी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी अंदाजे 6.4 किमी प्रवास करावा लागतो.
- पृथ्वीवर 70 टक्क्यांहून अधिक पाणी आहे. पण गोड्या पाण्याचे प्रमाण फारच कमी आहे. 97.3 टक्के पाणी हे क्षारयुक्त आहे, जे पिण्यास योग्य नाही.
- ब्रश करताना नळा खुला ठेवला तर पाच मिनिटांत सुमारे 20 ते 25 लिटर पाणी वाया जाते.
जगातील 10 पैकी 2 लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही.
- एखाद्या व्यक्तीस दररोज पिण्यासाठी 3 लिटर पाण्याची आणि जनावरांना 50 लिटर पाण्याची आवश्यकता असते.
- पृथ्वीवर येणाऱ्या सर्व वनस्पतींचे मानवांना पाणी मिळते.
एक किलो गहू उगवण्यासाठी एक हजार लिटर आणि एक किलो तांदूळ उगवण्यासाठी चार हजार लिटर पाण्याची गरज असते. अशाप्रकारे आपल्या जीवनात पाण्याचे अत्यंत महत्त्व आहे. पाण्यासंदर्भात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याची कल्पना कदाचित आपल्याला नसेल. मात्र, वेळीच पाण्याचं महत्त्व जाणल्यास भविष्यात पाण्याची समस्या उद्भवणार नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -