मुख्य सामग्रीवर वगळा

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

जिल्हा परिषद अमरावती कोविड केअर व समुपदेशन सेंटरचे पालकमंत्री ना. यशोमतीताई ठाकूर यांनी केले लोकार्पण.

*👉🏻 जिल्हा परिषद अमरावती कोविड केअर व समुपदेशन सेंटरचे पालकमंत्री ना. यशोमतीताई ठाकूर यांनी केले लोकार्पण.*

*👉🏻 25 बेडची झाली तातडीने उपलब्धता.*
*👉🏻 कोविड केअर सेंटर  उभारणीसाठी जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांच्या आर्थिक सहयोगाचा लागणार हातभार.*

      अमरावती.. 21 मे 2021

     *जिल्हा परिषद अमरावती द्वारा संचालित कोविड केअर व समुदेशन सेंटरचे लोकार्पण जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महिला व बालविकास मंत्री ना. यशोमतीताई ठाकूर यांनी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, आरोग्य तथा वित्त सभापती बाळासाहेब हिंगणीकर, शिक्षण व बांधकाम सभापती सुरेश निमकर, समाज कल्याण सभापती दयाराम काळे, महिला व बाल कल्याण सभापती सौ पूजाताई संदीप आमले, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप रणमले, यांच्यासह मान्यवर जि प सदस्य, जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख, कर्मचारी संघटना प्रतिनिधी, शिक्षक संघटना प्रतिनिधी, हे कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करून उपस्थित होते.*

        *अमरावती जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मालटेकडी जवळच्या जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात सुसज्ज असे 25 बेडचे कोविड केअर सेंटर तातडीने सुरू करण्यात आले. याकरिता जिल्हा परिषदेच्या शिक्षक, कर्मचारी व अधिकारी यांच्या सहकार्यातून माहे एप्रिलच्या वेतनातून प्रत्येकी एक हजार रुपये कपात करून यातून सुमारे 90 लक्ष रुपयाचा जि.प.अमरावती कोव्हिडं केअर रिलीफ फंड उभा राहणार आहे.*

*जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप रणबले यांनी या कोव्हिडं केयर सेंटर साठी डॉ.रोमील वारकरी, डॉ. जीवन रायबोर्डे, डॉ. नूतन डांगे, डॉ. मौ.साजिद अकबर, या तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केलेली आहे*

 *गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना विषाणूचे संक्रमन कमी न होता वाढतच जात आहे आणि या कोरोनाचे बाधित होऊन अनेक जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक कोरोनाचे बळी ठरले आहे. या बाबीची तातडीने दखल घेऊन जि प अधिकारी-कर्मचारी व शिक्षक संघटनांनी मदतीचा हात पुढे केला.आणि चर्चेतून कोव्हिडं केयर सेंटर उभारण्याची संकल्पना समोर आली. या कोव्हिडं केयर सेंटर च्या निर्मितीच्या निमित्ताने अमरावती जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांचे याप्रसंगी पालकमंत्री ना. यशोमतीताई ठाकूर आणि बबलुभाऊ देशमुख ,अध्यक्ष यांनी सर्वांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.*

*या कोविड केअर सेंटर करिता सर्वतोपरी मदत करण्याची तयारी पालकमंत्री आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख यांनी यावेळी दर्शविली.*

 *शिक्षकांच्या माहे एप्रिलच्या वेतनातून कपात करण्यासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी ई.झेड.खान यांनी तातडीचा आदेश जारी केला आहे.*
 *या छोटेखानी लोकार्पण सोहळ्याचे सूत्रसंचालन मनोज रामचंद्र चोरपगार यांनी केले. जिल्हा परिषद आरोग्य विभाग कोविड केअर व समुपदेशन सेंटरला सेवा देण्यासाठी सुसज्ज असून जिल्हा परिषदेच्या कर्मचारी, अधिकारी,शिक्षक यासोबतच जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करून सर्व उपस्थितांचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप रणमले यांनी आभार मानलेत..*
🔆🔆🔆🔆
*अत्यंत महत्त्वाचे आपण वाचा आपल्या जिवलगांना सांगा*
 
*जि. प.अमरावती कोविड केयर आणि समुपदेशन केंद्र*

*पत्ता*
*जि.प.विश्रामगृह,मालटेकडी जवळ, अमरावती*

🔆🔆🔆🔆🔆🔆🔆

*आपल्या नातेवाईकांपैकी किंवा परिसरातील माहितीतील व्यक्ती जर कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्या पेशंट ची गैरसोय न होता वेळेवर उपचार व्हावे, यासाठी सर्वांच्या माहितीस्तव आपल्या या कोविड केयर व समुपदेशन केंद्राबाबत पोस्ट टाकल्या जात आहे....*

*विशेष सुविधा......*👇👇

*👉🏻एकूण सुसज्य25 बेड ची व्यवस्था....*

*👉🏻 चार तज्ञ डॉक्टरांच्या चमुद्वारे  24 तास सेवा.....*

*👉🏻एका रूम मध्ये फक्त दोनच पेशंट राहील....*

*👉🏻सर्व रूममध्ये  AC ची सुविधा.....*

*👉🏻सर्व औषधी मोफत...*

*👉🏻डॉक्टर च्या सल्ल्यानुसार सांगितलेल्या रक्ताच्या सर्व तपासण्या मोफत.......*

*👉🏻रुग्णवाहिका सुविधा.....*

*👉🏻 ऊर्जा निर्माण होण्यासाठी सकाळी रोज एक तास समुपदेशन...*

*पेशंट ला रोज कोविड डायट प्लान नुसार नास्ता, चहा, दोन्ही वेळचे जेवण,गरम पाणी हे मोफत दिल्या जाईल (उत्तम क्वॉलिटी )*

*फ्रुटस, ड्रायफ्रूटस , दूध दिल्या जाईल.....*

*आपण आपल्या माध्यमातून जर या सेंटर बाबतची माहिती दिली तर आपण बऱ्याच लोकांना या कोरोना पासून वाचवून जीवनदान देण्याचे मोलाचे कार्य करू शकतो.*

*विनंती..*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...