"वैशाख पौर्णिमा "
"सर्वांचे कल्याण होवो.
बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करतांना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निवार्णाच्या समीप पोहोचण्यासाठी हा ‘अष्टांग मार्ग’ किंवा ‘मध्यम मार्ग’ सांगितला.अष्टांगिक मार्ग
अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय. याला मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात. ह्या आठ गोष्टींच्या अंगीकारल्यास मानवाचे जीवन सुखमय होते.
१) सम्यक् दृष्टी :- निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.
२) सम्यक् संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार.
३) सम्यक् वाचा :- करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे.
४) सम्यक् कर्मान्त :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.
५) सम्यक् आजीविका :- वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.
६) सम्यक् व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.
७) सम्यक् स्मृती :- तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.
८) सम्यक् समाधी :- कोणत्याही वाईट विकारांचा स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे.
आनापानस्मृतिभावना दीर्घ आश्वास प्रश्वास किंवा र्हस्व आश्वास प्रश्वास याचे एकदा आकलन झाले म्हणजे आपण समाधीच्या मार्गात उतरलो असे समजावे. पण तेवढ्याने कृतकृत्य न होता किंवा पुढल्य चौकडीच्या अभ्यासास न लागता पहिल्याच चौकडीचा अभ्यास दृढ करावा. तो इतका की,भय, हर्ष किंवा अशाच एखाद्या संभ्रमकारक प्रसंगी आपले चित्त विभ्रांत न होता एकदमआश्वास-प्रश्वासांवर यावे. जेव्हा जेव्हा आनापानस्मृतिभावना कशी करावी हे भगवंताने सांगितले आहे, तर त्याला अप्रतिम प्रीतिसुख अनुभवण्यास मिळाल्यावाचून रहात नाही.
त्यानंतर असे आनंदकारक आणि सुखकारक चित्तसंस्कार जाणून घेऊन आश्वासप्रश्वासकरायचा असतो; आणि अखेरीस ते शांत कसे होतील, आणि मनाचा सूक्ष्म कंपही कसा थांबेलयाविषयी प्रयत्न करावयाचा असतो. म्हणूनच, 'चित्तसंस्कार शांत करून अश्वास प्रश्वासकरण्याचा अभ्यास करतो,' परंतु या प्रयत्नाने चित्त मंदावत जाण्याचा संभव असतो. त्यासाठी चित्त जाणून आश्वास प्रश्वास करावा लागतो. नंतर चित्ताला प्रमुदित करून, चित्ताचे समाधान करून आणिचित्ताला विमुक्त करून आश्वास करण्याचा अभ्यास करावयाचा असतो. चित्त विमुक्त ठेवण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे.ज्यालाजगाची अनित्यता पहावयाची असेली त्याला ती ध्यानाच्या योगे अत्यंत सूक्ष्म झालेल्या आपल्याच अश्वास-प्रश्वासांत विशदपणे दिसून येणार आहे. फूल फुलून ते कोमेजून जाण्यास एक दोन दिवस लागतात. पिकलेले फळ किंवा पान देठापासून गळून पडण्यास काही काळ जातो; परंतु आपल्या आश्वासप्रश्वासांची घडामोड क्षणोक्षणी चाललेली असते; आणि ती जर आपणास आकलन करता आली, तर अनित्यतेचा अनुभव घेण्यास मूळीच उशीर लागणार नाही. अनित्यतेच्यायोगे वैराग्याचा अनुभव घेण्यास सापडतो. त्यायोगे सर्व मनोवृत्तीचा लय कसा होतो याचे ज्ञान होते; आणि मग सर्वत्याग कसा असतो हे समजते. या सर्वांचा अनुभव घेऊनआश्वास प्रश्वास चालविला असता योग्याला निर्वाणप्राप्ती होण्यास विलंब लागत नाही.
विपश्यना साधनेचे उच्चतम आध्यात्मिक लक्ष्य विकारांपासून संपूर्ण मुक्ती आणि बोधि प्राप्त करणे आहे. साधनेचा उद्देश केवळ शारिरीक दुःखांपासून मुक्ती नाही. परंतु, चित्तशुद्धीमुळे कित्येक मनोशारीरिक आजार आपोआप दूर होतात. वस्तुतः विपश्यना ही दुःखाची मूळ तीन कारणे - मोह, द्वेष तसेच अविद्या दूर करते. तर जो कुणी ह्या साधनेचा नियमित अभ्यास करत राहिला तर एकेक पाऊल पुढे जात राहून आपल्या मानसिक विकारांपासून पूर्ण मुक्त होऊन नितांत विमुक्त अवस्थेचा साक्षात्कार करू शकतो.
!!सर्वांचे मंगल होवो!!!!
@ बालस्नेही

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -