संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...
श्रीनाथ वानखडे/दि.22 मे 21
भारतीय शासनव्यवस्थेत वरिष्ठांनी आदेश द्यायचे व कनिष्ठांनी ते पाळायचे.याच व्यवस्थेतील जिल्हा परिषद एक महत्वाचा घटक.कोविडच्या आपत्तीकाळात समाजाला आपलंही देणं लागतं हा विचार मांडल्या गेला.या विचारातूनच जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांसह सर्व कर्मचारी एकवटले व वर्गणी गोळा केली.नेहमी आपल्या आदेशाचे पालन करणारे कर्मचारी जेव्हा संघटना मतभेद बाजूला सारून रुग्णसेवाचा यज्ञ तेवत ठेवत आहे हे अनुभवले तेंव्हा या यज्ञात पक्षभेद बाजूला ठेवत जिल्हा परिषद अध्यक्ष सह ईतर सदस्यांनी सुद्धा अर्थसंमिधा अर्पण केली.
मे महिन्याच्या सुरुवातीला कोविडची रुग्णसंख्या अचानक वाढीला लागते.अमरावती जिल्हातून कोविड आजाराचे नवीन रूप धारण केल्याच्या वावड्या सर्वत्र उठल्या.याच कालावधीत जिल्हा परिषद स्थापनेपासून पहिल्यांदा टाळेबंदी केल्या गेली.जे होत आहे ते भीषण होत आहे.शिक्षक हा समाजाचा दिशादर्शक आहे हे अनेकांनी ऐकले होते.यामधून प्राथमिक शिक्षकांच्या एका माध्यम गटावर एक विचार पुढे आला.आपण किती दिवस बंदिस्त रहायचे.आपलंही या समाजाला देणं लागतं.आपणच जर समाजासाठी पुढाकार घेतला तर ?येथूनच सुरु होतं नवीन मिशन ‘चला जीवन वाचवूया’.
अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत सुमारे सहा हजार शिक्षक कार्यरत आहेत तेवढेच कर्मचारी ईतर विभागात कार्यरत आहे.शिक्षकांचा हा संदेश समाजमाध्यमावर वायरल होतो.कर्मचा-यां सोबतीला अधिकारी पुढे येतात.प्रत्येकाच्या वेतनातून किमान एक हजार जमा करायचा हा निर्णय सर्वसंमत होतो नि यातूनच तब्बल एक कोटीचा अर्थसहाय्य तयार होते.जमा केलेल्या निधीतून कोविड रुग्णांसाठी कोविड सेंटर व मार्गदर्शन केंद्र सुरु करायचा हे ठरते आणि यातूनच जिल्हा परिषद विश्रामगृह,मालटेकडी येथे सुसज्य कोविड सेंटर उभारल्या जाते.
*शांतीदुताला अनोखी श्रद्धांजली*
जिल्हा परिषद कर्मचारीनी मांडलेल्या विचार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पुढ्यात ठेवण्यात आला.याच काळात जिल्ह्यात कडक लॉकडॉउन लागल्याने हि मोहीम थंडावली.मिशन मोडवर काम करणाऱ्या शिपायांच्या मनात थोडी कामाबद्दल कालवाकालव निर्माण झाली.त्यांनी लगेच जिल्हा परिषद अध्यक्ष मा.बबलुभाऊ उर्फ अनिरुद्धजी देशमुख यांच्या समोर या मोहिमेची कल्पना दिली.’राजा बोले नि दल हाले’ याची प्रचीती आली.अवघ्या पाच दिवसात जिल्हा परिषद विश्रामगृहाचा चेहरामोहरा बदलविला.भारताचे माजी पंतप्रधान मा.राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनाचे औचीत्यावर जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांचे हस्ते या कोविड सेंटरचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अविशांत पांड्या यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
*लोकप्रतिनिधींचे अर्थसहाय्य*
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या समाजसेवेपासून प्रेरणा घेवून जिल्हा परिषद पदाधिकारी यांनी सुद्धा यामध्ये पुढाकार घेतला.कोविड सेंटर च्या उद्घाटनानंतर जिल्हा परिषद ची स्थायी समितीची सभा होती.या सभेमध्ये सर्व लोकप्रतिनिधी व सर्व सदस्यांनी आपले एक महिन्याचे मानधन कोविड केअर सेंटर देण्याचा निर्धार केला.शिवाय कोरोनाची तिसरी लाट हि मुलांसाठी घातक असल्याने व शिक्षक लहान मुलांच्या संपर्कात जास्त येत असल्याने शिक्षकांना लसीकरणासाठी तालुकास्तरावर कॅम्पचे आयोजन करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
*सुसज्य कोविड सेंटर*
विश्रामगृहातील १० खोल्यांमध्ये रुग्णांसाठी बेड उपलब्ध केले असून प्रत्येक खोलीत केवळ दोन रुग्णाचे सुसज्य बेड ऑक्सिजन व वातानुकूलित व्यवस्थेसह उपलब्ध करून दिले आहे.रुग्णाच्या सेवेकरिता चार तज्ञ डॉक्टरांची चमू चोवीस तास कार्यरत आहे.सर्व औषधी मोफत असून रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध आहे.रुग्णाला ला दररोज डायट प्लान नुसार नाश्ता व जेवण उपलब्ध करून दिल्या जात आहे.
*कर्मचाऱ्यांची स्वयंसेवा*
या सेंटरवर उत्तम सेवा उपलब्ध व्हावी याकरिता तज्ञ डॉक्टरांसमवेत, अधिपरिचारिका, आरोग्य सेवक व सुरक्षा रक्षक परिश्रम घेत आहे.त्यांच्या सहकार्यासाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यानी स्वयंसेवा देत आहे.दर दिवशी २४ तासापैकी दर ८ तासांनी कर्मचारी स्वयंपुढाकाराने आपल्या सेवा बजावत आहे.कोविड सेंटर च्या शुभारंभ दिनाला काही रुग्ण येथे भरती झाले असून त्यांनी सुद्धा कर्मचार्यांच्या या सेवा वृत्तीचे स्वागत केले आहे.शिक्षक व जिल्हा परिषद कर्मचारी या सेवावृत्तीचे समाजात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
#बालस्नेही
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -