मुख्य सामग्रीवर वगळा

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

 

भारतातील असे कोणते लोहमार्ग स्टेशन आहे, जेथे एकाच बाकावर बसलेली दोन माणसे दोन वेगवेगळ्या राज्यात बसलेली असतात?








          देशातील सर्वात अद्वितीय लोहमार्ग स्थानक जेथे एकच बाक दोन राज्यात विभागले गेले आहे. ही कथा आहे एका अशा लोहमार्ग स्थानकाची, ज्याचा एक भाग महाराष्ट्रात आहे व दुसरा गुजरातमध्ये. दोन राज्यांच्या वेगवेगळ्या हद्दीत वसलेल्या या स्थानकामध्ये असं काय विशेष असेल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही.                 

          वास्तविक हे असं एकमेव रेल्वे स्थानक आहे, जे गुजरात-महाराष्ट्र सीमेला स्पर्श करते. स्थानकात एक बाक आहे, ज्याचा अर्धा भाग महाराष्ट्रात आणि अर्धा गुजरातमध्ये आहेत.

या बाकावर बसलेल्यांनी आपण कोणत्या राज्यात बसलो आहोत, हे लक्षात ठेवले पाहिजे. 

         येथे तिकीट खिडकी महाराष्ट्रात तर गुजरातमध्ये स्थानकप्रमुख बसतात. एवढेच नाही, तर गाड्यांच्या घोषणा चार वेगवेगळ्या भाषांमध्ये होतात. या स्थानकाचे नाव आहे *‘नवापूर’.* 

         नवापूर लोहमार्ग पोलीस ठाणे, उपहारगृह, तिकीट खिडकी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये येते आणि स्थानकप्रमुख, प्रतीक्षा कक्ष, पाण्याची टाकी आणि शौचालय हे गुजरातमधील तापी जिल्ह्यातील उच्छलमध्ये येते. या स्थानकात येणाऱ्या गाड्यांचा एक भाग महाराष्ट्रात आणि दुसरा भाग गुजरातमध्ये असतो. 

          या लोहमार्ग स्थानकाची सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे दोन्ही राज्यांच्या हद्दीत लागू असलेले भिन्न कायदे होय. गुजरातमध्ये दारूविक्रीवर बंदी आहे, तर महाराष्ट्रात पानमसाला आणि गुटख्यावर. स्थानकाच्या गुजरात भागामध्ये गुटख्याची विक्री करणे हा गुन्हा नाही, परंतु कोणी चुकून ते महाराष्ट्रातील सीमेवर विकून गेले, तर तो गुन्हेगार ठरते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही दारू आणि बिअरची विक्री होऊ शकते, परंतु गुजरातमध्ये यावर बंदी आहे. गुजरातमधील कोणी असे करताना आढळल्यास तो गुन्हेगार ठरतो. बर्‍याच वेळा असे घडते की, दुसर्‍या राज्याच्या सीमेवर गुन्हा केल्यावर गुन्हेगार दुसर्‍या राज्यात प्रवेश करतो. अशा परिस्थितीत पोलिस आणि गुन्हेगार यांच्यात डोळेझाक होताना दिसते ....

         नवापूर लोहमार्ग स्थानक पश्चिम विभागाच्या सुरत-भुसावळ लोहमार्गावर आहे. सुरत-भुसावळ हा दुहेरी विद्युत लोहमार्ग आहे. याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्र व गुजरातमधील व्यापारी घेतात. सुरतमध्ये कापड व हिरे उद्योग,  सूतगिरण्या आहेत. हे स्थानक कापड व्यापाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याशिवाय तेथून जाणाऱ्या गाड्यांमध्ये उकई मासे पश्चिम बंगालला जातात. नवापूर लोहमार्ग स्थानकात २४ तासांत एकूण २०० गाड्या जातात. स्वच्छतेसाठी या लोहमार्ग स्थानकास अनेक वेळा बक्षीस देण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...