मुख्य सामग्रीवर वगळा

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा....

 विजयी विश्व तिरंगा प्याराझंडा ऊंचा रहे हमारा....


      भारताचा राष्ट्रीय ध्वज हा केशरी ,पांढरा आणि हिरवा असा आयताकृती तिरंगा आहे.त्याच बरोबर अशोकचक्रत्याच्या मध्यभागी आहेभारतीय राष्ट्रध्वज २२ जुलै १९४७ रोजीभारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेला२४ मार्च रोजी इंंग्रजांनी भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केलास्वतंंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेलीघटना समितीने २२ जुलैला या ठरावाला मंंजुरी दिलीआणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या अधिपत्याखालील अधिकृत ध्वज झाले.ध्वज खादीपासून बनवावा आणि खास प्रकारचे हात सूत कापडाचा किंवा रेशीमचा असावा.यासाठी खादी वापरली जाते.ध्वज निर्मितीची प्रक्रिया  वैशिष्ट्ये भारतीय मानक कार्यालयद्वारे ठरवली जातेहा ध्वज तयार करण्याचा अधिकार खादी विकास  ग्रामोद्योग आयोगाकडे आहे.तो अधिकार विभागीय गटांना वाटून दिला जातो.२००९ पर्यंत कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ ध्वजाची एकमेव निर्माता होती.ध्वजचा वापर भारतीय ध्वज संहिता आणि राष्ट्रीय चिन्हाशी संबंधित इतर कायद्यांद्वारे केला जातो.मूळ संहिता स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनासारखे राष्ट्रीय दिवस वगळता खासगी नागरिकांकडून ध्वजाचा वापर करण्यास मनाई होती.२००२ मध्येनवीन जिंदाल यांनी खासगी नागरिकाकडून केलेल्या अपिलाच्या सुनावणीवरभारतीय सर्वोच्च न्यायालयाने खासगी नागरिकांकडून ध्वज वापरास परवानगी देण्यासाठी कायद्यांचा संग्रहमध्ये बदल करण्याचे निर्देश भारत सरकारला दिले.त्यानंतरभारतीय केंद्रीय मंत्रिमंडळाने मर्यादित वापरास परवानगी देण्यासाठी कायद्यांचा संग्रहमध्ये सुधारणा केली.भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहेकेशरीपांढराहिरवाआणि निळा.. २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वजभारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आलात्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलाएकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहेवरती गर्द केशरीमध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवाअशा क्रमाने हे तीन रंग आहेतमधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र असून ते सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोकचक्र आहेचक्राला २४ आरे आहेतमच्छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहेभारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे  लांबीचे प्रमाण 2:3 असे आहेतसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहेध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे.वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्यागधैर्य याचा बो होतोमधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांतीसत्य पावित्र्याचा बोध होतो.खालील भागात गडद हिरवा रंग आहेहा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितोनिष्ठा  समृद्धीचा बोध होतो.निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता  कालचक्राचे  त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतोजीवन गतिमान असावे  भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे दर्शवितेमूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्या आहेत्याला ‘अशोकचक्रया नावाने ओळखले जातेत्यात भारतीय कलातत्त्वज्ञानइतिहास  संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो..भारत देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण  अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातोराष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाहीयासाठी काही नियम करण्यात आले आहेतकेंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहेध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावीअशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रमसांस्कृतिक  मैदानी खेळाच्या वेळी ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले जातेराष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला जातो कीतेथून तो ध्वज सगळ्यांना दिसतो.. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रथा आहेरविवार  अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला जातोचप्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक असते.संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे  आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला जातो.. ध्वज फडकवताना  उतरवताना बिगूल वाजविण्याची प्रथा आहेप्लॅस्टिकचा ध्वज वापरण्यास मनाई असते.

राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे कीमान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे  ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजेअथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे  भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजेफाटलेलामळलेला ध्वज फडकविला जाता कामा नयेकोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नयेइतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.. तसेच राष्ट्रध्वजाला माती  पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नयेध्वज फडकविताना तो फाटणार नाहीअशा पद्धतीने बांधला पाहिजे.ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहेध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेतशासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतीलजेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल  तो सावधान स्थितीत उभा राहिलसरकारी अधिकार्यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजेध्वजाची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहेअर्जुनाच्या कपिध्वजाचा उल्लेख महाभारतात सापडतोछत्रपती शिवाजी महाराज यांचा जरीची झालर लाभलेला भगवा ध्वज प्रसिद्ध आहे.१८३१साली राजा राममोहन राॅय बोटीने इंग्लंडला जात असताना त्यांनी एका फ्रेंच जहाजावर फ्रान्सचा तिरंगी झेंडा पाहिला  स्वातंत्र्य समता बंधुता यांचे प्रतीक असलेला ध्वज आपल्या देशालाही लाभावा असे त्यांना वाटलेभारतीय राष्ट्रध्वजाने राष्ट्रगीतांप्रमाणेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आणि स्वातंत्र्य काळातही भारतीयांना प्रेरणा दिली आहेविवीध साहित्यात आणि राष्ट्रभक्ती गीतांमध्येही भारतीय राष्ट्रध्वजाचा गौरवला गेल्याचे दिसून येतेहिंदी कवी श्यामलाल गुप्त 'पार्षदह्यांनी लिहिलेल्या "विजयी विश्व तिरंगा प्याराझंडा ऊंचा रहे हमारा।ह्या गीतास १९३८ 'झेंडा गीतम्हणून स्वीकारले भारतातील पंजाब राज्यात अटारी येथे भारतीय सीमेच्या आत ३६० फूट (१०५ मीटरउंचींचा भारतीय राष्ट्रध्वज आतापर्यंतचा सर्वाधिक उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज आहेहा राष्ट्रध्वज १२० फूट लांब आणि ८० फूट रुंद एवढ्या आकाराचा आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...