संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...
हिरालाल बाबूलाल मकेश्वर ( केंद्रप्रमुख ) हे आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा अल्पसा परिचय डॉ हिरालाल बाबुलाल मकेश्वर मुळगाव वाठोडा शुक्लेश्वर पंचायत समिती भातुकली जिल्हा अमरावती.त्यांचे इयत्ता पहिली पासून ते
एम. ए. बी. एड. पी.एच.डी. पर्यंतचे शिक्षण हे उर्दू भाषेत झाले आहे त्यांची एकूण 36 वर्ष सेवा झाली आहे .ते सहाय्यक शिक्षक पदवीधर शिक्षक, उच्चश्रेणी मुख्याध्यापक ,केंद्रप्रमुख, गटसमन्वयक, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी अशा विविध पदावर त्यांनी कार्य केले आहे. आणि त्यानी प्रत्येक पदाला योग्य न्याय दिला आहे .त्यांची मातृभाषा मराठी असली तरी त्यांचे संपूर्ण शिक्षण हे उर्दू भाषेत झाल्यामुळे त्यांचे उर्दू भाषेवर प्रभुत्व होते अनेक उर्दू भाषिक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती ही असायचीच त्यांचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीमध्ये झाले असल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. गुरुजनांचे मार्गदर्शन सहकाऱ्यांचे प्रेम यामुळेच ते अनेक अडचणींवर मात करत पुढे जात राहिले. त्यांच्या कणाकणात उर्दू भाषा जाणवत होती. त्यांनी 26 वर्ष अध्ययन अध्यापनाचे कार्य फक्त उर्दू शाळेतच केले आहे .त्यांचे अनेक विद्यार्थी शासकीय-निमशासकीय सेवेत कार्यरत आहेत .तसेच अनेक विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय उत्तम प्रकारे करीत आहे. काही विद्यार्थी सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य करीत आहे .त्यांची प्रथम नियुक्ती सहाय्यक शिक्षक या पदावर झाली .तेव्हा एसएससी डीएड हीच शैक्षणिक पात्रता होती. अध्ययन अध्यापन कार्य करीत असताना सेवेतच त्यांनी स्वतःची शैक्षणिक पात्रता एम. ए. बी. एड. पी.एचडी पर्यंत वाढविली आणि ते नेहमी एक विद्यार्थी म्हणून राहिले आहेत.
उर्दू भाषेवर त्यांचे प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी विविध स्तरावर जसे विभागीय स्तर, जिल्हास्तर, तालुकास्तरावर, स्मार्ट पीटी च्या माध्यमातून फक्त उर्दू भाषेकरीता एक उत्कृष्ट आर.पी म्हणून कार्य केले आहे त्यांची सेवा नांदेड जिल्हा पंचायत समिती मुखेड अमरावती जिल्हा पंचायत समिती धारणी, दर्यापूर पंचायत समिती येवदा, वडनेर गंगाई आणि दारापुर भातकुली पंचायत समिती खोलापूर अशा ठिकाणी अतिशय उत्कृष्ट प्रकारे सेवा केली आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात त्यांचे उर्दू भाषिक मित्र परिवार आहेत. तसेच अमरावती जिल्ह्यात सर्वच तालुक्यात त्यांचा मित्र परिवार आहे .त्यांच्या अर्धांगिनी ह्या जिल्हा परिषद अमरावती पंचायत समिती दर्यापूर मधील दारापूर या ठिकाणी शिक्षिका आहेत. त्यांनी दर्यापूर पंचायत समिती मधील सामदा व रामतीर्थ या दोन्ही केंद्राचा प्रभार उत्तमरित्या यशस्वीपणे सांभाळला आहे.
या केंद्रातील सर्व शिक्षक एक कुटुंबासारखी आहेत .त्यांनी केंद्रात विविध शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत .केंद्रातील शिक्षकांना प्रेरणा देणारे ते एक उत्तम व्यक्तिमत्व होते. त्यांची मातृभाषा मराठी असली तरी त्यांचे संपूर्ण शिक्षण हे उर्दू भाषेत झाल्यामुळे उर्दू भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते .अनेक उर्दूभाषिक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती ही आवर्जून असायचीच.त्यांचे पुढील आयुष्य निरोगी आनंदी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपण सेवा निवृत्त होतय, आमचा निरोप घेताय, हे अगदी खरं ;पण आपल्याशी असलेलं आमचं नातं मात्र सदैव अबाधितच राहील! तुमच्या सहवासात घालवलेले अनेक चांगले क्षण आजही आमच्या मनात रंजीत घालत आहेत .तुमचा स्वभाव, तुमचं वागणं, आम्हाला सतत आठवतच राहील. तुमचं इथून पुढचं आयुष्यही असच सुख-समाधानाचे जावो हीच पुनच्छ ईश्वरांकडे प्रार्थना.
@ बालस्नेही
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -