मुख्य सामग्रीवर वगळा

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

#जेष्ठ पौर्णिमा

जेष्ठ पौर्णिमा बुद्धगयेपासून सुमारे दोन मैलावर निरंजना नदी वाहते, एलतिरावर  गया तर पैलतीरावर पूर्वेला उरुवेला नामक एक अतिशय सुंदर गाव आहे, त्याच्या छायेतच सेनानी नावाचे छोटेसे खेडे वसलेल्या आहे, या ठिकाणी सेनानी नावाचा एक प्रतिष्ठित आणि सन्मानित व्यक्ति राहत असे तिच्या नावावरूनच या गावास सेनानी नाव पडले ,त्याच्याकडे अनेक गायी होत्या म्हणून त्याला ग्वालराज म्हणत.. सेनानीच्या विवाहाच्या काही वर्षानंतर त्याच्या कुटुंबात कन्या जन्मास आलि तिचे नाव "सुजाता" होते.                         त्या गावी   असलेल्या वटवृक्षाची अशी ख्याती होती की, जो कोणी त्या वृक्षाची मनोभावे पूजा करेल त्यास मनोवांचीत फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही ,एके दिवशी श्रद्धावान सुजातानेही वटवृक्षरुपि या              वृक्षराजाची पूजा करून इच्छा प्रगट केली की, जर मला सुंदर -सुशील व कर्तृत्ववान वर मिळेल आणि त्याच्यासोबत पहिल्या संतानाच्या रूपाने पुत्रप्राप्ती होईल तर मी निर्जल दुधाची "मधुपायस" चढून पूजा करेल. हीच तिची इच्छा पूर्ती झाली म्हणून एका चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या पात्रात खीर घेऊन ती वटवृक्षाखाली गेली. पाहते तर काय तेथे बोधीसत्व ध्यानस्थ बसलेले ,अनेक दिवसांपासून अन्नग्रहण न केल्यामुळे अस्थिपंजर झालेले ,ही वनदेवताच माझे नैवद्द स्वीकारण्यास अवतरली आहे असे सुजाताच वाटले. तिने वनदेवतेस विनवले की, कृपया करून माझे नैवद्द स्वीकारावे ,तपश्चर्येस ध्यानस्थ बसलेले बोधिसत्व म्हणाले भद्रे! मी वनदेवता नसून एक सामान्य मानव आहे. सत्याचा साक्षात्कार करून दुःख मुक्तीचा मार्ग शोधत आहे; "सत्याचा मार्ग प्राप्त झाल्यानंतर मला येऊन भेटावे".असे अभिवचन बोधिसत्त्वा कडून घेऊन खीरीचे स्वर्ण पात्र मनोभावे त्यांना अर्पण करून सुजाताने सिद्धार्थ वंदन केले व परत गेली.. या "खीर" दाणा नंतर गौतम सिद्धार्थाने निरंजना नदीवर जाऊन स्नान केले अनेक दिवसाच्या उपासानंतर त्या खिरीचे एकूण  ऐकोपन्नास ग्रासात सेवन केले ..उपासतापास व्रतवैकल्ये व क्केशाने शरीर क्षय करून सत्य सापडत नाही अशी, त्यांची खात्री झाली. आणि नव्याने  त्यांनी दुःख निवारण व साक्षात्काराच्या शोधार्थ प्रयास आरंभ केला ..   पुढे  जेव्हा बोधिसत्वास गया येथे बुद्धत्व प्राप्त झाले तेव्हा त्यांना सुजाता दिलेल्या  वचनाची आठवण झाली व त्या वचन पुर्तीसाठी त्यांनी परत सुजाताचा शोध घेऊन तिला तिच्या पतीस व पुत्र यश यास धम्मदीक्षा दिली.    सुजाताचा विवाह वाराणसीत झाला होता वाराणसीचे हे एकमेव कुटुंब होते की, ज्यांनी सर्वप्रथम सहपरिवार दीक्षा ग्रहण केली. सुजाता ही एक अशी महिला होऊन गेली की, तिच्या संबंधात सम्यक संबुद्धानी स्वतः म्हटले की, माझ्या उपासिका मध्ये प्रथम येणाऱ्यांमध्ये सेनानी पुत्री सुजाता सर्वश्रेष्ठ आहे ,सहपरिवार सुजाताला दीक्षित केलेला तो दिवस म्हणजेच "ज्येष्ठ पौर्णिमेचा"होता.
 धम्माचा "दायक" बनण्याच्या इच्छेपोटी महाराज अशोकाने आपला पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना बोलावून विचारले काय आपण दोघेही "प्रवज्जा" ग्रहण कराल?मुलांनी उत्तर दिले ,देव!जर आपली इच्छा असेल तर आम्ही आजच प्रवजीत होऊ "प्रवज्जा" ग्रहण करण्याने आमचे व आपले कल्याण होईल असे आम्हाला वाटते, या कुशाग्रवादी व बलवान मनाने स्वामी असलेल्या बालकांचा दीक्षाविधी अतिशय समारंभपूर्वक व धुमधडाक्यात पार पडला .सम्राट कन्या संगमित्रा व पुत्र  महेंद्र धन्य होत, त्यांनी केवळ आपल्या पित्याच्या इच्छे खातिर गृहस्थ जीवनाचा त्याग करून "प्रवज्जा" घेतली जेव्हा महामिती महेंद्रस प्रवर्तित होऊन बारा वर्षे पूर्ण कालावधी झाला होता 'तेव्हा उपाध्यायने आणि संघाने मनोरम लंका द्वीपमध्ये जाऊन बुद्धधम्माच्या स्थापनेची आज्ञा केली, ती शिरसावंद्य मानून महेंद्राने उपाध्याय आणि संघास वंदन करून चार स्तवीर सोबत घेऊन बौद्ध धम्माच्या स्थापना, प्रचार आणि प्रचारासाठी लंकाद्वीप  गाठले  तो दिवस "जेष्ठ पौर्णिमेचा" होता!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...