मेजर ध्यानचंद:-हाॅकीचे जादूगार
मेजर ध्यानचंद सिंग हे भारतीय हॉकीचे अलौकिक खेळाडू होते. त्यांना जागतिक खेळ विश्वातील सर्वोत्कृष्ट हाॅकीचे खेळाडू म्हणून ओळखले जाते. त्यांना हाॅकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे. त्यांनी भारताला 1928, 1932 व 1936 मध्ये आॅलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांच्या काळात भारतीय संघ सर्वात शक्तिशाली संघ म्हणून ओळखला जायचा.ध्यानचंद यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १९४८ साली खेळला. त्यांनी दिलेल्या योगदानाचा प्रभाव इतका जबरदस्त होता कि भारताने १९२८ ते १९६४ दरम्यान झालेल्या ८ ऑलिम्पिक स्पर्धेपैकी ७ स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. जर्मनी संघाला १९३६ मध्ये ८-१ ने नामावल्यानंतर, त्यांच्या खेळाने प्रभावित होऊन हिटलरने त्यांना आपल्या सैन्यात वरिष्ठ पदाची ऑफर दिली होती जी त्यांनी नाकारली. त्यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत ४०० पेक्षा अधिक गोल केले जे हॉकीच्या इतिहासात एका खेळाडूने केलेले सर्वाधिक गोल्स आहेत. भारत सरकारने १९५६ साली त्यांचा पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या नावाने दिला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून दिला जाईल अशी घोषणा केली,
2021 भारताच्या पुरुष हॉकी संघाने जर्मनीचा पराभव करून 41 वर्षानंतर पदक जिंकले. भारताचे हे ऑलिम्पिकमधील हॉकीचे 12वे पदक ठरले. याआधी भारतीय पुरुष हॉकी संघाने 1928 ते 1980च्या ऑलिम्पिकपर्यंत आठ सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदके जिंकली आहेत.भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 1 सुवर्ण, दोन रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह एकूण 7 पदके जिंकली. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच भारतीय खेळाडू अर्धा डझन पदके घेऊन मायदेशी आले आहेत.शेवटच्या दिवशी भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकून भारत देशाचे नाव सुवर्ण अक्षरात नोंदले गेले...
सर्व खेळाडूंना हार्दिक हार्दिक मंगल कामना…

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -